शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षात डिझेल ३०, तर किराणा माल २० टक्क्यांनी महागला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:36 IST

सातारा : देशात कोरोनाचे संकट आल्यापासून सर्वच घटकांवर अनिष्ट परिणाम झाले आहेत. त्यातच इंधनाचे दर वाढत आहेत. वर्षात डिझेल ...

सातारा : देशात कोरोनाचे संकट आल्यापासून सर्वच घटकांवर अनिष्ट परिणाम झाले आहेत. त्यातच इंधनाचे दर वाढत आहेत. वर्षात डिझेल ३० टक्क्यांनी महागले असल्याने भाडेवाढीने किराणा मालाचेही दर वाढले आहेत. सातारा जिल्ह्यात तर किराणा जवळपास २० टक्क्यांनी वाढल्याने गृहिणींचे बजेट आणखी कोलमडले आहे.

मागील वर्षभरापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. यामुळे अनेकांचे काम गेले आहे. तसेच छोटे व्यवसायही बंद पडले आहेत, तर दुसरीकडे इंधनाचे दर सतत वाढत चालले आहेत. यामुळे वाहतूक खर्च वाढतच चालला आहे. परिणामी महागाईने नवीन उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्यांना तर जगणे मुश्कील झालेले आहे.

गत एक वर्षापासून डिझेलचा दर जवळपास ३० टक्क्यांनी वाढला आहे. सध्या ९० रुपयांपर्यंत लिटरला भाव आहे. डिझेल महागल्याने किराणा मालातही जवळपास १५ ते २० टक्के वाढ आहे, तर खाद्यतेलात ७० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. साताऱ्यात किराणा माल पुण्यावरून अधिक करून येतो. पुण्यावरून माल आणताना नगामागे सरासरी २० रुपये वाढ आहे, तर खोबरे, नारळ, शाबुदाणा, गहू आणि तांदूळ परराज्यांतून येतो. परराज्यातून येणाऱ्या मालवाहतुकीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे दुकानातील किरकोळ विक्रीचे दरही वाढले आहेत.

भारतात खाद्यतेलाची ७० टक्के आयात होते. खाद्यतेलाचे दर गेल्या सात महिन्यांपासून वाढलेलेच आहेत. जवळपास ७० टक्के दर वाढ आहे. १५ किलोचा सूर्यफूल तेलडबा २७००, तर शेंगदाणा तेलाचा डबा २८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. नवीन पीक येत नाही तोपर्यंत खाद्यतेलाच्या दरात वाढ होतच राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

किराणा दर (प्रती किलो)

मार्च २०२० सप्टेंबर २०२० मे २०२१

तूरडाळ १०० १०० १२०

हरभरा डाळ ६० ७० ८०

तांदूळ (बासमती) ३० ते ६० ३० ते ७० ३० ते ७०

साखर ३४ ३४ ३५

गूळ ४० ४० ४० ते ४५

बेसन ८० ८० ९०

...........................

तेलही दुप्पट महाग (दर प्रती लिटर)

तेल मार्च २०२० सप्टेंबर २०२० मे २०२१

शेंगदाणा १४० १५० १९०

सूर्यफूल १०० ११० १८५

राईस ब्रॅन १२० १३० १६५

सोयाबीन ९० ९५ १५५

पामतेल ८० ९० १३०

...............................

डिझेल दर (प्रती लिटर)

जानेवारी २०२० ७०.७१

जून २०२० ६७.७६

जानेवारी २०२१ ७९.९१

मे २०२१ ८९

.......................................................

कोट :

गेल्या एक वर्षापासून कोरोनाचं संकट आहे. त्यातच महागाई सतत वाढत चालली आहे. खाद्यतेल तर जवळपास दुप्पट वाढले आहे. या महागाईचा परिणाम महिन्याच्या बजेटवर झाला आहे. त्यामुळे इतर खर्च कमी करण्याची वेळ आली आहे.

- सुवर्णा आटपाडकर, गृहिणी.

...........................

कोरोनाच्या संकटाचा परिणाम सर्वच घटकांवर झाला आहे. इंधन वाढ झाल्याने किराणा साहित्यात वाढ झाली आहे. साखर, तांदूळ वगळता सर्व किराणा मालांचे दर वाढले आहेत, पण खाद्यतेलाचा दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने आर्थिक बजेटच कोलमडले आहे. तेल दर कमी होण्याची गरज आहे.

- मेघा राऊत, गृहिणी

.................................

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचं संकट उभं आहे. त्यातच डिझेलचा दर वाढल्याने वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. सध्या माल मिळत आहे, पण साखर, गूळ, तांदूळ वगळता डाळीमागे किरकोळ वाढ आहे, तर खाद्यतेल प्रथमच उच्चांकी पातळीवर गेले असून अजून काही महिने अशीच स्थिती राहील.

- संजय भोईटे, व्यापारी.

....................................................................