शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

सरपंचपदाच्या आरक्षणानंतरच राजकारणाचं साटंलोटं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील ८७८ पैकी २२३ ग्रामपंचायती समजुतीने बिनविरोध केल्या गेल्या. मात्र ६५२ ग्रामपंचायतींत कार्यकर्त्यांमध्ये टोकाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील ८७८ पैकी २२३ ग्रामपंचायती समजुतीने बिनविरोध केल्या गेल्या. मात्र ६५२ ग्रामपंचायतींत कार्यकर्त्यांमध्ये टोकाची ईर्ष्या पाहायला मिळाली. बहुतांश ग्रामपंचायतींत वातावरण हातघाईवर गेले. आता मात्र सरपंचपदाचे आरक्षणच जाहीर झालेले नसल्याने स्थानिक राजकारण्यांचे चेहरे भलतेच ओशाळले आहेत. आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकारणाचं आगळंवेगळं साटंलोटं गावागावांत पाहायला मिळेल आणि निवडणुकीत एकमेकांवर तोंडसुख घेणारेच पुढे मांडीला मांडी लावून बसण्याची शक्यता आहे.

सन १९९९ पासून जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणामध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी ठरले आहेत. ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या दोन पक्षांमधील राजकारणाचे तांडव जिल्ह्याने पाहिले आहे. आता मात्र चित्र बदलले आहे. काँग्रेसची या स्पर्धेतून पीछेहाट झाली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने हे स्थान मिळविले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या टोप्या बाजूला ठेवून भाजपचा फड्या गळ्यात घातलेल्या नेत्यांच्या जिवावर भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला शह देण्यासाठी उतरलेली पाहायला मिळतेय. ग्रामपंचायतींच्या संख्याबळावरून तरी शहरी चेहरा असलेला भाजप हा पक्ष आता गावच्या पारापर्यंत पोहोचला आहे.

शिवसेनेचे संख्याबळही ग्रामपंचायत निवडणुकीत वाढलेले आहे. कोरेगाव विधानसभा मतदार संघामध्ये तर शिवसेनेनेच भाजपला सोबत घेऊन राष्ट्रवादीची जिरवण्यासाठी प्रयत्न केले. वाई मतदारसंघातही ‘दगडापेक्षा वीट मऊ’ म्हणत राष्ट्रवादीने काँग्रेसला बाजूला ठेवण्यासाठी काही ठिकाणी भाजपला जवळ केले. राज्यात भलेही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार असले तरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये या पक्षांनी स्वतंत्रपणे लढून ताकद अजमावलेली दिसते.

अनैसर्गिक युत्यांच्या खेळात सरपंचपदाचं कसं होणार? हा प्रश्न आता स्थानिक नेत्यांना पडलेला आहे. सरपंचपदाचं कुठलं आरक्षण बुडतंय याचीच चर्चा निवडणूक झालेल्या प्रत्येक गावात सुरू आहे. राजकारणातील कुरघोड्या बक्कळ झाल्या. आता सरपंचाचं आरक्षणच जर उलटलं तर सगळं मुसळ केरात जाणार... ही भीती स्थानिक नेत्यांना सतावते आहे.

अशी पहिलीच वेळ

स्थानिक स्वराज्य संस्थेपासून विधानसभा, लोकसभा निवडणुकीपर्यंत आधी आरक्षण जाहीर केले जाते व त्यानंतर निवडणूक प्रक्रिया घेतली जाते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मात्र नेमका उलटा प्रवाह झाला आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक ही सरपंच आरक्षण प्रक्रिया पार पडण्याआधीच जाहीर झाली. आता निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण घेण्याची ही पहिल्यांदाच वेळ आलेली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय नेतेमंडळींची चांगलीच गोची झाली आहे.

प्रशासनाची लगीनघाई

जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींमध्ये सात हजार २६६ सदस्य निवडून आले आहेत. या सदस्यांची प्रभागनिहाय व आरक्षणनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गावातील चावडी, पंचायत समिती व तहसीलदार कार्यालयाच्या नोटीस बोर्डावरही लावण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी ठरवून देणार कोटा

निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ३० दिवसांच्या आतमध्ये सरपंच आरक्षण घोषित करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी प्रत्येक तालुक्यासाठी आरक्षणाचा कोटा जाहीर करतील. त्यानुसार आरक्षण काढण्याची प्रक्रिया तहसीलदारांमार्फत करण्यात येणार आहे.