शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

रस्त्याच्या मध्यभागी ‘पोल’ खोल!

By admin | Updated: February 20, 2015 23:10 IST

वाहनचालकांची त्रेधातिरपीट : साताऱ्यातील रस्त्यांवर तब्बल २८ खांबांचा खो-खो

दत्ता यादव - सातारा  -शहराचा विस्तार होण्यापूर्वी ‘वीजवितरण’तर्फे रस्त्याच्या कडेला विद्युत पोल उभारण्यात आले. मात्र, लोकसंख्या आणि वाहनांची संख्या जसजसी वाढली, तसे रस्ते अपुरे पडू लागले. सगळ्यात मोठा अडथळा ठरत होता ते रस्त्यातील विद्युत पोलचा. जवळपास शहरात सध्या २८ असे अडथळा ठरणारे पोल आहेत. हे पोल काढण्यासाठी पालिकेला मोठी कसरत करावी लागणार आहे. हे पोल काढले तर रस्ते अगदी ऐसपैस होतील. सुरक्षित वाहतुकीसाठी ‘पोलमुक्त रस्ता अभियान’ राबविण्याच्या सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेला नुकत्याच दिल्या आहेत. यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शुक्रवारी शहर व परिसरामध्ये फेरफटका मारून रस्त्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या पोलची संख्या मोजली. वाहनांना अडथळा ठरणारे २८ पोल निदर्शनास आले. परंतु आणखी असे बरेच पोल आहेत. मात्र, ते पोल टेलिफोन विभागाचे आहेत. हे पोलही काढणे गरजेचे आहे. अनेकदा रात्री-अपरात्री पोलवर वाहने धडकून अपघात झाले आहेत. काहीजण जायबंदी झाले, तर काहीजणांना चक्क आपला जीवही गमवावा लागला आहे. काही वर्षांपूर्वी समर्थ मंदिर येथे रस्त्यामधील पोलमुळे एका शाळकरी मुलीला जीव गमवावा लागला. ट्रक चालकाला समोरचा पोल दिसला नाही. अचानक पोल आडवा आल्यामुळे त्या ट्रक चालकाने ट्रक दुसरीकडे वळविला. त्यावेळी शाळकरी मुलगी तेथून पायी निघाली होती. त्या ट्रकने मुलीला धडक दिली. तिला रुग्णालयात नेईपर्यंत वाटेतच तिचा मृत्यू झाला. अशा प्रकारच्या घटना अनेकदा घडतात; परंतु केवळ पोलमुळे अशी घटना घडली असेल तर नेमका दोष कोणाला द्यायचा, अशी स्वत: ची समजूत घालून नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. पालिकेने ही पोलमुक्तीची मोहीम हाती घेतल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. पावसाळ्यात लोखंडी पोलमध्ये अचानक विद्युत प्रवाह जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला होता. पालिकेने हाती घेतलेली ही मोहीम पूर्णत्वास न्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे. शाळेतून घरी रस्त्याने चालत जात असताना अनेक मुले खांबांना हात लावतात. अशावेळी जर त्यातून विद्यूत प्रवाह पोलमध्ये असेल तर जीव जाण्याचीही शक्यता आहे. तसेच सायकलवरून जात असताना मुले खांबांनाही धडकून अपघात झाले आहेत. त्यामुळे पोलीमुक्ती गरजेचीच आहे.म्हणे सर्व्हे करायला लागेल...शहरामध्ये पोलमुक्ती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असला तरी ‘एमएसईबी चे अधिकारी आणि कर्मचारी मात्र यापासून अनभिज्ञ आहेत. रस्त्यामधील पोल कायमस्वरूपी काढायचे असतील तर पहिल्यांदा सर्व्हे करावा लागेल. त्याला वरिष्ठांची मंजुरी लागते. त्यानंतरच हे रस्त्यामधील पोल काढण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. आमच्यापर्यंत हा प्रस्ताव आल्यास पोलमुक्तीसाठी आम्ही नक्कीच सहकार्य करू. परंतु त्याला नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे असल्याचेही एमएसईबीच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.