शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

अरे बापरे... एक किलो टोमॅटोची तीन रुपयांनी विक्री अन् वाहतुकीला जाताय चार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST

दहिवडी : माण तालुक्यात टोमॅटोच्या मोठ्या प्रमाणात उत्पादक गावे असणारे मलवडी, भांडवली, शिंदी खुर्द, गाडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या ...

दहिवडी : माण तालुक्यात टोमॅटोच्या मोठ्या प्रमाणात उत्पादक गावे असणारे मलवडी, भांडवली, शिंदी खुर्द, गाडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा फटका बसला आहे. बाजार समितीत अवघे तीन रुपये किलो दराने टोमॅटो विक्री होत असताना वाहतुकीचा खर्च मात्र चार रुपये करावे लागतात. त्यामुळे अनेकांनी फड सोडून दिले आहेत.

या भागातील शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण टोमॅटोवर अवलंबून असते. मलवडी, भांडवली, शिंदी खुर्द या गावातील जवळपास पाचशे एकर क्षेत्रावर आयुष्यमान, अनसल, आर्यमान, जवाहर, विजेता या जातीच्या टोमॅटोची दरवर्षी पाडव्याला लागवड होत असते. सोलापूर, बेळगाव, अमरावती, औरंगाबाद, पुणे, मुंबई, कोल्हापूर या बाजारपेठेत टोमॅटो येथून पाठवले जातात. रोज २० ते २५ लहान मोठी गाडी भरून माल जातो. त्यामुळे दरवर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यात कोट्यवधीची उलाढाल होत असते. या व्यवसायावर मजूर वाहन व्यावसायिक व शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असते. गेल्यावर्षी अचानक लॉकडाऊन पडल्याने बाजार समिती बंद होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोचे फड आहे तसे सोडावे लागले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी या लॉकडाऊनचा फटका बसला आहे. बाजारसमिती सुरू असल्या तरी मालाचा उठाव होत नाही. दिल्ली, हैदराबाद या परिसरातील व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने दराने कंबरडे मोडले आहे. वीस किलोचे कॅरेट ६० रुपयांना आणि वाहतूक खर्च ८० रुपये येतो. त्यामुळे पदरचे पैसे भरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

गेल्या वर्षीचा तोटा यावर्षी भरून निघेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतले. कोकणामधून बांबू, तार, सुतळी आणून एकरी एक लाखापेक्षा जास्त खर्च केला. मात्र सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी यावर्षीही बागा जागेवरच सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

चौकट

आम्हाला सलग दुसऱ्या वर्षी टोमॅटोची बाग सोडावी लागली. शासन फळबागाचा विमा उतरवते इतर पिकांचीही भरपाई देते मात्र नाशवंत टोमॅटोसाठी शासनाचे कसलेच धोरण नाही. ज्यांचे नुकसान झाले त्याचे पंचनामे होऊन किमान भरपाई दिली पाहिजे तरच शेतकरी सावरू शकेल अन्यथा कर्जबाजारी होण्याशिवाय पर्याय नाही, अशी भीती मलवडीतील शेतकरी दत्तात्रय मगर यांनी व्यक्त केली.

चौकट

टोमॅटो उत्पादनामुळे वाहतूकदारांना दोन महिने चांगला व्यवसाय मिळतो. यंदा मात्र दर नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांने टोमॅटो जागेवरच सोडून दिले आहेत. त्याचा परिणाम वाहतूक व्यवसायावर झाला आहे.

- लालासाहेब घार्गे गाडेवाडी

फोटो १०दहिवडी-टोमॅटो

माण तालुक्यातील मलवडी येथे टोमॅटोला चांगला दर नसल्याने शेतकरी तुकाराम मगर यांनी बाग सोडून दिली आहे.