शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

संधीसाधू राजकारण्यांना सळो की पळो करणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 19:27 IST

शिवसेना-राष्ट्रवादी-काँगे्रस या तिन्ही पक्षांनी सत्तेवर येण्याआधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पूर्ण करावे, इतकीच आमची मागणी आहे. - राजू शेट्टी, माजी खासदार, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

ठळक मुद्दे सरसकट सातबारा कोरा करण्यावर ठामी, त्यांनी अपेक्षाभंग केला तर शेतक-यांचा हिसका दाखवू. शेतक-यांची चळवळ महत्त्वाची आहे.

सागर गुजर ।सातारा : शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो शेतात ऊन, वारा आणि पावसाचा विचार न करता कष्ट करतो, म्हणून सर्वांनाच चार घास सुखाचे मिळतात. महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण करावे, ही आमची मागणी आहे. साताºयात आज कर्जमुक्ती मेळावा घेतलाय. सातबारा कोरा झाला नाही तर सरकारला सळो की पळो करून सोडू,’ असा इशारा शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत दिला आहे.

प्रश्न : ऊस दराबाबत स्वाभिमानीची नेमकी भूमिका काय आहे?उत्तर : ऊस दराच्याबाबतीत जयसिंगपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय ऊस परिषदेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपली भूमिका आधीच मांडली आहे. कायद्यानुसार एफआरपी व अधिकचे २०० रुपये कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यावेत, अशी आमची मागणी आहे. पहिल्या टप्प्यात एकरकमी एफआरपी आणि नंतर २०० रुपये देण्यावर आम्ही ठाम आहोत.

प्रश्न : योग्य ऊसदर न देणाºया कारखान्यांविरोधात काय करणार?उत्तर : योग्य ऊसदर न देणाºया कारखान्यांनी तशीच भूमिका ठेवल्यास त्यांच्याविरोधात कुठल्याही क्षणी आंदोलन करू, या कारखान्यांवर कारवाई करण्याचा ठराव करून तो साखर आयुक्तांना सादर करणार आहोत.

प्रश्न : सूडाच्या राजकारणामुळे शेतकºयांचा काय तोटा होतोय?उत्तर : भाजपचे सरकार होते तेव्हा कारखानदारांवर दबाव टाकून त्यांना भाजपमध्ये घेण्यात आले. शेतकºयांवर अन्याय होत असल्याचे दिसत असतानाही संबंधित कारखानदारांवर कोणतीही कारवाई झाली नाही. पदरात पाडून पवित्र करण्याचा जो कार्यक्रम भाजपने राबवला, तोच सध्याच्या सरकारने पुढे चालू ठेवला तर त्यांनाही आम्ही ढिले सोडणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

प्रश्न : शेतकरी हितासाठी कोणता राजकीय बदल अपेक्षित आहे?उत्तर : शेतकºयांनी आपली ताकद ओळखली पाहिजे. शेतकºयांची ‘व्होट बँक’ तयार झाल्याशिवाय प्रस्थापितांना धडा मिळणार नाही. सत्ता आणण्याची किमया शेतकरी करून दाखवू शकतात. त्यासाठी शेतकºयांमध्ये जागृती निर्माण होणे हेही तितकेच जरुरीचे आहे.

सख्खा भाऊ जरी नेता असला तरी...उसाला भाव मिळत नसला तरी साखरेला चांगला भाव मिळतो. कारखानदार हेही शेतकऱ्यांचीच पोरं आहेत. कारखानदारीच्या जीवावर विधानसभा, लोकसभा निवडणुका लढवतात. मग ते शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका का घेत नाहीत? हा सर्वच शेतकºयांना प्रश्न पडतो. सख्खा भाऊ जरी राजकारणात जाऊन शेतकरीविरोधी भूमिका घेत असेल तरी त्याला खाली खेचण्याची मानसिकता शेतकºयांनी घ्यायला हवी.

काँगे्रसवालेही साधू-संत नाहीतशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आम्ही भाजपला मदत केली. त्यांना सत्तेत बसवलं. केंद्राने शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले नाहीत. उलट दुर्लक्षच केलं. त्यामुळे आम्ही त्यांची साथ सोडली व काँगे्रस-राष्ट्रवादीसोबत गेलो. भाजपवाल्यांनाच स्वर्ग दोन बोटेच उरला होता, त्यांचे गर्वहरण करणे जरुरीचे होते. आता राष्ट्रवादी-काँगे्रस सोबत आहे, म्हणजे ते साधू-संत आहेत म्हणून नाही, त्यांनी अपेक्षाभंग केला तर शेतक-यांचा हिसका दाखवू. शेतक-यांची चळवळ महत्त्वाची आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना