शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनाही दिसेना रस्त्यावरील खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : सांगली, बारामती औद्योगिक शहरांना जोडणारा मिरज-भिगवण राज्य मार्गावरील मायणी-दहिवडी या सुमारे तीस किलोमीटरच्या राज्यमार्गावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मायणी : सांगली, बारामती औद्योगिक शहरांना जोडणारा मिरज-भिगवण राज्य मार्गावरील मायणी-दहिवडी या सुमारे तीस किलोमीटरच्या राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एक फुटांपेक्षा अधिक खोलीचे खड्डे पडल्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होते आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून अधिकारी, लोकप्रतिनिधीची नेहमीची वर्दळ असते. पण त्यांनाही हे खड्डे दिसत नसल्याने वाहनचालकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत माहिती अशी की, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर जिल्ह्याला जोडणारा, पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध औद्योगिक शहरे म्हणून प्रसिद्ध असलेल्या बारामती, सांगली या शहरांच्या परिसरातील औद्योगिक क्षेत्रातून मोठी व अवजड वाहतूक करण्यासाठी एकमेव राज्य मार्ग असलेल्या मिरज भिगवण राज्यमार्गावर मायणी ते दहिवडी या सुमारे तीस किलोमीटर अंतराच्या राज्यमार्गावर गेल्या पंधरा वीस वर्षांपासून मोठा निधी पडला नाही. प्रत्येक वेळी या मार्गाची मलमपट्टी केली जात आहे.

स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती विचारली असता हा मार्ग केंद्राकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद किंवा राज्य शासनाकडून या मार्गावर टाकता येत नाही, अशी उत्तरे देऊन चालढकल केली जात आहे. किंवा त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. केंद्राकडे वर्ग केलेल्या याच मार्गावरील सांगली जिल्ह्यात वर्षानुवर्षे निधी पडत आहे. फलटण तालुक्यातील पूर्व भाग व माण तालुक्यातील उत्तर भागामध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये या मार्गावर चांगला निधी पडला होता. हा मार्ग जवळजवळ खड्डेमुक्त झाला आहे. मात्र खटावसह माण तालुक्याला जोडणारा व खटाव तालुक्यातील तडवळे, बोंबाळे, कातरखटाव, सूर्याचीवाडी, धोंडेवाडी, मायणी व सांगली जिल्हा भागातून जाणाऱ्या सुमारे पंचवीस ते तीस किलोमीटर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक वर्षांत फक्त पावसाळ्यानंतर खड्डे भरण्याचे काम करून हात झटकले जात आहे.

चौकट

साईडपट्ट्याही खचलेल्या

सध्या एक फुटापेक्षा अधिक खोलीच्या पडलेल्या खड्ड्यांमुळे व खचलेल्या साईडपट्ट्या यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनाही मणक्याचा त्रास होत आहे. तरीही या मार्गाच्या दुरुस्तीकडे किंवा केंद्रातून काम व निधी उपलब्ध करण्यात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ सोशल मीडियावरून करत आहेत.

चौकट

प्रतीक्षा निधीची

गेल्या तीन वर्षांपूर्वी हा राज्यमार्ग केंद्राकडे वर्ग केला आहे. केंद्रामध्ये भाजपची सत्ता. केंद्रीय रस्ते विकास व अवजड वाहतूक मंत्री महाराष्ट्रातील तसेच खटाव- माण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीही भाजपचे असा योगायोग असतानाही या मार्गावर निधी उपलब्ध होतो की नाही या प्रश्नाचे उत्तर मात्र सुटताना दिसत नाही.

१८मायणी-रोड

मिरज-भिगवण या राज्यमार्गावर मायणी-दहिवडी या तीस किलोमीटरवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. (छाया : संदीप कुंभार)