शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

उरले अवघे ३३ टीएमसी पाणी

By admin | Updated: June 28, 2014 00:33 IST

सातारा जिल्हा : उरमोडी, तारळी वगळता कोठेही समाधानकारक साठा नाही

सातारा : सातारा जिल्हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, मात्र पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यामुळे धरणांच्या जिल्ह्यात अवघे ३३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. सातारा तालुक्यातील उरमोडी आणि पाटण तालुक्यातील तारळी प्रकल्प सोडला तर अन्य प्रकल्पांनी तळ गाठला आहे. जिल्ह्याची एकूण पाणीसाठवण क्षमता २३0 टीएमसीहून अधिक आहे तर पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी पाचशे टीएमसीच्या आसपास आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात फक्त १४.५४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा ३५.६५ टीएमसी इतका कमी आहे. विशेष म्हणजे कोयना धरणात उपलब्ध असणाऱ्या १४.५४ टीएमसीपैकी ७ टीएमसी पाणीसाठा मृत आहे.सातारा जिल्ह्यात कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, धोम-बलकवडी, महू, हातगेघर, नागेवाडी, मोरणा-गुरेघर, उत्तरमांड, तारळी, नीरा-देवघर, वांग-मराठवाडी तर पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असणारी वीर, भाटघर ही प्रमुख धरणे आहेत. इतर लघुपाटबंधारे प्रकल्प तसेच तलावांची संख्या अधिक आहे. या प्रकल्पातील एकूण पाणीसाठा २३0 टीएमसीहून अधिक आहे. आजमितीस विचार करता यापैकी फक्त ३३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी आजच्या दिवशी सर्वच धरणांमध्ये ८२ टीएमसी इतका पाणीसाठा होता.उरमोडी आणि तारळी धरण वगळता जिल्ह्यात इतर कोणत्याही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा नाही. पावसाचे आगमन आणखी लांबणीवर पडले तर भयंकर अशा दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, पावसानेही जिल्ह्यात दडी मारल्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. बहुतांशी भागात पेरण्या झाल्या असल्यातरी त्या ठिकाणीही आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. जिल्ह्यात यावर्षात आजअखेर ७९७ मि.मी. पाऊस झाला असून तालुकानिहाय सरासरी ७२.५ मि.मी. इतकी आहे. (प्रतिनिधी)