शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
2
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
3
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
4
"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
5
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
6
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
7
खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी
8
Sonam Kapoor : सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट; नवऱ्याची मजेशीर कमेंट
9
कूनोतून आली गुडन्यूज; भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म
10
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांना वीरमरण, जानेवारीत होणार होतं लग्न
11
आरोग्य विमा होणार स्वस्त? प्रीमियमच्या मनमानी वाढीला लगाम लागणार; सरकार उचलणार 'ही' मोठी पाऊले!
12
महिन्यात दिवस कमी असो किंवा जास्त, पगार नेहमी ३० दिवसांचाच का येतो? काय आहे कॅलक्युलेट करण्याचा फॉर्म्युला
13
VIDEO: जिममध्ये वजन उचलताना अचानक तोल गेला, मुलीच्या मानेवर पडला वजनदार बार अन् मग...
14
'आजोबा वारले, तरी इंडक्शन कॉलला हजर रहा!' कॉर्पोरेट जगात 'विषारी' वर्ककल्चरचा कळस; नेटकऱ्यांचा संताप
15
टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
16
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
17
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
18
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
19
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
20
Numerology: तुमचा जन्म ‘या’ ३ पैकी तारखांना झालाय? गूढ-रहस्य असते जीवन, केतु देतो अमाप पैसा!
Daily Top 2Weekly Top 5

‘ओव्हर’लोड चालकांची चूक पडली ५२ लाखांना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:32 IST

सातारा : कोरोनानंतर घराबाहेर पडलेल्या वाहन चालकांची बेफिकिरी समोर आली आहे. कोणी ‘ओव्हर’ लोड, तर कोणी विनापरवाना वाहन ...

सातारा : कोरोनानंतर घराबाहेर पडलेल्या वाहन चालकांची बेफिकिरी समोर आली आहे. कोणी ‘ओव्हर’ लोड, तर कोणी विनापरवाना वाहन चालवून नियमाचे उल्लंघन करत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायू वेग पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे अशा वाहन चालकांकडून एका महिन्यात तब्बल ५२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावरूनच वाहन चालक किती बेफिकीर आहेत, हे दिसून येते.

कोरोनामुळे गत सहा महिने अनेकजण घरात कोंडून होते. कसलेही व्यवहार सुरू नव्हते. मात्र, लॉकडाऊन शिथिली झाल्यानंतर अनेकजण कामानिमित्त बाहेर पडले. पण रस्त्यावर वाहन चालविताना अनेकजण नियमांचे उल्लंघन करतच सुटले. नित्यनियमाने कारवाई करणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर या पथकाने महामार्गावर विविध ठिकाणी तपासणी केंद्र उभारून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. अनेक वाहने धोकादायक पद्धतीने चालविण्यात येत होती, तर काही विनापरवाना प्रवासी वाहतूक करत असल्याचे आढळून आले. या पथकाने कोणाचीही गय न करता कारवाईचा बडगा उगारला. अनेक वाहन चालकांनी आपल्या चुकीची किंमत म्हणून एका महिन्यात तब्बल ५२ लाख उपप्रादेशिक परिवहनच्या तिजोरीत भरले आहेत. केवळ वाहन चालकांच्या चुकीमधून एक महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल जमा होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.

एवढ्या मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम पाहून वाहन चालकांकडून मोटार नियम कायद्याचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे या निमित्ताने समोर येत आहे. त्यामुळेच अपघातातही वाढत झाली आहे. बेफिकीर चालकांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नियम पाळून वाहन चालविले तर ना दंड द्यावा लागेल ना कारवाईला सामोरे जावे लागेल. स्वत:चा अन् दुसऱ्याचा जीव महत्त्वाचा आहे. या दृष्टीने प्रत्येक वाहन चालकाने विचार करणे गरजेचे असल्याचे मत वायू वेग पथकातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. चालतंय चालू द्या, अशी भूमिका ठेवून अनेक वाहन चालक मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करत आहेत. असे वाहन चालकच या पथकाच्या हाती लागत आहेत.

चौकट : रात्री होतायत सैरभर!

महामार्गावर अनेक वाहनचालक विशेषत: रात्रीचे सैरभैर होत आहेत. त्यामुळे वायू वेग पथक नियम डावलणाऱ्या अशा वाहन चालकांवर लक्ष ठेवून असते. ओव्हरलोड वाहन चालविण्याचे प्रकार तर रात्रीचे सर्वाधिक घडत आहेत. परिणामी सर्वाधिक महसूल हा रात्रीचा जमा होत आहे.

कोट : वाहन चालकांनी मोटार नियम कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्यामुळे अपघातही होतात. परिणामी अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागतो. हे कुठेरी थांबायला हवे.

विनोद चव्हाण,

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा