शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने केला बळीराजाचा वांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST

पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डी मोही शिंगणापूरसह परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या पंधरा दिवसांपासून ...

पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डी मोही शिंगणापूरसह परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात कांदा काढणी व काटणीची कामे वेगात सुरू आहेत. मात्र कोसळलेल्या दरामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. सध्या प्रतिक्विंटल अवघा आठशे ते नऊशे रुपये दर मिळत आहे. भांडवली खर्चही निघत नसल्याने कांद्याने बळीराजाचा वांदा केल्याचे विदारक चित्र परिसरात दिसत आहे.

मागील वर्षी जून ते सप्टेंबरच्या दरम्यान कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. प्रतिक्विंटल चार ते साडेचार हजारांपर्यंत भाव होता. पण सप्टेंबरपर्यंत सलग व जोरदार पाऊस झाल्याने बऱ्याच जणांचा कांदा शेतातच नासून गेला तर अनेकांचा कांदा उगवलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्याकडे कांदाच नव्हता, अशी परिस्थिती होती.

पावसाने शेतीचे पूर्णपणे नुकसान होऊनही बळीराजाने पुन्हा नव्या जोमाने कांद्याची दुबार तर काहींनी तिबार पेरणी केली. पावसाने सगळीकडेच कांदा व रोपे नासून गेल्याने बियाणांचे दर प्रतिकिलो चार हजारांपर्यंत भडकले होते. तरीही उसनवारी करून दिवाळीच्या सुमारास पाच महिन्याचे गरवा कांदा बियाणे पुन्हा पेरले. सध्या सर्वत्र कांद्याची काढणी व काटणीची कामे जोमात सुरू असली तरी कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने काटलेल्या कांद्याचे करायचे काय, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे.

सध्या दर पडल्याने कांदा खरेदीसाठी व्यापारीही फिरकत नसल्याने शेतातच कांदा वाळून जाऊ लागला आहे. कांदा हेच या परिसरातील नगदी पीक म्हणून घेतले जाते. या पिकातून मिळालेला पैसा पुढच्या पिकात भांडवल म्हणून वापरला जातो; पण या हंगामात कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने खर्चाचे गणित कोलमडणार असल्याचे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे.

कांद्याला किमान दोन हजार दर मिळावा, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.

(चौकट)

भांडवली खर्चही निघेना..

सध्या आठशे ते नऊशे असा कवडीमोल दर असून, कांदा पिकासाठी मशागत, बियाणे, औषधे, खते, खुरपणी, काढणी काटणी, साठवण व्यवस्थापन अशा बाबींवर केलेला भांडवली खर्च पाहता शेतकरी पूर्णतः तोट्यात गेल्याचे दिसत आहे.

(चौकट)

बेरोजगारांचा सवाल...

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाने थैमान घातले असून, पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी काम करत असलेल्या अनेकांची लॉकडाऊनमुळे नोकरी गेली. भीतीने कित्येकजण आज गावी शेतीत राबत आहेत. पण शेतमालाला दर नसल्याने आगीतून फुफाट्यात अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोट..

सरकारनं आमच्या पिकाचं नुकसान झाल्यावर कवडीमोल नुकसानभरपाई देण्यापेक्षा आमच्या पिकांना रास्त भाव द्यावा, असं वाटतं.

- आनंदराव कचरे, शेतकरी, पळशी

०४पळशी

फोटो : कांद्याचे दर कोसळल्याने पळशी (ता. माण) परिसरात कांदा वाळून जात असल्याचे चित्र दिसत आहे.