शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे... एक किलो टोमॅटोची तीन रुपयांनी विक्री अन् वाहतुकीला जाताय चार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST

दहिवडी : माण तालुक्यात टोमॅटोच्या मोठ्या प्रमाणात उत्पादक गावे असणारे मलवडी, भांडवली, शिंदी खुर्द, गाडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या ...

दहिवडी : माण तालुक्यात टोमॅटोच्या मोठ्या प्रमाणात उत्पादक गावे असणारे मलवडी, भांडवली, शिंदी खुर्द, गाडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा फटका बसला आहे. बाजार समितीत अवघे तीन रुपये किलो दराने टोमॅटो विक्री होत असताना वाहतुकीचा खर्च मात्र चार रुपये करावे लागतात. त्यामुळे अनेकांनी फड सोडून दिले आहेत.

या भागातील शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण टोमॅटोवर अवलंबून असते. मलवडी, भांडवली, शिंदी खुर्द या गावातील जवळपास पाचशे एकर क्षेत्रावर आयुष्यमान, अनसल, आर्यमान, जवाहर, विजेता या जातीच्या टोमॅटोची दरवर्षी पाडव्याला लागवड होत असते. सोलापूर, बेळगाव, अमरावती, औरंगाबाद, पुणे, मुंबई, कोल्हापूर या बाजारपेठेत टोमॅटो येथून पाठवले जातात. रोज २० ते २५ लहान मोठी गाडी भरून माल जातो. त्यामुळे दरवर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यात कोट्यवधीची उलाढाल होत असते. या व्यवसायावर मजूर वाहन व्यावसायिक व शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असते. गेल्यावर्षी अचानक लॉकडाऊन पडल्याने बाजार समिती बंद होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोचे फड आहे तसे सोडावे लागले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी या लॉकडाऊनचा फटका बसला आहे. बाजारसमिती सुरू असल्या तरी मालाचा उठाव होत नाही. दिल्ली, हैदराबाद या परिसरातील व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने दराने कंबरडे मोडले आहे. वीस किलोचे कॅरेट ६० रुपयांना आणि वाहतूक खर्च ८० रुपये येतो. त्यामुळे पदरचे पैसे भरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

गेल्या वर्षीचा तोटा यावर्षी भरून निघेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतले. कोकणामधून बांबू, तार, सुतळी आणून एकरी एक लाखापेक्षा जास्त खर्च केला. मात्र सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी यावर्षीही बागा जागेवरच सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

चौकट

आम्हाला सलग दुसऱ्या वर्षी टोमॅटोची बाग सोडावी लागली. शासन फळबागाचा विमा उतरवते इतर पिकांचीही भरपाई देते मात्र नाशवंत टोमॅटोसाठी शासनाचे कसलेच धोरण नाही. ज्यांचे नुकसान झाले त्याचे पंचनामे होऊन किमान भरपाई दिली पाहिजे तरच शेतकरी सावरू शकेल अन्यथा कर्जबाजारी होण्याशिवाय पर्याय नाही, अशी भीती मलवडीतील शेतकरी दत्तात्रय मगर यांनी व्यक्त केली.

चौकट

टोमॅटो उत्पादनामुळे वाहतूकदारांना दोन महिने चांगला व्यवसाय मिळतो. यंदा मात्र दर नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांने टोमॅटो जागेवरच सोडून दिले आहेत. त्याचा परिणाम वाहतूक व्यवसायावर झाला आहे.

- लालासाहेब घार्गे गाडेवाडी

फोटो १०दहिवडी-टोमॅटो

माण तालुक्यातील मलवडी येथे टोमॅटोला चांगला दर नसल्याने शेतकरी तुकाराम मगर यांनी बाग सोडून दिली आहे.