शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

आमची लढाई व्यक्तीविरोधात नव्हे भाजपविरोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:39 IST

परळी : आमची लढाई ही विचारांची आहे. कोणत्याही व्यक्तींच्या विरोधात नसून भाजपविरोधात आहे. संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढविण्याचे काम ...

परळी : आमची लढाई ही विचारांची आहे. कोणत्याही व्यक्तींच्या विरोधात नसून भाजपविरोधात आहे. संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढविण्याचे काम आम्ही करणारच. राष्ट्रवादीतील प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम आम्ही करीत असतो. ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषदेत परळी खोरे हे राष्ट्रवादीमय करणार असल्याचा निर्धार विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भोंदवडे येथील मेळाव्यात केला. यावेळी शशिकांत वाईकर यांच्यासह शेकडो युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

मेळाव्याला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कुडाळ गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, राजकुमार पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष सचिन जाधव, मुंबई राष्ट्रवादी पदाधिकारी श्रीरंग देटे, विष्णू पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.

शिंदे पुढे म्हणाले, परळी खोऱ्यात अडीच वर्षांनंतर परत येण्याची संधी मिळाली आहे. परळी भागातील मुंबईतील कार्यकर्त्यांची एकी मी पहिली आहे. या परिसरातील तसेच जावळी, सातारा, पाटण तालुक्यातील कोणत्याही कार्यकर्त्याला कोणतीही अडचण असल्यास ती अडचण सोडवण्यास समर्थ आहे. परळी खोऱ्यात घराघरांत राष्ट्रवादी वाढवायची आहे. जर कोणी त्रास देत असेल तर माझ्याशी संपर्क साधा. दिवंगत भाऊसाहेब महाराजांपासून माझे राजघराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी मला राजकारणात संधी दिली. पण, सध्या राजकीय वातावरण वेगळ्याच वळणावर आहे.

जि.प. सदस्य दीपक पवार भाषणाच्या सुरुवातीसच म्हणाले, ही गर्दी बघून राजू भोसले घाबरले असतील. पण, परळी भागात बदल झाला पाहिजे याची सुरुवात या मेळाव्याच्या माध्यमातून होत आहे. किती दिवस एकाधिकारशाही स्वीकारत राहणार? परळी भागाचे लोक फक्त म्हणतात तुम्ही लढा आणि घरात बसतात. मात्र आता ते हुशार झाले आहेत. उरमोडी धरणाचे पाणी या भागातील शेतीला नाही. आमदारांनी डोळे झाकले आहेत का ? डोंगर कोणी फोडले? आंबळे धरणाचे काम का रखडवले? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

मेळाव्यात परळी भागातील अनेक गावातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांनी प्रवेश केला. विष्णू पवार, प्रशांत कुरळे, सचिन जाधव, बच्चू यादव यांची यावेळी भाषणे झाली. राजेंद्र लवघारे यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक, केले तर महेश जाधव यांनी आभार मानले.