शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

एकाचा ‘डंका’; पण नऊ शाळांचे काय ?

By admin | Updated: October 12, 2015 00:35 IST

‘आयएसओ’ म्हंजी काय ओ गुरुजी ? : कऱ्हाड पालिकेच्या शाळा क्रमांक तीनचा राज्यभर लौकिक; उर्वरित शाळांची गुणवत्ता वाढविणार कोण ?--पालिकेची ‘शाळा’- एक

प्रमोद सुकरे- कऱ्हाड--येथील नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक तीनला नुकताच ‘आयएसओ’ मानांकनाचा दर्जा मिळाला. ‘विद्यानगरी’ म्हणून परिचित असणाऱ्या कऱ्हाडच्या लौकिकात त्यामुळे भरच पडली. या शाळेच्या गुणवत्तेची चर्चा सध्या जिल्ह्याबाहेरही सुरू झालेय; पण पालिकेच्या शहरातील इतर नऊ शाळांच्या गुणवत्तेचे काय? याची चर्चा आता कऱ्हाडात जोर धरू लागली आहे. याचे उत्तर पालिका प्रशासनाला द्यावेच लागेल. नगरपरिषद व महापालिका कार्यक्षेत्रात ‘आयएसओ’ मानांकनाचा दर्जा मिळविणारी कऱ्हाड नगरपरिषदेची शाळा क्रमांक तीन ही राज्यात पहिली शाळा ठरली आहे. शिक्षणाच्या खासगीकरणामुळे एका बाजूला जिल्हा परिषद, नगरपरिषद शाळांना घरघर लागली असताना येथील एक शाळा ‘आयएसओ’पर्यंत मजल मारते यातून बोध घेणे गरजेचे आहे. येथील शिक्षकांनी काही जादूची कांडी फिरवली अन् चमत्कार घडला, असा प्रकार नाही. त्यांनी ज्या पद्धतीचे प्रयत्न केले; तोच कित्ता इतर शाळांच्या शिक्षकांनीही गिरविण्याची गरज आहे. शाळा क्रमांक तीन ही उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्या प्रभागातील शाळा आहे. त्यांनी या शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. त्याला मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांची मोलाची साथ मिळाली. तेथील सर्व शिक्षकांनीही स्वत:ला झोकून दिले तेव्हा कुठे त्यांना हे यश मिळाले. आता त्यात सातत्य ठेवण्याचे साऱ्यांसमोर आव्हान आहे. पण, याउलट पालिकेच्या इतर नऊ शाळांचा आढावा घेतला तर त्यांचे मूल्यांकन नेमके कसे करायचे ? हा प्रश्न कऱ्हाडकर नागरिकांना पडला आहे. खरंतर ‘आयएसओ’ दर्जा मिळाल्यानंतर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक शाळांचे शिक्षक, ग्रामशिक्षण समित्या या शाळांना भेट देऊन यातून आपल्याला काय घेता येईल का? याचा शोध घेऊ लागले आहेत. पण, कऱ्हाड नगरपरिषदेच्या इतर शाळेतील शिक्षक या शाळेतील वेगळेपण शोधून आपल्या शाळेत राबविण्यासाठी कधी वेळ काढणार? हा खरा प्रश्न आहे. शाळा क्रमांक तीनची विद्यार्थिसंख्या ५०४ आहे. कऱ्हाड शहराबरोबरच नजीकच्या २० गावांतील विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येतात. त्यासाठी २२ खासगी स्कूलबसही उपलब्ध आहेत. मात्र उरलेल्या नऊ शाळांपैकी पाच शाळांना विद्यार्थीसंख्या शंभरवरही नेता आलेली नाही. याचं कारण कोण शोधणार? पालिका प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी आहे. ...तर सर्वच शाळा आयएसओ मानांकित...शाळा क्रमांक तीनला ‘आयएसओ’ मानांकन मिळविण्यात उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचा हा आदर्श इतर नगरसेवकांनी डोळ्यांसमोर ठेवून आपापल्या प्रभागातील शाळा दत्तक घेतल्या तर इतर नऊ शाळांही गुणवत्तेचा दर्जा सुधारून ‘आयएसओ’ मानांकित होतील यात शंका नाही. पालिका शाळांच्या शिक्षकांनीच फिरवली कार्यक्रमाकडे पाठ ‘आयएसओ’ मानांकन प्रदान कार्यक्रमासाठी शाळा नं. तीनमध्ये अनेक मान्यवरांसह पालकांनी हजेरी लावली. नगरपरिषदेच्या इतर शाळेतील शिक्षकांनाही याचे नियंत्रण दिले होते. मात्र, बहुतांशी शिक्षकांनी याकडे पाठ फिरविणेच पसंत केले. याचे कारण काय? याची चर्चाही सुरू आहे. नगरपरिषद शाळा क्रमांक, पटसंख्या अंदाजे व शिक्षक संख्या पुढीलप्रमाणे शाळा क्रमांक १ - एकूण विद्यार्थी २२ - शिक्षक २, शाळा क्रमांक २ - विद्यार्थी ८५ - शिक्षक ३, शाळा क्रमांक ३ - विद्यार्थी ५०४ - शिक्षक ९, शाळा क्रमांक ४ - विद्यार्थी २८ - शिक्षक २, शाळा क्रमांक ५ - विद्यार्थी २८० - शिक्षक ८, शाळा क्रमांक ७ - विद्यार्थी २४० - शिक्षक ८, शाळा क्रमांक ९ - विद्यार्थी २९० - शिक्षक ८, शाळा क्रमांक १० - विद्यार्थी ६४ - शिक्षक २, शाळा क्रमांक ११ - विद्यार्थी २४ - शिक्षक २, शाळा क्रमांक १२ - विद्यार्थी १२५ - शिक्षक ४.दोन शाळा यापूर्वीच बंद... नगरपालिकेची शाळा क्रमांक ६ सुमारे १५ वर्षांपूर्वीच बंद पडली आहे. तर शाळा क्रमांक ८ सुमारे सात वर्षांपूर्वी बंद पडली आहे. त्या शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कसोशीचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. एकवेळ ते जमले नाही तरी चालेल; पण आणखी एखादी शाळा बंद पडू नये म्हणून काळजी घ्यायला हवी. शाळांवर अंकुश ठेवण्यासाठी शिक्षण मंडळे अस्तित्वात होती. सध्या ती बरखास्त आहे. मात्र त्यावेळी निवड झालेले सभापती आजही कायम आहेत म्हणे. त्यांच्या सहीनेच बराच कारभार चालतो. त्यांनीही यात लक्ष घातले तर बरे होईल.