शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

‘ओव्हर’लोड चालकांची चूक पडली ५२ लाखांना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:32 IST

सातारा : कोरोनानंतर घराबाहेर पडलेल्या वाहन चालकांची बेफिकिरी समोर आली आहे. कोणी ‘ओव्हर’ लोड, तर कोणी विनापरवाना वाहन ...

सातारा : कोरोनानंतर घराबाहेर पडलेल्या वाहन चालकांची बेफिकिरी समोर आली आहे. कोणी ‘ओव्हर’ लोड, तर कोणी विनापरवाना वाहन चालवून नियमाचे उल्लंघन करत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायू वेग पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे अशा वाहन चालकांकडून एका महिन्यात तब्बल ५२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावरूनच वाहन चालक किती बेफिकीर आहेत, हे दिसून येते.

कोरोनामुळे गत सहा महिने अनेकजण घरात कोंडून होते. कसलेही व्यवहार सुरू नव्हते. मात्र, लॉकडाऊन शिथिली झाल्यानंतर अनेकजण कामानिमित्त बाहेर पडले. पण रस्त्यावर वाहन चालविताना अनेकजण नियमांचे उल्लंघन करतच सुटले. नित्यनियमाने कारवाई करणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर या पथकाने महामार्गावर विविध ठिकाणी तपासणी केंद्र उभारून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. अनेक वाहने धोकादायक पद्धतीने चालविण्यात येत होती, तर काही विनापरवाना प्रवासी वाहतूक करत असल्याचे आढळून आले. या पथकाने कोणाचीही गय न करता कारवाईचा बडगा उगारला. अनेक वाहन चालकांनी आपल्या चुकीची किंमत म्हणून एका महिन्यात तब्बल ५२ लाख उपप्रादेशिक परिवहनच्या तिजोरीत भरले आहेत. केवळ वाहन चालकांच्या चुकीमधून एक महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल जमा होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.

एवढ्या मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम पाहून वाहन चालकांकडून मोटार नियम कायद्याचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे या निमित्ताने समोर येत आहे. त्यामुळेच अपघातातही वाढत झाली आहे. बेफिकीर चालकांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नियम पाळून वाहन चालविले तर ना दंड द्यावा लागेल ना कारवाईला सामोरे जावे लागेल. स्वत:चा अन् दुसऱ्याचा जीव महत्त्वाचा आहे. या दृष्टीने प्रत्येक वाहन चालकाने विचार करणे गरजेचे असल्याचे मत वायू वेग पथकातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. चालतंय चालू द्या, अशी भूमिका ठेवून अनेक वाहन चालक मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करत आहेत. असे वाहन चालकच या पथकाच्या हाती लागत आहेत.

चौकट : रात्री होतायत सैरभर!

महामार्गावर अनेक वाहनचालक विशेषत: रात्रीचे सैरभैर होत आहेत. त्यामुळे वायू वेग पथक नियम डावलणाऱ्या अशा वाहन चालकांवर लक्ष ठेवून असते. ओव्हरलोड वाहन चालविण्याचे प्रकार तर रात्रीचे सर्वाधिक घडत आहेत. परिणामी सर्वाधिक महसूल हा रात्रीचा जमा होत आहे.

कोट : वाहन चालकांनी मोटार नियम कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्यामुळे अपघातही होतात. परिणामी अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागतो. हे कुठेरी थांबायला हवे.

विनोद चव्हाण,

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा