शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

राजेंच्या कार्यकर्त्यांकडून भाजपचा बागुलबुवा -- उदयनराजेंच्या उमेदवारीला उघड विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:29 IST

दीपक शिंदे । सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह काही थांबण्यास तयार नाही. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे ...

ठळक मुद्देदबावाचे राजकारण : नेत्यांसाठी कार्यकर्ते मैदानात,, नेत्यांनाही समजदारीचा सल्ला

दीपक शिंदे ।सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह काही थांबण्यास तयार नाही. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते एकमेकांवर राजकीय दबाव टाकून स्वत:ची कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. असे करा नाहीतर भाजपमध्ये जातो...तसे करा नाहीतर भाजपमध्ये जातो, अशी भाजपची भीती दाखवून बागुलबुवा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर आता भाजपचीच अवस्था माझा कुणा म्हणू मी... अशी झाली आहे.

नाराजांना जवळ करा आणि किल्ल्यात घुसूनच हल्ला करा, या नीतीने राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने रचलेल्या चक्रव्यूहात एकेक नेता अडकल्याचा आभास निर्माण केला जात आहे. नेत्यांनी स्वत:हून रचलेले हे चक्रव्यूह स्वत:ची सुटका करून घेण्यासाठीच रचले आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांचे खोटे कवच तयार केलं गेलंय. राजकीय दबावतंत्राचा हा एक प्रकार असला तरी तो कुठंपर्यंत चालणार, हेदेखील लवकरच स्पष्ट होणार आहे.राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या या वातावरण निर्मितीमुळे जिल्ह्यातील एकेक मासा अलगद जाळ्यात पडू लागला आहे, असा भाजपचा समजही होण्याची शक्यता आहे; पण हा मासा कायम गळाला लागणार नाही, तर एका ठिकाणी होणारी घुसमट थांबविण्यासाठी नवीन जाळ्यात स्वत:ला टाकून श्वास घेण्यास पुरेसा वाव मिळाला की पुन्हा परतण्याच्या तयारीत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी बैठक घेऊन राष्ट्रवादीच्या आमदार आणि कार्यकर्त्यांकडून आपल्याला मदत होईल, असे दिसत नाही. त्यामुळे उदयनराजे यांनी भाजपमध्ये जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर मंगळवारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन उदयनराजेंना एवढा विरोध करूनही राष्ट्रवादी काँग्रेस ऐकणार नसेल तर स्वत: आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये जावे, अशी भूमिका घेतली आहे. दोन्ही राजेंचे कार्यकर्ते नेत्यांच्या निवडून येण्याची आणि सन्मानाची काळजी करत आहेत; पण नेत्यांनी कधीच आपण भाजपमध्ये जाणार, असे म्हटलेले नाही. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे होणारे राजकीय डावपेच आहेत. त्यामुळे कधी मिसळ तर कधी गुप्त बैठका, कधी गाण्यातून सुचक इशारा, असा राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकण्याचाच प्रयत्न सुरू आहे.

भाजप सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्याकडे ओढण्याच्या प्रयत्नात आहे. शहरी भागातील भाजप आता ग्रामीण भागातही जोरकसपणे पोहोचत असल्याने शहरी आणि ग्रामीण भागाला जोडणार दुवा असा उमेदवार शोधण्याच्या तयारीत आहे. या निवडणुकीत त्यांना काही उमेदवार सापडतीलही; मात्र निवडून येणारा उमेदवार भाजपच्या हाती लागणे गरजेचे आहे. स्वत:ची ताकद असलेला उमेदवार सहसा पक्ष सोडून जाण्यास धजावत नाही. पक्षालाही अशा उमेदवाराची ताकद माहिती असल्याने त्यालाही चुचकारण्याचाच प्रकार होतो. त्यामुळे आता भाजपच्या हाताला लागणाऱ्या उमेदवारांवर त्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे.नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याच पक्षावर दबाव टाकण्याचा प्रय-त्न केला असला तरी योग्य वेळी योग्य निर्णय आणि साहेब म्हणतील तसे, असे मानणारा वर्ग राष्ट्रवादीसोबत आहे. त्यामुळे तो साहेबांसोबत जाणार की राजेंसोबत, हे देखील आगामी काळात स्पष्ट होईल.भाजपमध्ये आयारामांची संख्या वाढतेय...लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपचेच सरकार पुन्हा येईल, असे अनेकांना वाटत आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत भाजपमध्ये जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. निवडणुकीतील जागा एक किंवा दोन आणि इच्छुकांची संख्या डझनभर. अशा स्थितीमुळे माझा कुणा म्हणू मी, अशीच भाजपची स्थिती झाली आहे.उदयनराजेंचा राजकीय फायद्यासाठी वापरखासदार उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून लढले तर माढा मतदारसंघातील उमेदवाराचा विजय सोपा होईल, ही राष्ट्रवादीची रणनीती आहे. त्यामुळे उदयनराजेंना डावलून चालणार नाही, असे राष्ट्रवादीतील जाणकारांचे मत आहे. उदयनराजे इतर पक्षात गेले तर दोन्ही मतदारसंघ हातातून जाण्याची भीती असल्यामुळेच उदयनराजेंची उमेदवारी शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहणार आहे.कार्यकर्त्यांचे दबावतंत्र उपयोगी पडणार का..?खासदार उदयनराजे भोसले किंवा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले दोन्ही नेते लगेच कुठेही जात नाहीत, हे सर्वांना माहिती आहे. फक्त कार्यकर्त्यांच्या पातळीवर दबाव टाकून आपल्या पदरात जेवढे पाडून घेता येईल तेवढे घेण्याचा हा प्रयत्न आहे.स्थानिक पातळीवर स्वत: आणि कार्यकर्त्यांना सुरक्षित करून घेण्यासाठी ही व्यूहरचना आखली जात आहे. याची पक्षातील नेत्यांनाही जाणीव आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे म्हणणे किती गांभीर्याने घेतले जाणार, हा प्रश्नच आहे. कारण उद्या उदयनराजे किंवा शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादीत थांबण्याचा किंवा बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर कार्यकर्त्यांना सोबत राहावेच लागणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर