शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

उद््घाटन झोकात; पाणी नाही रानात!

By admin | Updated: November 9, 2014 23:28 IST

तारळे-बांबवडे योजना : पोटपाटाचे काम रखडल्याने शेतकरी हवालदिल

तारळे : तारळे-बांबवडे उपसा सिंचन योजनेचे उद्घाटन होऊन वर्ष व्हायला आले तरी अजून पोटपाटाच्या कामाला सुरूवात झाली नाही. शेतकऱ्यांच्या उशाला धरण असूनही घशाला कोरड पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. निदान यंदा तरी शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तारळी नदीवर बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून तारळे व बांबवडे उपसा सिंचन योजनेची दोन पंपहाऊस बांधून पाईपलाईनची कामे पूर्ण झाली आहेत. यातून शेतीला पन्नास मीटर हेडपर्यंत पाणी उचलून देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. फक्त पावसाळ्यात पाणी मिळणारी शेती बारमाही पाण्यासाठी आसुसली आहे. मात्र पोटपाटाच्या पाण्याला मुहूर्त मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.पाण्याअभावी शेतातील पिके करपून जात आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा राहतो. शेती आहे; मात्र पाण्यावाचून तारळे भागातील शेतकरी हतबल झाला आहे. अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून मात्र केवळ कागदी घोडे नाचविण्यात येत आहेत. त्यामुळे शासनाकडून चालढकल होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. पाणी उपलब्ध असूनही शेतीला मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. तारळे व बांबवडे उपसा सिंचन योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. जवळपास वर्षभरानंतरही पोटपाटाच्या कामात चालढकल होत असताना शेतकऱ्यांना नदीतून वाहणाऱ्या पाण्याकडे बघत बसावे लागत आहे. (वार्ताहर)शेकडो हेक्टर क्षेत्र वंचिततारळे भागातील शेकडो हेक्टर जमीन पाण्यावाचून वंचित आहे. संबंधित विभाग आज काम सुरू होईल, उद्या होईल, अशी आश्वासने देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमून संताप व्यक्त होत आहे.बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या पोटपाटाचे काम कण्हेर विकास विभागाकडे आहे. एक महिन्यानंतर पोटपाटाच्या कामांना सुरूवात करण्यात येणार आहे.- संजय पाटील,उपअभियंता, नागठाणे कार्यालय तारळे-बांबवडे उपसा सिंचन योजना अजून पोटपाटाच्या प्रतीक्षेत आहे.