शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

कांद्याने केला बळीराजाचा वांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST

पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डी मोही शिंगणापूरसह परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या पंधरा दिवसांपासून ...

पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डी मोही शिंगणापूरसह परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात कांदा काढणी व काटणीची कामे वेगात सुरू आहेत. मात्र कोसळलेल्या दरामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. सध्या प्रतिक्विंटल अवघा आठशे ते नऊशे रुपये दर मिळत आहे. भांडवली खर्चही निघत नसल्याने कांद्याने बळीराजाचा वांदा केल्याचे विदारक चित्र परिसरात दिसत आहे.

मागील वर्षी जून ते सप्टेंबरच्या दरम्यान कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. प्रतिक्विंटल चार ते साडेचार हजारांपर्यंत भाव होता. पण सप्टेंबरपर्यंत सलग व जोरदार पाऊस झाल्याने बऱ्याच जणांचा कांदा शेतातच नासून गेला तर अनेकांचा कांदा उगवलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्याकडे कांदाच नव्हता, अशी परिस्थिती होती.

पावसाने शेतीचे पूर्णपणे नुकसान होऊनही बळीराजाने पुन्हा नव्या जोमाने कांद्याची दुबार तर काहींनी तिबार पेरणी केली. पावसाने सगळीकडेच कांदा व रोपे नासून गेल्याने बियाणांचे दर प्रतिकिलो चार हजारांपर्यंत भडकले होते. तरीही उसनवारी करून दिवाळीच्या सुमारास पाच महिन्याचे गरवा कांदा बियाणे पुन्हा पेरले. सध्या सर्वत्र कांद्याची काढणी व काटणीची कामे जोमात सुरू असली तरी कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने काटलेल्या कांद्याचे करायचे काय, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे.

सध्या दर पडल्याने कांदा खरेदीसाठी व्यापारीही फिरकत नसल्याने शेतातच कांदा वाळून जाऊ लागला आहे. कांदा हेच या परिसरातील नगदी पीक म्हणून घेतले जाते. या पिकातून मिळालेला पैसा पुढच्या पिकात भांडवल म्हणून वापरला जातो; पण या हंगामात कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने खर्चाचे गणित कोलमडणार असल्याचे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे.

कांद्याला किमान दोन हजार दर मिळावा, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.

(चौकट)

भांडवली खर्चही निघेना..

सध्या आठशे ते नऊशे असा कवडीमोल दर असून, कांदा पिकासाठी मशागत, बियाणे, औषधे, खते, खुरपणी, काढणी काटणी, साठवण व्यवस्थापन अशा बाबींवर केलेला भांडवली खर्च पाहता शेतकरी पूर्णतः तोट्यात गेल्याचे दिसत आहे.

(चौकट)

बेरोजगारांचा सवाल...

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाने थैमान घातले असून, पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी काम करत असलेल्या अनेकांची लॉकडाऊनमुळे नोकरी गेली. भीतीने कित्येकजण आज गावी शेतीत राबत आहेत. पण शेतमालाला दर नसल्याने आगीतून फुफाट्यात अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोट..

सरकारनं आमच्या पिकाचं नुकसान झाल्यावर कवडीमोल नुकसानभरपाई देण्यापेक्षा आमच्या पिकांना रास्त भाव द्यावा, असं वाटतं.

- आनंदराव कचरे, शेतकरी, पळशी

०४पळशी

फोटो : कांद्याचे दर कोसळल्याने पळशी (ता. माण) परिसरात कांदा वाळून जात असल्याचे चित्र दिसत आहे.