शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

तौक्ते वादळामुळे जिल्ह्यात एक कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : तौक्ते वादळामुळे जिल्ह्यामध्ये तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने काढलेला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : तौक्ते वादळामुळे जिल्ह्यामध्ये तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने काढलेला आहे. या नुकसानीत लोकांच्या वैयक्तिक मालमत्तेसह सार्वजनिक मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, त्यामध्ये वीज वितरणला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

जिल्ह्यात १७ मे रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे जिल्ह्यात ठिकाणी दरडी कोसळल्या विजेचे खांब उन्मळून पडले, झाडे कोसळली. अनेक घरांचे पत्रे उडाले व भिंती कोसळल्या. जिल्ह्यातील काही शाळांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार या वादळात एक कोटीचे नुकसान झाले आहे; मात्र पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नेमके किती नुकसान झाले, हे समोर येईल कदाचित यापेक्षाही जास्त नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.

वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानंतर महसूल प्रशासनाने स्थानिक कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्याचे सांगितले होते त्यानुसार ढोबळे अंदाजानुसार तलाठी, कृषी कर्मचारी, तसेच ग्रामसेवक यांनी केलेल्या नुकसानीच्या पाहणीनंतर जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार जावळी तालुक्यामध्ये नऊ घरांची पडझड झाली. कोरेगाव तालुक्यात एका घराचे नुकसान झाले. कऱ्हाड तालुक्‍यात सात घरांची पडझड झाली, तर दोन जनावरांचे गोठे, एक पोल्ट्री शेड व एका शाळेचे मोठे नुकसान झाले. पाटण तालुक्यातील दहा घरांचे नुकसान झाले. महाबळेश्वर तालुक्यात २२ घरांचे, तीन शासकीय इमारतींचे नुकसान झाले. अठरा विद्युत पोल वाहनांचे नुकसान झाले. सात घरांचे, एका शाळेचे नुकसान झाले. १० विद्युत खांबांची नुकसान झाले. आंबा, नारळ, फळबागांचे नुकसान झाले. खंडाळा तालुक्यात विद्युत खांब कोसळले.

जिल्ह्यात विजांच्या तारा, तसेच खांब जमिनीवर पडले. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वीज कंपनीने हे काम उभे करण्याची, तसेच तारा दुरुस्त करण्याचे काम हाती घेतलेले आहे.

पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनाला अहवाल जाणार

जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबतचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर करण्यात आलेला आहे. अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. हे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अंतिम नुकसान किती झाले याचा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे.

१७ मे रोजी जिल्ह्यात झालेला पाऊस

सातारा : १९.१०, जावळी : ३२.४०, कोरेगाव : ६.११, कराड : ३२.९२, पाटण : ३५.०८, माण : ०.४२, खटाव : ५.८१, महाबळेश्वर : ९४.७, वाई : १८.१४, खंडाळा : २.४५

जिल्ह्याची सरासरी : २२.५३