शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा शहराचा कचरा वेचणारे हात पिक वूलागले सेंद्रिय शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 23:09 IST

कचरा वेचणारे हात जर शेती पिकवू लागले तर नवलच म्हणावं लागेल. अन् हीच असाध्य गोष्ट सातारा पालिकेच्या कचरा वेचकांनी साध्य करून दाखविली आहे.

ठळक मुद्देअनोखा प्रयोग : दोन गुंठे क्षेत्रात वांगी, गवार अन् टोमॅटोची लागवड

सचिन काकडे।सातारा : कचरा वेचणारे हात जर शेती पिकवू लागले तर नवलच म्हणावं लागेल. अन् हीच असाध्य गोष्ट सातारा पालिकेच्या कचरा वेचकांनी साध्य करून दाखविली आहे. पालिकेच्या छत्रपती प्रतापसिंह महाराज भाजी मंडईच्या पाठीमागे असलेल्या सुमारे दोन गुंठे क्षेत्रात कचरा वेचकांनी वांगी, गवार, मिरची, टोमॅटो आदी पिकांची लागवड केली असून, शेतीसाठी लागणारे कंपोस्ट खतही कर्मचाऱ्यांनी तयार केले आहे.

सातारा पालिकेच्या छत्रपती प्रतापसिंह महाराज भाजीमंडईत पालिकेचा कंपोष्ट खतनिर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पाठीमागे सुमारे दोन गुंठे जागा ही मोकळी पडून होती. जागेत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. या जागेचा सदुपयोग व्हावा, अशी कल्पना कचरा वेचक श्रमिक संघाचे कर्मचारी शशिकांत भिसे, सचिन पवार, राजू वायदंडे आदींना आली. यानंतर त्यांनी प्रा. विजयकुमार निंबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार या मोकळ्या जागेत शेती पिकविण्याचा निर्णय घेतला.कर्मचाºयांनी तलावातून काढलेला गाळ आणून या जागेत सर्वत्र पसरला.

यानंतर स्वत:च तयार केलेल्या वांगी, गवार, टोमॅटो, मिरची, काकडी, घोसावळे, दोडका आदी रोपांनी या शेतीत लागवड केली. कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता हे कर्मचारी स्वत:च्या हाताने तयार केलेले कंपोष्ट खत या शेतीसाठी वापरू लागले आहेत. सध्या यातील काही पिके जोमात आली असून, एक ते दीड फुटापर्यंत त्यांची वाढही झाली आहे. भाजी मंडईतील सांडपाण्याचाच या शेतीला पुनर्वापर केला जात आहे. कचरा वेचक कर्मचाºयांनी सेंद्रिय शेती पिकवून सर्वांपुढे आदर्श निर्माण केला असून, पालिकेसाठी ही बाब कौतुकास्पद ठरली आहे.पालेभाज्यांचे सर्वप्रथम अधिकाऱ्यांना करणार वाटपसर्वप्रथम आम्ही विविध पालेभाज्यांची रोपे तयार केली. याच रोपांची सेंद्रिय शेतीत लागवड केली. शेतीची निगा राखण्याचे काम आम्ही न चुकता करीत आहोत. या शेतीतून पिकलेल्या पालेभाज्या आम्ही सर्वप्रथम पालिकेच्या अधिकाºयांना देणार आहोत, अशी माहिती कचरा वेचक श्रमिक संघाचे शशिकांत भिसे, सचिन पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.‘महादरे’तील दोनशे वर्षांचा गाळ शेतीसाठीसाताऱ्यातील ऐतिहासिक महादरे तलावाची उभारणी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी झाली आहे. तेव्हापासून हा तलाव गाळाने भरला होता. दोन महिन्यांपूर्वी पालिकेच्या वतीने हा तलाव गाळमुक्त करण्यात आला. कचरा वेचक कर्मचाऱ्यांनी याच गाळाचा उपयोग सेंद्रिय शेतीसाठी केला आहे. 

तब्बल दोन टन खतनिर्मितीछत्रपती प्रतापसिंह भाजी मंडईत गेल्या सात महिन्यांपासून पालिकेचा कंपोस्ट खतनर्मिती प्रकल्प सुरू आहे. मंडईतील टाकावून पालेभाज्या व कचºयापासून येथे खत तयार केले जात आहे. या ठिकाणी खतनिर्मितीचे आठ पीट आहेत. आतापर्यंत याठिकाणी सुमारे दोन टन खताची निर्मिती करण्यात आली आहे. 

सेंद्रीय शेती ही काळाची गरज आहे. कचरा वेचकांनी एकत्र येऊन हाती घेतलेला हा उप्रकम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अशा प्रकारच्या उपक्रमाला पालिकेसह सर्वांनीच पाठबळ द्यायला हवे.- विजयकुमार निंबाळकर

टॅग्स :Satara areaसातारा परिसर