शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

उरले अवघे ३३ टीएमसी पाणी

By admin | Updated: June 28, 2014 00:33 IST

सातारा जिल्हा : उरमोडी, तारळी वगळता कोठेही समाधानकारक साठा नाही

सातारा : सातारा जिल्हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, मात्र पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यामुळे धरणांच्या जिल्ह्यात अवघे ३३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. सातारा तालुक्यातील उरमोडी आणि पाटण तालुक्यातील तारळी प्रकल्प सोडला तर अन्य प्रकल्पांनी तळ गाठला आहे. जिल्ह्याची एकूण पाणीसाठवण क्षमता २३0 टीएमसीहून अधिक आहे तर पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी पाचशे टीएमसीच्या आसपास आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात फक्त १४.५४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा ३५.६५ टीएमसी इतका कमी आहे. विशेष म्हणजे कोयना धरणात उपलब्ध असणाऱ्या १४.५४ टीएमसीपैकी ७ टीएमसी पाणीसाठा मृत आहे.सातारा जिल्ह्यात कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, धोम-बलकवडी, महू, हातगेघर, नागेवाडी, मोरणा-गुरेघर, उत्तरमांड, तारळी, नीरा-देवघर, वांग-मराठवाडी तर पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असणारी वीर, भाटघर ही प्रमुख धरणे आहेत. इतर लघुपाटबंधारे प्रकल्प तसेच तलावांची संख्या अधिक आहे. या प्रकल्पातील एकूण पाणीसाठा २३0 टीएमसीहून अधिक आहे. आजमितीस विचार करता यापैकी फक्त ३३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी आजच्या दिवशी सर्वच धरणांमध्ये ८२ टीएमसी इतका पाणीसाठा होता.उरमोडी आणि तारळी धरण वगळता जिल्ह्यात इतर कोणत्याही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा नाही. पावसाचे आगमन आणखी लांबणीवर पडले तर भयंकर अशा दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, पावसानेही जिल्ह्यात दडी मारल्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. बहुतांशी भागात पेरण्या झाल्या असल्यातरी त्या ठिकाणीही आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. जिल्ह्यात यावर्षात आजअखेर ७९७ मि.मी. पाऊस झाला असून तालुकानिहाय सरासरी ७२.५ मि.मी. इतकी आहे. (प्रतिनिधी)