शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्यावर मात; ताईगडेवाडीत वॉटर एटीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 11:00 IST

Water ATM Satara : मराठवाडी धरणामुळे ताईगडेवाडी, ता. पाटण येथील पुनर्वसित गावठाणात स्थलांतरित झालेल्या घोटीलच्या धरणग्रस्तांनी लोकसहभागातून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या पिण्याच्या अस्वच्छ पाण्याच्या समस्येवर त्यांनी स्वत:च मार्ग काढला आहे. या प्रकल्पातून पाच रुपयांत तीन लिटर शुद्ध व थंड पाणी उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देदूषित पाण्यावर मात; ताईगडेवाडीत वॉटर एटीएमधरणग्रस्तांचा पुढाकार : लोकसहभागातून साकारला पाणी प्रकल्प

सणबूर : मराठवाडी धरणामुळे ताईगडेवाडी, ता. पाटण येथील पुनर्वसित गावठाणात स्थलांतरित झालेल्या घोटीलच्या धरणग्रस्तांनी लोकसहभागातून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या पिण्याच्या अस्वच्छ पाण्याच्या समस्येवर त्यांनी स्वत:च मार्ग काढला आहे. या प्रकल्पातून पाच रुपयांत तीन लिटर शुद्ध व थंड पाणी उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.मराठवाडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील अनेक गावे सातारा व सांगली जिल्ह्यात स्थलांतरीत झालेली आहेत. त्यातील घोटीलचे पुनर्वसन स्थानिक ठिकाणी ताईगडेवाडीजवळ झाले असून दहा वर्षांपासून प्रकल्पग्रस्त कुटुंबे तेथे वास्तव्यास आहेत. दहा वर्षे उलटूनही समस्यांचा फेरा न सुटल्याने अनेक अडचणींशी त्यांचा सामना सुरू असून अस्वच्छ पाणी पुरवठा ही त्यापैकीच एक समस्या आहे.गावच्या सार्वजनिक नळ योजनेची विहीर खळे गावाजवळ वांग नदीकाठावर असून गर्द झाडीमुळे पालापाचोळा तसेच पक्षी व वानरांची विष्टा पाण्यात पडून विहिरीतील पाणी अस्वच्छ होते. गावात निर्माण झालेला हा आरोग्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी लोकसहभागातून शुद्ध व थंड पाण्याचे एटीएम उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेवून तातडीने त्याची अंमलबजावणी केली. या प्रकल्पातून पाच रुपयांत तीन लिटर शुद्ध व थंड पाणी उपलब्ध होत असल्याने स्थानिकांसह आजूबाजूच्या गावातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, सहाय्यक अभियंता रोहिणी चव्हाण, कनिष्ठ अभियंता प्रियांका वाघमोडे आदी उपस्थित होत्या.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSatara areaसातारा परिसर