शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
3
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
4
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
5
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
6
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
7
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
8
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
9
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
11
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
12
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
13
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
14
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
15
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
16
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
17
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
18
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
19
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
20
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?

अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनाही दिसेना रस्त्यावरील खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : सांगली, बारामती औद्योगिक शहरांना जोडणारा मिरज-भिगवण राज्य मार्गावरील मायणी-दहिवडी या सुमारे तीस किलोमीटरच्या राज्यमार्गावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मायणी : सांगली, बारामती औद्योगिक शहरांना जोडणारा मिरज-भिगवण राज्य मार्गावरील मायणी-दहिवडी या सुमारे तीस किलोमीटरच्या राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एक फुटांपेक्षा अधिक खोलीचे खड्डे पडल्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होते आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून अधिकारी, लोकप्रतिनिधीची नेहमीची वर्दळ असते. पण त्यांनाही हे खड्डे दिसत नसल्याने वाहनचालकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत माहिती अशी की, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर जिल्ह्याला जोडणारा, पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध औद्योगिक शहरे म्हणून प्रसिद्ध असलेल्या बारामती, सांगली या शहरांच्या परिसरातील औद्योगिक क्षेत्रातून मोठी व अवजड वाहतूक करण्यासाठी एकमेव राज्य मार्ग असलेल्या मिरज भिगवण राज्यमार्गावर मायणी ते दहिवडी या सुमारे तीस किलोमीटर अंतराच्या राज्यमार्गावर गेल्या पंधरा वीस वर्षांपासून मोठा निधी पडला नाही. प्रत्येक वेळी या मार्गाची मलमपट्टी केली जात आहे.

स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती विचारली असता हा मार्ग केंद्राकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद किंवा राज्य शासनाकडून या मार्गावर टाकता येत नाही, अशी उत्तरे देऊन चालढकल केली जात आहे. किंवा त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. केंद्राकडे वर्ग केलेल्या याच मार्गावरील सांगली जिल्ह्यात वर्षानुवर्षे निधी पडत आहे. फलटण तालुक्यातील पूर्व भाग व माण तालुक्यातील उत्तर भागामध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये या मार्गावर चांगला निधी पडला होता. हा मार्ग जवळजवळ खड्डेमुक्त झाला आहे. मात्र खटावसह माण तालुक्याला जोडणारा व खटाव तालुक्यातील तडवळे, बोंबाळे, कातरखटाव, सूर्याचीवाडी, धोंडेवाडी, मायणी व सांगली जिल्हा भागातून जाणाऱ्या सुमारे पंचवीस ते तीस किलोमीटर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक वर्षांत फक्त पावसाळ्यानंतर खड्डे भरण्याचे काम करून हात झटकले जात आहे.

चौकट

साईडपट्ट्याही खचलेल्या

सध्या एक फुटापेक्षा अधिक खोलीच्या पडलेल्या खड्ड्यांमुळे व खचलेल्या साईडपट्ट्या यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनाही मणक्याचा त्रास होत आहे. तरीही या मार्गाच्या दुरुस्तीकडे किंवा केंद्रातून काम व निधी उपलब्ध करण्यात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ सोशल मीडियावरून करत आहेत.

चौकट

प्रतीक्षा निधीची

गेल्या तीन वर्षांपूर्वी हा राज्यमार्ग केंद्राकडे वर्ग केला आहे. केंद्रामध्ये भाजपची सत्ता. केंद्रीय रस्ते विकास व अवजड वाहतूक मंत्री महाराष्ट्रातील तसेच खटाव- माण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीही भाजपचे असा योगायोग असतानाही या मार्गावर निधी उपलब्ध होतो की नाही या प्रश्नाचे उत्तर मात्र सुटताना दिसत नाही.

१८मायणी-रोड

मिरज-भिगवण या राज्यमार्गावर मायणी-दहिवडी या तीस किलोमीटरवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. (छाया : संदीप कुंभार)