शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

रस्त्याच्या मध्यभागी ‘पोल’ खोल!

By admin | Updated: February 20, 2015 23:10 IST

वाहनचालकांची त्रेधातिरपीट : साताऱ्यातील रस्त्यांवर तब्बल २८ खांबांचा खो-खो

दत्ता यादव - सातारा  -शहराचा विस्तार होण्यापूर्वी ‘वीजवितरण’तर्फे रस्त्याच्या कडेला विद्युत पोल उभारण्यात आले. मात्र, लोकसंख्या आणि वाहनांची संख्या जसजसी वाढली, तसे रस्ते अपुरे पडू लागले. सगळ्यात मोठा अडथळा ठरत होता ते रस्त्यातील विद्युत पोलचा. जवळपास शहरात सध्या २८ असे अडथळा ठरणारे पोल आहेत. हे पोल काढण्यासाठी पालिकेला मोठी कसरत करावी लागणार आहे. हे पोल काढले तर रस्ते अगदी ऐसपैस होतील. सुरक्षित वाहतुकीसाठी ‘पोलमुक्त रस्ता अभियान’ राबविण्याच्या सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेला नुकत्याच दिल्या आहेत. यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शुक्रवारी शहर व परिसरामध्ये फेरफटका मारून रस्त्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या पोलची संख्या मोजली. वाहनांना अडथळा ठरणारे २८ पोल निदर्शनास आले. परंतु आणखी असे बरेच पोल आहेत. मात्र, ते पोल टेलिफोन विभागाचे आहेत. हे पोलही काढणे गरजेचे आहे. अनेकदा रात्री-अपरात्री पोलवर वाहने धडकून अपघात झाले आहेत. काहीजण जायबंदी झाले, तर काहीजणांना चक्क आपला जीवही गमवावा लागला आहे. काही वर्षांपूर्वी समर्थ मंदिर येथे रस्त्यामधील पोलमुळे एका शाळकरी मुलीला जीव गमवावा लागला. ट्रक चालकाला समोरचा पोल दिसला नाही. अचानक पोल आडवा आल्यामुळे त्या ट्रक चालकाने ट्रक दुसरीकडे वळविला. त्यावेळी शाळकरी मुलगी तेथून पायी निघाली होती. त्या ट्रकने मुलीला धडक दिली. तिला रुग्णालयात नेईपर्यंत वाटेतच तिचा मृत्यू झाला. अशा प्रकारच्या घटना अनेकदा घडतात; परंतु केवळ पोलमुळे अशी घटना घडली असेल तर नेमका दोष कोणाला द्यायचा, अशी स्वत: ची समजूत घालून नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. पालिकेने ही पोलमुक्तीची मोहीम हाती घेतल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. पावसाळ्यात लोखंडी पोलमध्ये अचानक विद्युत प्रवाह जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला होता. पालिकेने हाती घेतलेली ही मोहीम पूर्णत्वास न्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे. शाळेतून घरी रस्त्याने चालत जात असताना अनेक मुले खांबांना हात लावतात. अशावेळी जर त्यातून विद्यूत प्रवाह पोलमध्ये असेल तर जीव जाण्याचीही शक्यता आहे. तसेच सायकलवरून जात असताना मुले खांबांनाही धडकून अपघात झाले आहेत. त्यामुळे पोलीमुक्ती गरजेचीच आहे.म्हणे सर्व्हे करायला लागेल...शहरामध्ये पोलमुक्ती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असला तरी ‘एमएसईबी चे अधिकारी आणि कर्मचारी मात्र यापासून अनभिज्ञ आहेत. रस्त्यामधील पोल कायमस्वरूपी काढायचे असतील तर पहिल्यांदा सर्व्हे करावा लागेल. त्याला वरिष्ठांची मंजुरी लागते. त्यानंतरच हे रस्त्यामधील पोल काढण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. आमच्यापर्यंत हा प्रस्ताव आल्यास पोलमुक्तीसाठी आम्ही नक्कीच सहकार्य करू. परंतु त्याला नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे असल्याचेही एमएसईबीच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.