शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

एकीकडे आमदार हटाव, दुसरीकडे आमचं ठरलंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 05:21 IST

सातारा जिल्ह्यातील चित्र : भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांची मूळ कार्यकर्त्यांनी केली गोची

दीपक शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी होऊ लागली आहे; पण जे भाजपमध्ये गेले आहेत, त्यांनाही सामावून घेण्यास मूळ भाजपचे कार्यकर्ते तयार नाहीत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपमध्ये आल्यानंतर तर आमदार जयकुमार गोरे भाजपमध्ये येण्याअगोदरच त्यांना विरोध होत आहे. आयात उमेदवारांमुळे मूळ निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना भाजप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

भाजपकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या आज मुलाखती होणार आहेत. त्यापूर्वीच भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी रान उठवायला सुरुवात केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना विरोध करण्याचे काम मूळ भाजपमध्ये असलेले कार्यकर्ते करू लागले आहेत. आयात नेत्यांमुळे अन्याय होत असल्याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. या भावनेला वाट करून देण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका आणि मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.

सातारा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये दाखल झाले. सुरुवातीला भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले; पण याच मतदारसंघातील त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे दीपक पवार आणि शिवेंद्रराजेंवर असलेल्या नाराजीमुळे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले अमित कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या आडून विरोध सुरू केला आहे. त्यांनी भाजप निष्ठावंतांचा मेळावा घेऊन पक्षातूनच शिवेंद्रसिंहराजेंच्या उमेदवारीला विरोध केला आहे. आमदार हटाव... भाजप बचाव अशीच मोहीम सातारा विधानसभा मतदारसंघात सुरू केली आहे.

अशीच परिस्थिती माण-खटाव या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगत आणि काँग्रेसच्या आमदाराने भाजपचा खासदार निवडून आणल्याची किमया केल्याने जयकुमार गोरे लवकरच भाजपमध्ये दाखल होतील, अशी शक्यता आहे. त्यापूर्वीच या मतदारसंघातील भाजपचे जुने कार्यकर्ते माजी आमदार दिलीप येळगावकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी त्यांना विरोध केला आहे. तर भाजपसोबतच इतर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन आमचं ठरलंय... गोरेंना पराभूत करायचंच, असे ठरविले आहे. त्यामुळे मूळ निष्ठावंतांच्या भूमिकेमुळे आता आयात नेते अडचणीत आले आहेत. वरिष्ठ नेत्यांच्या कानपिचक्यानंतर ते थांबतीलही; पण मनातून ते मदत करतील का नाही, अशी भीती नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांना वाटतच राहणार आहे. सातारा जिल्ह्यातील राजकारण वेगळ्या वळणार आले आहे.शिवेंद्रसिंहराजे भोसले सध्या भाजपमध्ये आले असले तरी गेली २५ वर्षे आम्ही त्यांना विरोध करत आहोत. मागील निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पुन्हा लगेच पक्षाच्या कामाला लागलो आणि आमदार हटाव ही भूमिका घेतली. आता लोकांना त्यांनाच मते द्या असे कसे सांगणार. लोक ते ऐकणार नाहीत. त्यामुळे नव्याने आलेल्या लोकांना पाच वर्षे पक्षासाठी काम करू द्या नंतर त्यांना पक्षात पद द्या अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.- दीपक पवार, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ