शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

संधीसाधू राजकारण्यांना सळो की पळो करणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 19:27 IST

शिवसेना-राष्ट्रवादी-काँगे्रस या तिन्ही पक्षांनी सत्तेवर येण्याआधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पूर्ण करावे, इतकीच आमची मागणी आहे. - राजू शेट्टी, माजी खासदार, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

ठळक मुद्दे सरसकट सातबारा कोरा करण्यावर ठामी, त्यांनी अपेक्षाभंग केला तर शेतक-यांचा हिसका दाखवू. शेतक-यांची चळवळ महत्त्वाची आहे.

सागर गुजर ।सातारा : शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो शेतात ऊन, वारा आणि पावसाचा विचार न करता कष्ट करतो, म्हणून सर्वांनाच चार घास सुखाचे मिळतात. महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण करावे, ही आमची मागणी आहे. साताºयात आज कर्जमुक्ती मेळावा घेतलाय. सातबारा कोरा झाला नाही तर सरकारला सळो की पळो करून सोडू,’ असा इशारा शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत दिला आहे.

प्रश्न : ऊस दराबाबत स्वाभिमानीची नेमकी भूमिका काय आहे?उत्तर : ऊस दराच्याबाबतीत जयसिंगपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय ऊस परिषदेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपली भूमिका आधीच मांडली आहे. कायद्यानुसार एफआरपी व अधिकचे २०० रुपये कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यावेत, अशी आमची मागणी आहे. पहिल्या टप्प्यात एकरकमी एफआरपी आणि नंतर २०० रुपये देण्यावर आम्ही ठाम आहोत.

प्रश्न : योग्य ऊसदर न देणाºया कारखान्यांविरोधात काय करणार?उत्तर : योग्य ऊसदर न देणाºया कारखान्यांनी तशीच भूमिका ठेवल्यास त्यांच्याविरोधात कुठल्याही क्षणी आंदोलन करू, या कारखान्यांवर कारवाई करण्याचा ठराव करून तो साखर आयुक्तांना सादर करणार आहोत.

प्रश्न : सूडाच्या राजकारणामुळे शेतकºयांचा काय तोटा होतोय?उत्तर : भाजपचे सरकार होते तेव्हा कारखानदारांवर दबाव टाकून त्यांना भाजपमध्ये घेण्यात आले. शेतकºयांवर अन्याय होत असल्याचे दिसत असतानाही संबंधित कारखानदारांवर कोणतीही कारवाई झाली नाही. पदरात पाडून पवित्र करण्याचा जो कार्यक्रम भाजपने राबवला, तोच सध्याच्या सरकारने पुढे चालू ठेवला तर त्यांनाही आम्ही ढिले सोडणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

प्रश्न : शेतकरी हितासाठी कोणता राजकीय बदल अपेक्षित आहे?उत्तर : शेतकºयांनी आपली ताकद ओळखली पाहिजे. शेतकºयांची ‘व्होट बँक’ तयार झाल्याशिवाय प्रस्थापितांना धडा मिळणार नाही. सत्ता आणण्याची किमया शेतकरी करून दाखवू शकतात. त्यासाठी शेतकºयांमध्ये जागृती निर्माण होणे हेही तितकेच जरुरीचे आहे.

सख्खा भाऊ जरी नेता असला तरी...उसाला भाव मिळत नसला तरी साखरेला चांगला भाव मिळतो. कारखानदार हेही शेतकऱ्यांचीच पोरं आहेत. कारखानदारीच्या जीवावर विधानसभा, लोकसभा निवडणुका लढवतात. मग ते शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका का घेत नाहीत? हा सर्वच शेतकºयांना प्रश्न पडतो. सख्खा भाऊ जरी राजकारणात जाऊन शेतकरीविरोधी भूमिका घेत असेल तरी त्याला खाली खेचण्याची मानसिकता शेतकºयांनी घ्यायला हवी.

काँगे्रसवालेही साधू-संत नाहीतशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आम्ही भाजपला मदत केली. त्यांना सत्तेत बसवलं. केंद्राने शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले नाहीत. उलट दुर्लक्षच केलं. त्यामुळे आम्ही त्यांची साथ सोडली व काँगे्रस-राष्ट्रवादीसोबत गेलो. भाजपवाल्यांनाच स्वर्ग दोन बोटेच उरला होता, त्यांचे गर्वहरण करणे जरुरीचे होते. आता राष्ट्रवादी-काँगे्रस सोबत आहे, म्हणजे ते साधू-संत आहेत म्हणून नाही, त्यांनी अपेक्षाभंग केला तर शेतक-यांचा हिसका दाखवू. शेतक-यांची चळवळ महत्त्वाची आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना