शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

‘ओव्हर’लोड चालकांची चूक पडली ५२ लाखांना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:32 IST

सातारा : कोरोनानंतर घराबाहेर पडलेल्या वाहन चालकांची बेफिकिरी समोर आली आहे. कोणी ‘ओव्हर’ लोड, तर कोणी विनापरवाना वाहन ...

सातारा : कोरोनानंतर घराबाहेर पडलेल्या वाहन चालकांची बेफिकिरी समोर आली आहे. कोणी ‘ओव्हर’ लोड, तर कोणी विनापरवाना वाहन चालवून नियमाचे उल्लंघन करत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायू वेग पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे अशा वाहन चालकांकडून एका महिन्यात तब्बल ५२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावरूनच वाहन चालक किती बेफिकीर आहेत, हे दिसून येते.

कोरोनामुळे गत सहा महिने अनेकजण घरात कोंडून होते. कसलेही व्यवहार सुरू नव्हते. मात्र, लॉकडाऊन शिथिली झाल्यानंतर अनेकजण कामानिमित्त बाहेर पडले. पण रस्त्यावर वाहन चालविताना अनेकजण नियमांचे उल्लंघन करतच सुटले. नित्यनियमाने कारवाई करणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर या पथकाने महामार्गावर विविध ठिकाणी तपासणी केंद्र उभारून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. अनेक वाहने धोकादायक पद्धतीने चालविण्यात येत होती, तर काही विनापरवाना प्रवासी वाहतूक करत असल्याचे आढळून आले. या पथकाने कोणाचीही गय न करता कारवाईचा बडगा उगारला. अनेक वाहन चालकांनी आपल्या चुकीची किंमत म्हणून एका महिन्यात तब्बल ५२ लाख उपप्रादेशिक परिवहनच्या तिजोरीत भरले आहेत. केवळ वाहन चालकांच्या चुकीमधून एक महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल जमा होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.

एवढ्या मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम पाहून वाहन चालकांकडून मोटार नियम कायद्याचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे या निमित्ताने समोर येत आहे. त्यामुळेच अपघातातही वाढत झाली आहे. बेफिकीर चालकांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नियम पाळून वाहन चालविले तर ना दंड द्यावा लागेल ना कारवाईला सामोरे जावे लागेल. स्वत:चा अन् दुसऱ्याचा जीव महत्त्वाचा आहे. या दृष्टीने प्रत्येक वाहन चालकाने विचार करणे गरजेचे असल्याचे मत वायू वेग पथकातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. चालतंय चालू द्या, अशी भूमिका ठेवून अनेक वाहन चालक मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करत आहेत. असे वाहन चालकच या पथकाच्या हाती लागत आहेत.

चौकट : रात्री होतायत सैरभर!

महामार्गावर अनेक वाहनचालक विशेषत: रात्रीचे सैरभैर होत आहेत. त्यामुळे वायू वेग पथक नियम डावलणाऱ्या अशा वाहन चालकांवर लक्ष ठेवून असते. ओव्हरलोड वाहन चालविण्याचे प्रकार तर रात्रीचे सर्वाधिक घडत आहेत. परिणामी सर्वाधिक महसूल हा रात्रीचा जमा होत आहे.

कोट : वाहन चालकांनी मोटार नियम कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्यामुळे अपघातही होतात. परिणामी अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागतो. हे कुठेरी थांबायला हवे.

विनोद चव्हाण,

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा