शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाच्या आरक्षणानंतरच राजकारणाचं साटंलोटं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील ८७८ पैकी २२३ ग्रामपंचायती समजुतीने बिनविरोध केल्या गेल्या. मात्र ६५२ ग्रामपंचायतींत कार्यकर्त्यांमध्ये टोकाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील ८७८ पैकी २२३ ग्रामपंचायती समजुतीने बिनविरोध केल्या गेल्या. मात्र ६५२ ग्रामपंचायतींत कार्यकर्त्यांमध्ये टोकाची ईर्ष्या पाहायला मिळाली. बहुतांश ग्रामपंचायतींत वातावरण हातघाईवर गेले. आता मात्र सरपंचपदाचे आरक्षणच जाहीर झालेले नसल्याने स्थानिक राजकारण्यांचे चेहरे भलतेच ओशाळले आहेत. आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकारणाचं आगळंवेगळं साटंलोटं गावागावांत पाहायला मिळेल आणि निवडणुकीत एकमेकांवर तोंडसुख घेणारेच पुढे मांडीला मांडी लावून बसण्याची शक्यता आहे.

सन १९९९ पासून जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणामध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी ठरले आहेत. ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या दोन पक्षांमधील राजकारणाचे तांडव जिल्ह्याने पाहिले आहे. आता मात्र चित्र बदलले आहे. काँग्रेसची या स्पर्धेतून पीछेहाट झाली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने हे स्थान मिळविले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या टोप्या बाजूला ठेवून भाजपचा फड्या गळ्यात घातलेल्या नेत्यांच्या जिवावर भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला शह देण्यासाठी उतरलेली पाहायला मिळतेय. ग्रामपंचायतींच्या संख्याबळावरून तरी शहरी चेहरा असलेला भाजप हा पक्ष आता गावच्या पारापर्यंत पोहोचला आहे.

शिवसेनेचे संख्याबळही ग्रामपंचायत निवडणुकीत वाढलेले आहे. कोरेगाव विधानसभा मतदार संघामध्ये तर शिवसेनेनेच भाजपला सोबत घेऊन राष्ट्रवादीची जिरवण्यासाठी प्रयत्न केले. वाई मतदारसंघातही ‘दगडापेक्षा वीट मऊ’ म्हणत राष्ट्रवादीने काँग्रेसला बाजूला ठेवण्यासाठी काही ठिकाणी भाजपला जवळ केले. राज्यात भलेही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार असले तरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये या पक्षांनी स्वतंत्रपणे लढून ताकद अजमावलेली दिसते.

अनैसर्गिक युत्यांच्या खेळात सरपंचपदाचं कसं होणार? हा प्रश्न आता स्थानिक नेत्यांना पडलेला आहे. सरपंचपदाचं कुठलं आरक्षण बुडतंय याचीच चर्चा निवडणूक झालेल्या प्रत्येक गावात सुरू आहे. राजकारणातील कुरघोड्या बक्कळ झाल्या. आता सरपंचाचं आरक्षणच जर उलटलं तर सगळं मुसळ केरात जाणार... ही भीती स्थानिक नेत्यांना सतावते आहे.

अशी पहिलीच वेळ

स्थानिक स्वराज्य संस्थेपासून विधानसभा, लोकसभा निवडणुकीपर्यंत आधी आरक्षण जाहीर केले जाते व त्यानंतर निवडणूक प्रक्रिया घेतली जाते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मात्र नेमका उलटा प्रवाह झाला आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक ही सरपंच आरक्षण प्रक्रिया पार पडण्याआधीच जाहीर झाली. आता निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण घेण्याची ही पहिल्यांदाच वेळ आलेली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय नेतेमंडळींची चांगलीच गोची झाली आहे.

प्रशासनाची लगीनघाई

जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींमध्ये सात हजार २६६ सदस्य निवडून आले आहेत. या सदस्यांची प्रभागनिहाय व आरक्षणनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गावातील चावडी, पंचायत समिती व तहसीलदार कार्यालयाच्या नोटीस बोर्डावरही लावण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी ठरवून देणार कोटा

निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ३० दिवसांच्या आतमध्ये सरपंच आरक्षण घोषित करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी प्रत्येक तालुक्यासाठी आरक्षणाचा कोटा जाहीर करतील. त्यानुसार आरक्षण काढण्याची प्रक्रिया तहसीलदारांमार्फत करण्यात येणार आहे.