शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

जिल्ह्यात केवळ पाच बालरोग तज्ज्ञ असताना तिसरी लाट कशी रोखणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:27 IST

सातारा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त धोका हा बालकांना असल्याचे सांगण्यात येत असतानाच सातारा जिल्ह्यात ही लाट रोखण्यासाठी ...

सातारा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त धोका हा बालकांना असल्याचे सांगण्यात येत असतानाच सातारा जिल्ह्यात ही लाट रोखण्यासाठी केवळ पाच डॉक्टर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार सुरू आहे. ही लाट अद्याप ओसरली नसतानाच तिसऱ्या लाटेचे संकेत प्रशासनाकडून दिले जात आहेत. या तिसऱ्या लाटेचा सर्वात जास्त धोका हा बालकांना असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये बालरोगतज्ज्ञ किती आहेत, याचा आढावा घेतला असता, धक्कादायक माहिती समोर आली. जिल्ह्यात एकूण ७८ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या एकाही केंद्रामध्ये बालरोगतज्ज्ञ नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये जर तिसरी लाट फैलावली तर ती कशी आटोक्यात आणणार, असा मोठा प्रश्‍न प्रशासनासमोर आ वासून उभा आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये केवळ पाच बालरोगतज्ज्ञ आहेत. या पाच डॉक्टरांवरच सर्व अवलंबून असणार आहे.

सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्यामुळे आरोग्य विभाग ही लाट थोपविण्यासाठी प्रयत्न करत आहे. अद्याप तिसऱ्या लाटेचीच प्रशासनाकडून कसलीही तयारी झालेली पाहायला मिळत नाही. पण जर ही तिसरी लाट आली तर अचानक बालरोगतज्ज्ञ कोठून आणणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तिथले आरोग्य अधिकारी हेच बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करतात. त्यामुळे स्वतंत्र बालरोगतज्ज्ञांची नेमणूक करण्यात आलेली नाही. पण आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये बालरोगतज्ज्ञांची नेमणूक करावी लागणार आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य पालकांना उपचार घेणे परवडणारे नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आत्तापासूनच बालरोगतज्ज्ञांच्या नेमणुकीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

चौकट : ग्रामीण भागातील स्थिती वाईट

सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्याची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. या परिस्थितीशी प्रशासन दोन हात करत असतानाच आता तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. ग्रामीण भागामध्ये बालकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागांमध्ये बालकांवर योग्य उपचार होण्यासाठी बालरोगतज्ज्ञांची फौज प्रशासनाजवळ असणे गरजेचे आहे.

चौकट : स्वतंत्र वॉर्ड उभारण्याची गरज

जिल्ह्यात जर तिसरी लाट आली तर बालकांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड उभारण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने आतापासूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे. ऐनवेळी जर धावाधाव करावी लागली तर मोठी हानी होऊ शकते, असेही काही डॉक्टरांनी खासगीत बोलताना सांगितले.

कोट:

सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यासाठी आमचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. तिसरी लाट जरी आली तरी या लाटेला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आमची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. प्रशासनाकडून आणखी मनुष्यबळ मागवले जाईल.

- डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा

...........

चौकट

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र - ७६

बालरोग तज्ज्ञ - ०

जिल्ह्यातील एकूण रुग्ण - १,६९,३१४

बरे झालेले रुग्ण - १,४३,२११

उपचार घेत असलेले रुग्ण- २०,०१७

१० वर्षेपेक्षा कमी वयाचे रुग्ण- ७,०३८

११ ते १८ वर्षे वयोगटातील रुग्ण - ११९५९

जिल्हा शासकीय रुग्णालय बालरोगतज्ज्ञ - ५