शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
5
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
6
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
7
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
10
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
11
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
12
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
13
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
14
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
15
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
16
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
17
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
18
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
19
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
20
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
Daily Top 2Weekly Top 5

देशातल्या विरोधी पक्षांना ‘पॅरेलिसीस’ झालाय--प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 21:31 IST

‘सध्या देशातले वातावरण हे भाजप सरकारच्या विरोधात आहे; पण देशातल्या मोठ्या राजकीय विरोधी पक्षांना पॅरेलिसीस झालाय; काँगे्रस तर लोक स्वत:हून आपल्या हातात सत्ता देतील,

कऱ्हाड : ‘सध्या देशातले वातावरण हे भाजप सरकारच्या विरोधात आहे; पण देशातल्या मोठ्या राजकीय विरोधी पक्षांना पॅरेलिसीस झालाय; काँग्रेस तर लोक स्वत:हून आपल्या हातात सत्ता देतील, याची वाट बघत बसले आहेत,’ अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले प्रकाश आंबेडकर गुरुवारी कोल्हापूरहून साताऱ्याला जात असताना कऱ्हाडात थांबून काही कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी दलित महासंघाचे संस्थापक प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, प्रा. पुष्पलता सकटे, प्रकाश वायदंडे, जावेद नायकवडी, अप्पा बडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.आंबेडकर म्हणाले, ‘देशाची एकंदरीत परिस्थिती पाहता ती हाताबाहेर चालल्याचे दिसते. संविधानच अडचणीत आले आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी आमचा लढा आहे. त्यासाठी सर्वत्र फिरत असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण लोकांच्या समोर जात असून, गेल्या सत्तर वर्षांत ज्यांनी लोकसभेत पायही ठेवला नाही, अशा जाती-जमातीतील लोकांना लोकसभेत उमेदवारी देण्याचा आपला निर्धार आहे. जे आजवर सत्तेपासून वंचित राहिले आहेत. त्यांना सत्तेत आणण्यासाठीच आपली ही नवीन लढाई आहे.’त्यामुळेच कर्नाटकात काँगे्रसचा पराभव !‘कर्नाटक राज्यात शिवम आयोग लागू करून त्याची अंमलबजावणी तातडीने करा, अशी आमची मागणी होती. मात्र कर्नाटकातील काँगे्रसच्या मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्याचाच परिणाम म्हणून कर्नाटकात काँगे्रसचा पराभव झाला,’ असेही आंबेडकर एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.ते आहेत तेथेच सुखी आहेतबहुजन आघाडीत आपण सर्वांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करताय, ही बाब चांगली आहे. मग दलितांचे नेतृत्व करणाºया तुमच्या जुन्या मित्रांना बरोबर घेणार का? याबाबत छेडले असता, ‘ते आहेत तेथेच सुखी आहेत,’ असा टोला रामदास आठवलेंचे नाव न घेता प्रकाश आंबेडकरांनी लगावला....तर हा सुद्धा बदल कराआपल्याला राज्यात अन् देशात राजकीय बदल घडवून आणायचा आहे. त्यामुळे आपण स्वत:सुद्धा काही बदल केले पाहिजेत, असे सांगत स्वागतला पुष्पगुच्छ, बुके देत बसू नका, हा सुद्धा बदल तुम्ही स्वत:त करा, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी आणलेले बुके, हार स्वीकारणे टाळले.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण