शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

लॉकडाऊननंतर केवळ वीस टक्के फेऱ्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST

सातारा : कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर राज्यातील सर्वच सार्वजनिक वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला अन् तब्बल सात ते आठ महिने ...

सातारा : कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर राज्यातील सर्वच सार्वजनिक वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला अन् तब्बल सात ते आठ महिने एसटीची सेवा बंद होती. त्याचा एसटीला चांगलाच फटका बसला आहे. आता परिस्थिती सुधारत असून, सध्या ऐंशी टक्के बस फेऱ्या सुरू आहेत, तर उर्वरित वीस टक्के फेऱ्या लवकरच सुरू होतील, असा अधिकाऱ्यांना विश्वास आहे.

कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. एसटीच्या सर्वच गाड्या बंद होत्या. त्यानंतर पन्नास टक्के उपस्थितीवर बस धावू लागल्या. मात्र संसर्गाचीच भीती असल्याने प्रवासी घरातून बाहेर पडलेच नाहीत. पण त्यातूनही सावरण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत आहेत.

राज्य परिवहन महामंडळाचे साताऱ्याचे विभाग नियंत्रक सागर पळसुले यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रयोग राबविले जात आहेत. यामध्ये सर्वच आगारातून राज्यातील लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू केल्या आहेत. त्या यापूर्वी कधीही धावत नव्हत्या. त्यामुळे सातारा विभागाला नवीन लाइन मिळाली आहे. तसेच मालवाहतूक विभाग सशक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यांना प्रतिसाद मिळत आहे. पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळेही आणखी सुधारणा होणार आहे.

चौकट :

दुर्गम भागात कमी फेऱ्या

सातारा जिल्ह्यातील बहुतांश भाग दुर्गम आहे. त्या ठिकाणी लहान लहान गावे, वाड्या-वस्त्या आहेत. तेथील लोकसंख्याही कमी असल्याने एसटीला फारसे उत्पन्न मिळत नाही. पेट्री परिसरात ग्रामस्थांच्या मागणीनुसार एसटीच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. मात्र चिकणवाडी तसेच वांजळवाडी मार्गे जाणारी धावलीची फेरी अद्याप सुरू झालेली नाही.

कोट १

चिकणवाडी हे गाव दुर्गम भागात असून आजारी रुग्ण तसेच प्रशासकीय कामासाठी ग्रामस्थांना साताऱ्यात यावे लागते. माध्यमिकचे विद्यार्थ्यांना साताऱ्यात यावे लागते; मात्र या मार्गावरील एसटी अद्याप सुरू नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

- गणेश चिकणे, ग्रामस्थ चिकणवाडी

कोट २

कास पठार परिसरातील विविध गावांच्या ग्रामस्थांनी एसटी पुन्हा सुरू करण्याबाबत विभाग नियंत्रक सागर पळसुले यांना निवेदन दिले होते. याची दखल घेऊन आता एसटी पूर्ववत सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी सुरू केल्यास गैरसोय दूर होणार आहे.

- सोमनाथ जाधव, अध्यक्ष कास पठार विकास प्रतिष्ठान

कोट :

शाळा सुरू झाल्यानंतर एसटीच्या फेऱ्या ग्रामीण भागातून शहरात वाढविल्या आहेत. त्याचप्रमाणे सर्व आगारप्रमुखांना मागणीनुसार फेऱ्या वाढविण्याबाबत सूचना केल्या आहेत.

- ज्योती गायकवाड,

विभागीय वाहतूक अधिकारी, सातारा

आगारनिहाय गाड्या

आगार पूर्वी आता

सातारा १२९ १०१

कऱ्हाड ८४ ७०

कोरेगाव ५१ ३७

फलटण ८८ ७२

वाई ५६ ४४

पाटण ५२ ४४

दहिवडी ४४ ३७

महाबळेश्वर ४४ ४१

मेढा ५० ४१

खंडाळा ३९ ३१

वडूज ५६ ४९

एकूण ५९३ ६६७