शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

तौक्ते वादळामुळे जिल्ह्यात एक कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : तौक्ते वादळामुळे जिल्ह्यामध्ये तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने काढलेला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : तौक्ते वादळामुळे जिल्ह्यामध्ये तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने काढलेला आहे. या नुकसानीत लोकांच्या वैयक्तिक मालमत्तेसह सार्वजनिक मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, त्यामध्ये वीज वितरणला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

जिल्ह्यात १७ मे रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे जिल्ह्यात ठिकाणी दरडी कोसळल्या विजेचे खांब उन्मळून पडले, झाडे कोसळली. अनेक घरांचे पत्रे उडाले व भिंती कोसळल्या. जिल्ह्यातील काही शाळांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार या वादळात एक कोटीचे नुकसान झाले आहे; मात्र पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नेमके किती नुकसान झाले, हे समोर येईल कदाचित यापेक्षाही जास्त नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.

वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानंतर महसूल प्रशासनाने स्थानिक कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्याचे सांगितले होते त्यानुसार ढोबळे अंदाजानुसार तलाठी, कृषी कर्मचारी, तसेच ग्रामसेवक यांनी केलेल्या नुकसानीच्या पाहणीनंतर जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार जावळी तालुक्यामध्ये नऊ घरांची पडझड झाली. कोरेगाव तालुक्यात एका घराचे नुकसान झाले. कऱ्हाड तालुक्‍यात सात घरांची पडझड झाली, तर दोन जनावरांचे गोठे, एक पोल्ट्री शेड व एका शाळेचे मोठे नुकसान झाले. पाटण तालुक्यातील दहा घरांचे नुकसान झाले. महाबळेश्वर तालुक्यात २२ घरांचे, तीन शासकीय इमारतींचे नुकसान झाले. अठरा विद्युत पोल वाहनांचे नुकसान झाले. सात घरांचे, एका शाळेचे नुकसान झाले. १० विद्युत खांबांची नुकसान झाले. आंबा, नारळ, फळबागांचे नुकसान झाले. खंडाळा तालुक्यात विद्युत खांब कोसळले.

जिल्ह्यात विजांच्या तारा, तसेच खांब जमिनीवर पडले. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वीज कंपनीने हे काम उभे करण्याची, तसेच तारा दुरुस्त करण्याचे काम हाती घेतलेले आहे.

पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनाला अहवाल जाणार

जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबतचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर करण्यात आलेला आहे. अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. हे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अंतिम नुकसान किती झाले याचा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे.

१७ मे रोजी जिल्ह्यात झालेला पाऊस

सातारा : १९.१०, जावळी : ३२.४०, कोरेगाव : ६.११, कराड : ३२.९२, पाटण : ३५.०८, माण : ०.४२, खटाव : ५.८१, महाबळेश्वर : ९४.७, वाई : १८.१४, खंडाळा : २.४५

जिल्ह्याची सरासरी : २२.५३