शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

धोम धरणात केवळ चाळीस टक्केच पाणी

By admin | Updated: October 5, 2015 00:17 IST

पाणीपातळी घटली : बळीराजाची चिंता वाढली; पावसाअभावी मे महिन्यासारखी परिस्थिती

पसरणी : वाई तालुक्यातील धोम-बलकवडी ही धरणे दरवर्षी आॅगस्टअखेर पूर्ण क्षमतेने भरलेली असतात; मात्र यंदा पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या धोम व वाई तालुक्यातच पावसाने पूर्णत: उघडीप दिल्याने पावसाचा हंगाम कोरडा गेला. जूनच्या सुरुवातीला झालेल्या थोड्या पावसाने पाणी पातळीत थोडीशी भर पडली होती. मात्र, तेही पाणी आसरे बोगदा व कॅनॉलद्वारे सोडण्यात आले आणि त्यामुळे जेवढी पाण्याची पातळी वाढली होती, ती सुद्धा खालावली आहे.प्रमुख धोम धरणात केवळ ४० टक्के पाणीसाठा पाणीसाठा आहे. विशेषत: दोन्ही धरणांच्या दरवाजाला पाणीही लागले नाही. ज्या ठिकाणी पाण्याची पातळी आहे, ती दरवर्षी एप्रिल ते मे महिन्यांमध्ये असते. मात्र यंदा आॅक्टोबरमध्येच मे महिन्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला तसेच पिण्याचा पाणी व उपचार सिंचन योजनांना याचा फटका बसत आहे. विशेषत: हा सर्व भाग हा धरणग्रस्त आहे आणि आपल्या कहक्काचे पाणी आतामात्र आपल्याला प्राधान्याने मिळावे, अशी भावना नागरिकांतून होत आहे.धरणाची पाणीपातळी हा आॅक्टोबर महिन्यातच चिंतेचा विषय बनला आहे. अजून आगामी मान्सून येण्यासाठी आठ- नऊ महिने वाट पाहावी लागणार आहे. सध्या सुरू असणारा पावसाने धरण पातळीत किंचितही वाढ झाली नाही. विशेषत: धरण परिसरात हा पाऊस समाधानकारक असा पडला नसून धरण पातळी ‘जैसे थे’ आहे.धरण व्यवस्थापणापुढे पाणी व्यवस्थापणा बाबत अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. (वार्ताहर)पावसाने यंदा दाखवलेली अवकृपा व त्यामुळे धरणाच्या पातळीत वाढच झाली नाही आणि मग जर ४० टक्के पाणीसाठा शिल्लक असताना पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. -दत्तात्रय सुर्वे, शेतकरी धोम धरण हा १३.५० टीएमसीचा असून, धरण क्षेत्रात आजअखेर ४९५ मिमी पावसाची नोंद आहे. धरणाची पाणीपातळी ७३७ मीटर असून, सध्याचा पाणीसाठी १७६.५८ द.ल. घ.मी. म्हणजे ६.२३ टीएमसी व त्यातील उपयुक्त पाणीसाठी १२५.३१ द.ल. घ.मी. म्हणजे ४.४२ टीएमसी आहे. धरण आजअखेर ४० टक्के भरले आहे. एकूण १३.५० टीएमसीपैकी धरणातील ११.६९ टीएमसी हा एवढाच साठा उपयुक्त आहे. मात्र यंदा आजअखेर ४.४२ टीएमसी एवढाच साठा उपयुक्त म्हणून शिल्लक आहे.-सी. एस. सणस, शाखा अभियंता