शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

कास संपर्क क्षेत्राबाहेर : मोबाईल कॉल करण्यासाठी कोण झाडावर तर कोण दुचाकीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:03 IST

पेट्री : कास तलावात अजूनही पाणी आहे. त्यामुळे हौसी पर्यटक सुटीचा आनंद घेण्यासाठी कासला येतात. परंतु येथे कोणत्याही मोबाईलला ...

पेट्री : कास तलावात अजूनही पाणी आहे. त्यामुळे हौसी पर्यटक सुटीचा आनंद घेण्यासाठी कासला येतात. परंतु येथे कोणत्याही मोबाईलला रेंज नसल्याने महत्त्वाचे निरोप द्यायचे असल्यास पर्यटकांना मोबाईल घेऊन रेंजचा शोध घ्यावा लागतो. यासाठी काहीजण झाडावर चढतात तर कोण दुचाकीवर उभा राहतो. खूप प्रयत्नानंतर रेंज आल्यावर त्यांना हायसे वाटते.चोहोबाजूने वेढलेल्या डोंगररांगा, त्यात दाट झाडी यामुळे हिवाळा तसेच पावसाळ्यात दाट धुक्यात हरवून जाणारे कास पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. हिरवागार निसर्ग आजही साद घालत असल्याने पर्यटक येतात; परंतु मोबाईलला रेंज नसल्याने संपर्क साधण्यासाठी रेंजच्या शोधात फिरावे लागते.कास तलाव परिसरात काही तुरळक ठराविक रेंज येते. मोबाईलला रेंजच मिळत नसल्याने जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेले कास तलाव कायम ‘नॉट रिचेबल’ लागते. संपूर्ण जग इंटरनेटने व्यापले असले तरी सातासमुद्रापार ओळख असणाऱ्या कासला रेंजअभावी फोनही लागत नाही. या परिसरात पर्यटकांची हजारो रुपयांच्या भारी स्मार्टफोनचे एक प्रकारचे खेळणेच बनते.फुलांचा हंगाम वगळता पर्यटकांची कास तलावावर निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटण्यासाठी नेहमीच वर्दळ असते. येथील नयनरम्य नजराणा जिल्हा तसेच इतर जिल्ह्यातील पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी अनेक कुटुंब तसेच तरुणाई कास तलावावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. येथे आल्यावर फोनला रेंजच मिळत नाही.तलावाच्या मुख्य व्हॉल्व्हवर फोटोसेशन, पावसाळ्यात निसरड्या किनाºयावर गाडी घेऊन जाणे, किनाºयावर फोटोसेशन करत तरुणाईमध्ये होणारी हुल्लडबाजी चालते. परजिल्ह्यातून आलेल्या पर्यटकाला नातेवाइकांना इमर्जन्सी कॉल करावयाचा म्हटले तर रेंज मिळत नाही. ३१ डिसेंबर, गेट टुगेदर, विकएंड तसेच वर्षभर बहुतांशी वेळेला ओल्या पार्ट्यांचा परिसरात बेत आखला जातो. संगीताचा ठेका धरत मद्याचे पेग रिचवत हुल्लडबाजी करणाºया तरुणाईमध्ये अनेकदा हाणामारीत रुपांतर होते. अनुचित प्रकार अथवा अपघात घडल्यास परिसरात जवळपास पोलीस चौकी नसल्याने कॉल होऊ शकत नाही.