शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षात डिझेल ३०, तर किराणा माल २० टक्क्यांनी महागला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:36 IST

सातारा : देशात कोरोनाचे संकट आल्यापासून सर्वच घटकांवर अनिष्ट परिणाम झाले आहेत. त्यातच इंधनाचे दर वाढत आहेत. वर्षात डिझेल ...

सातारा : देशात कोरोनाचे संकट आल्यापासून सर्वच घटकांवर अनिष्ट परिणाम झाले आहेत. त्यातच इंधनाचे दर वाढत आहेत. वर्षात डिझेल ३० टक्क्यांनी महागले असल्याने भाडेवाढीने किराणा मालाचेही दर वाढले आहेत. सातारा जिल्ह्यात तर किराणा जवळपास २० टक्क्यांनी वाढल्याने गृहिणींचे बजेट आणखी कोलमडले आहे.

मागील वर्षभरापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. यामुळे अनेकांचे काम गेले आहे. तसेच छोटे व्यवसायही बंद पडले आहेत, तर दुसरीकडे इंधनाचे दर सतत वाढत चालले आहेत. यामुळे वाहतूक खर्च वाढतच चालला आहे. परिणामी महागाईने नवीन उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्यांना तर जगणे मुश्कील झालेले आहे.

गत एक वर्षापासून डिझेलचा दर जवळपास ३० टक्क्यांनी वाढला आहे. सध्या ९० रुपयांपर्यंत लिटरला भाव आहे. डिझेल महागल्याने किराणा मालातही जवळपास १५ ते २० टक्के वाढ आहे, तर खाद्यतेलात ७० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. साताऱ्यात किराणा माल पुण्यावरून अधिक करून येतो. पुण्यावरून माल आणताना नगामागे सरासरी २० रुपये वाढ आहे, तर खोबरे, नारळ, शाबुदाणा, गहू आणि तांदूळ परराज्यांतून येतो. परराज्यातून येणाऱ्या मालवाहतुकीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे दुकानातील किरकोळ विक्रीचे दरही वाढले आहेत.

भारतात खाद्यतेलाची ७० टक्के आयात होते. खाद्यतेलाचे दर गेल्या सात महिन्यांपासून वाढलेलेच आहेत. जवळपास ७० टक्के दर वाढ आहे. १५ किलोचा सूर्यफूल तेलडबा २७००, तर शेंगदाणा तेलाचा डबा २८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. नवीन पीक येत नाही तोपर्यंत खाद्यतेलाच्या दरात वाढ होतच राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

किराणा दर (प्रती किलो)

मार्च २०२० सप्टेंबर २०२० मे २०२१

तूरडाळ १०० १०० १२०

हरभरा डाळ ६० ७० ८०

तांदूळ (बासमती) ३० ते ६० ३० ते ७० ३० ते ७०

साखर ३४ ३४ ३५

गूळ ४० ४० ४० ते ४५

बेसन ८० ८० ९०

...........................

तेलही दुप्पट महाग (दर प्रती लिटर)

तेल मार्च २०२० सप्टेंबर २०२० मे २०२१

शेंगदाणा १४० १५० १९०

सूर्यफूल १०० ११० १८५

राईस ब्रॅन १२० १३० १६५

सोयाबीन ९० ९५ १५५

पामतेल ८० ९० १३०

...............................

डिझेल दर (प्रती लिटर)

जानेवारी २०२० ७०.७१

जून २०२० ६७.७६

जानेवारी २०२१ ७९.९१

मे २०२१ ८९

.......................................................

कोट :

गेल्या एक वर्षापासून कोरोनाचं संकट आहे. त्यातच महागाई सतत वाढत चालली आहे. खाद्यतेल तर जवळपास दुप्पट वाढले आहे. या महागाईचा परिणाम महिन्याच्या बजेटवर झाला आहे. त्यामुळे इतर खर्च कमी करण्याची वेळ आली आहे.

- सुवर्णा आटपाडकर, गृहिणी.

...........................

कोरोनाच्या संकटाचा परिणाम सर्वच घटकांवर झाला आहे. इंधन वाढ झाल्याने किराणा साहित्यात वाढ झाली आहे. साखर, तांदूळ वगळता सर्व किराणा मालांचे दर वाढले आहेत, पण खाद्यतेलाचा दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने आर्थिक बजेटच कोलमडले आहे. तेल दर कमी होण्याची गरज आहे.

- मेघा राऊत, गृहिणी

.................................

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचं संकट उभं आहे. त्यातच डिझेलचा दर वाढल्याने वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. सध्या माल मिळत आहे, पण साखर, गूळ, तांदूळ वगळता डाळीमागे किरकोळ वाढ आहे, तर खाद्यतेल प्रथमच उच्चांकी पातळीवर गेले असून अजून काही महिने अशीच स्थिती राहील.

- संजय भोईटे, व्यापारी.

....................................................................