शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

उन्हाळ्याची चाहूल लागल्याने मातीच्या माठांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:36 IST

कुडाळ : सध्या सगळीकडेच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. भरदुपारी लोक घराबाहेर पडणेही टाळत आहेत. उन्हाचे चटके बसू लागल्याने ...

कुडाळ : सध्या सगळीकडेच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. भरदुपारी लोक घराबाहेर पडणेही टाळत आहेत. उन्हाचे चटके बसू लागल्याने गारव्यासाठी थंड पेयांची मागणी होत आहे. उसाच्या रसवंतीगृहाची किणकिण कानी पडू लागली आहे. अशातच घरोघरी थंड पाणी पिण्यासाठी गरिबांचा फ्रीज असणाऱ्या मातीच्या माठांची मागणी होऊ लागली आहे.

‘जुने ते सोने’ ही म्हण प्रचलित आहे. उन्हाच्या दाहकतेपासून वाचविण्यासाठी मातीच्या माठातील पाण्यानेच तहान मिटते. उन्हाळ्यात तहान लागल्यावर थंड पाणी पिण्याची तीव्र इच्छा होते. यावेळी बहुतेकजण फ्रीजमधीलच पाणी पितात. मात्र, देशी फ्रीज म्हटल्या जाणाऱ्या माठातील पाण्याची चवच काही निराळीच असते. माठातील पाणी हे आरोग्यासाठी चांगले असते. यात अनेक रोगांशी लढण्याची ताकद असते. उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी फायदेशीर असते. तसेच मातीत मुबलक मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. याचा आरोग्यासाठी चांगलाच फायदा होता. यामुळे आरोग्याचा विचार करून या मातीच्या माठांची मागणी होऊ लागली आहे.

चौकट :

विजेची ना झंजट

उन्हाळ्यात बऱ्याचदा वीजपुरवठा खंडित होतो. यावेळी तहान भागवण्यासाठी फ्रीजमधील थंड पाणी उपलब्ध होत नाही. तसेच याकरिता विजेचा खर्चही होतो. याउलट मातीचे माठ सच्छिद्र असल्याने यामध्ये नैसर्गिकरीत्या पाणी थंड होण्यास मदत होते. कोणताही खर्च न होता माठातील पाणी मिळते. त्यामुळे थंड पाण्यासाठी अतिशय स्वस्त, पर्यावरणपूरक व आरोग्यदायी असा पर्याय मिळत आहे.