शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

एका वर्षात डिझेल ३०, तर किराणा माल २० टक्क्यांनी महागला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:36 IST

सातारा : देशात कोरोनाचे संकट आल्यापासून सर्वच घटकांवर अनिष्ट परिणाम झाले आहेत. त्यातच इंधनाचे दर वाढत आहेत. वर्षात डिझेल ...

सातारा : देशात कोरोनाचे संकट आल्यापासून सर्वच घटकांवर अनिष्ट परिणाम झाले आहेत. त्यातच इंधनाचे दर वाढत आहेत. वर्षात डिझेल ३० टक्क्यांनी महागले असल्याने भाडेवाढीने किराणा मालाचेही दर वाढले आहेत. सातारा जिल्ह्यात तर किराणा जवळपास २० टक्क्यांनी वाढल्याने गृहिणींचे बजेट आणखी कोलमडले आहे.

मागील वर्षभरापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. यामुळे अनेकांचे काम गेले आहे. तसेच छोटे व्यवसायही बंद पडले आहेत, तर दुसरीकडे इंधनाचे दर सतत वाढत चालले आहेत. यामुळे वाहतूक खर्च वाढतच चालला आहे. परिणामी महागाईने नवीन उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्यांना तर जगणे मुश्कील झालेले आहे.

गत एक वर्षापासून डिझेलचा दर जवळपास ३० टक्क्यांनी वाढला आहे. सध्या ९० रुपयांपर्यंत लिटरला भाव आहे. डिझेल महागल्याने किराणा मालातही जवळपास १५ ते २० टक्के वाढ आहे, तर खाद्यतेलात ७० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. साताऱ्यात किराणा माल पुण्यावरून अधिक करून येतो. पुण्यावरून माल आणताना नगामागे सरासरी २० रुपये वाढ आहे, तर खोबरे, नारळ, शाबुदाणा, गहू आणि तांदूळ परराज्यांतून येतो. परराज्यातून येणाऱ्या मालवाहतुकीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे दुकानातील किरकोळ विक्रीचे दरही वाढले आहेत.

भारतात खाद्यतेलाची ७० टक्के आयात होते. खाद्यतेलाचे दर गेल्या सात महिन्यांपासून वाढलेलेच आहेत. जवळपास ७० टक्के दर वाढ आहे. १५ किलोचा सूर्यफूल तेलडबा २७००, तर शेंगदाणा तेलाचा डबा २८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. नवीन पीक येत नाही तोपर्यंत खाद्यतेलाच्या दरात वाढ होतच राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

किराणा दर (प्रती किलो)

मार्च २०२० सप्टेंबर २०२० मे २०२१

तूरडाळ १०० १०० १२०

हरभरा डाळ ६० ७० ८०

तांदूळ (बासमती) ३० ते ६० ३० ते ७० ३० ते ७०

साखर ३४ ३४ ३५

गूळ ४० ४० ४० ते ४५

बेसन ८० ८० ९०

...........................

तेलही दुप्पट महाग (दर प्रती लिटर)

तेल मार्च २०२० सप्टेंबर २०२० मे २०२१

शेंगदाणा १४० १५० १९०

सूर्यफूल १०० ११० १८५

राईस ब्रॅन १२० १३० १६५

सोयाबीन ९० ९५ १५५

पामतेल ८० ९० १३०

...............................

डिझेल दर (प्रती लिटर)

जानेवारी २०२० ७०.७१

जून २०२० ६७.७६

जानेवारी २०२१ ७९.९१

मे २०२१ ८९

.......................................................

कोट :

गेल्या एक वर्षापासून कोरोनाचं संकट आहे. त्यातच महागाई सतत वाढत चालली आहे. खाद्यतेल तर जवळपास दुप्पट वाढले आहे. या महागाईचा परिणाम महिन्याच्या बजेटवर झाला आहे. त्यामुळे इतर खर्च कमी करण्याची वेळ आली आहे.

- सुवर्णा आटपाडकर, गृहिणी.

...........................

कोरोनाच्या संकटाचा परिणाम सर्वच घटकांवर झाला आहे. इंधन वाढ झाल्याने किराणा साहित्यात वाढ झाली आहे. साखर, तांदूळ वगळता सर्व किराणा मालांचे दर वाढले आहेत, पण खाद्यतेलाचा दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने आर्थिक बजेटच कोलमडले आहे. तेल दर कमी होण्याची गरज आहे.

- मेघा राऊत, गृहिणी

.................................

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचं संकट उभं आहे. त्यातच डिझेलचा दर वाढल्याने वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. सध्या माल मिळत आहे, पण साखर, गूळ, तांदूळ वगळता डाळीमागे किरकोळ वाढ आहे, तर खाद्यतेल प्रथमच उच्चांकी पातळीवर गेले असून अजून काही महिने अशीच स्थिती राहील.

- संजय भोईटे, व्यापारी.

....................................................................