शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अरे बापरे... एक किलो टोमॅटोची तीन रुपयांनी विक्री अन् वाहतुकीला जाताय चार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST

दहिवडी : माण तालुक्यात टोमॅटोच्या मोठ्या प्रमाणात उत्पादक गावे असणारे मलवडी, भांडवली, शिंदी खुर्द, गाडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या ...

दहिवडी : माण तालुक्यात टोमॅटोच्या मोठ्या प्रमाणात उत्पादक गावे असणारे मलवडी, भांडवली, शिंदी खुर्द, गाडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा फटका बसला आहे. बाजार समितीत अवघे तीन रुपये किलो दराने टोमॅटो विक्री होत असताना वाहतुकीचा खर्च मात्र चार रुपये करावे लागतात. त्यामुळे अनेकांनी फड सोडून दिले आहेत.

या भागातील शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण टोमॅटोवर अवलंबून असते. मलवडी, भांडवली, शिंदी खुर्द या गावातील जवळपास पाचशे एकर क्षेत्रावर आयुष्यमान, अनसल, आर्यमान, जवाहर, विजेता या जातीच्या टोमॅटोची दरवर्षी पाडव्याला लागवड होत असते. सोलापूर, बेळगाव, अमरावती, औरंगाबाद, पुणे, मुंबई, कोल्हापूर या बाजारपेठेत टोमॅटो येथून पाठवले जातात. रोज २० ते २५ लहान मोठी गाडी भरून माल जातो. त्यामुळे दरवर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यात कोट्यवधीची उलाढाल होत असते. या व्यवसायावर मजूर वाहन व्यावसायिक व शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असते. गेल्यावर्षी अचानक लॉकडाऊन पडल्याने बाजार समिती बंद होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोचे फड आहे तसे सोडावे लागले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी या लॉकडाऊनचा फटका बसला आहे. बाजारसमिती सुरू असल्या तरी मालाचा उठाव होत नाही. दिल्ली, हैदराबाद या परिसरातील व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने दराने कंबरडे मोडले आहे. वीस किलोचे कॅरेट ६० रुपयांना आणि वाहतूक खर्च ८० रुपये येतो. त्यामुळे पदरचे पैसे भरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

गेल्या वर्षीचा तोटा यावर्षी भरून निघेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतले. कोकणामधून बांबू, तार, सुतळी आणून एकरी एक लाखापेक्षा जास्त खर्च केला. मात्र सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी यावर्षीही बागा जागेवरच सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

चौकट

आम्हाला सलग दुसऱ्या वर्षी टोमॅटोची बाग सोडावी लागली. शासन फळबागाचा विमा उतरवते इतर पिकांचीही भरपाई देते मात्र नाशवंत टोमॅटोसाठी शासनाचे कसलेच धोरण नाही. ज्यांचे नुकसान झाले त्याचे पंचनामे होऊन किमान भरपाई दिली पाहिजे तरच शेतकरी सावरू शकेल अन्यथा कर्जबाजारी होण्याशिवाय पर्याय नाही, अशी भीती मलवडीतील शेतकरी दत्तात्रय मगर यांनी व्यक्त केली.

चौकट

टोमॅटो उत्पादनामुळे वाहतूकदारांना दोन महिने चांगला व्यवसाय मिळतो. यंदा मात्र दर नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांने टोमॅटो जागेवरच सोडून दिले आहेत. त्याचा परिणाम वाहतूक व्यवसायावर झाला आहे.

- लालासाहेब घार्गे गाडेवाडी

फोटो १०दहिवडी-टोमॅटो

माण तालुक्यातील मलवडी येथे टोमॅटोला चांगला दर नसल्याने शेतकरी तुकाराम मगर यांनी बाग सोडून दिली आहे.