शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

येवतेश्वर घाटात जीवघेणा ‘आऊट आॅफ’!

By admin | Updated: August 18, 2015 22:22 IST

उताराच्या रस्त्यावर स्टंटबाजी : इंधन बचतीसाठी दुचाकीस्वारांचा फंडा

पेट्री : शहराच्या पश्चिमेला कास, बामणोली, जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे ओळखली जातात. या पर्यटनस्थळी जाता येता यवतेश्वर घाट रस्ता लागतो. या घाट रस्त्यावरून साताराकडे येताना सर्रास वाहनचालक या धोकादायक वळणावरून आऊट आॅफ मारण्याचा जीवघेणा खेळ करत पेट्रोल बचत करताना दिसत आहेत. परंतू यामुळे वाहनाचे नुकसान होवून चाराण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला अशी परिस्थिती उद्भवते आहे.कास पठार, कास तलाव, बामणोली या परिसरात पर्यटक, महाविद्यालयीन तरूणाईची नेहमीच वर्दळ असते. सध्याच्या कास पठारावरील फुलांचा हंगाम जिल्हा व परजिल्ह्यातील पर्यटकांना आकर्षुन घेवू लागला आहे. तसेच पश्चिमेकडील पावसाचा जोर पाहता यवतेश्वर घाट रस्त्यावरून पाण्याबरोबर माती, छोटी मोठी खडी पसरलेली दिसून येते. सध्या या परिसरात दाट धुके पसरत असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज यावा यासाठी वाहनांचे प्रकाश दिवे चालू ठेवावे लागत आहेत. आऊट आॅफ मारल्यावर प्रकाश दिवे बंद राहतात. तरीही या रस्त्यावरून हुल्लडबाजी करणारी तरुणाई ट्रिपलसीटवरून मोबाईलचा वापर करत आऊट आॅफ मारताना दिसत आहे. याला चारचाकी वाहनांचा देखील अपवाद वगळता येत नाही. यामुळे तीव्र उतारावर वाहनावर नियंत्रण ठेवणे अवघड होवून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पेट्रोल बचतीसाठी मारलेल्या आउट आॅफमुळे सतत ब्रेक दाबावा लागत असल्याने वाहनाचे लायनर खराब होणे, तसेच बऱ्याचदा क्लज दाबून गेर मध्ये आऊट आॅफ मारल्याने क्लजप्लेट लोखंडी प्लेटवर घासणे, वॉल बेंड होवून वाहनाचे नुकसान पेट्रोल खचार्पेक्षा अधिक होतो. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी देखील मागून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाश झोतावर तसेच इंडिकेटरवर वाहने यवतेश्वर घाटातून सातारकडे आणत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच शनिवार, रविवार अथवा जोडून सुटी आली असता यवतेश्वर घाटातील धबधब्यावर कुंटूबासमवेत पर्यटकांची अधिक गर्दी असते तसेच या ठिकाणी वानरांचा देखील मोठ्या प्रमाणावर वावर असतो. यावेळी दूचाकी वाहनांवर आऊट आॅफ मारून स्टंटबाजी करणाऱ्याच्यांत मोठे प्रमाण दिसून येते. यामुळे एखादी विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गत महिन्यात येथे वानराचा वाहनाला धडकून अपघातात मृत्यु झाला होता. (वार्ताहर)आऊट आॅफ एक फॅशनचार कि.मी अंतर आऊट आॅफ मारून वाहन समर्थ मंदिर राजवाडा मार्गे आर्यांग्ल तसेच ेकार्यालयापर्यंत, तसेच समर्थ मंदिर पासून फूटका तलाव मार्गे मोती चौकापर्यंत पोहचवले जाते.परंतु वाहने स्टार्ट करावी लागू नयेत यासाठी रहदारीच्या गर्दीतूनही वेग कमी न करता आहे तोच वेग कायम ठेवून मार्ग काढला जात आहे. तसेच बोगदा परिसरातून डाव्या बाजूने मंगळवार तळ्यापर्यंत गाडीचा आउट आॅफ मारला जात असल्याने सकाळ, संध्याकाळ शालेय विदयार्थ्यांची या मार्गावर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. यावेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. आऊट आॅफ मारण्यापेक्षा उतारावर चालू गाडी ठेवून चालवली असता पेट्रोल कमी लागते. तसेच चारचाकी वाहनांमध्ये जून्यातली व्हॅन, कार वगळता अन्य चारचाकी वाहनांना आऊट आॅफ बसत नाही. - विकास मिस्त्री, सातारा