शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भर पावसात खांद्यावर ‘अंधाराचं ओझं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 21:15 IST

सातारा : कोयना धरणाच्या निर्मितीमुळे विस्थापित झालेल्या जावळी तालुक्यातील कांदाटी खोºयात आजही स्थानिक भूमिपूत्रांना आदिवासींसारखे जीवन जगावे लागत आहे.

ठळक मुद्देजावळी तालुक्यातील कांदाटी खोºयामध्ये खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित‘एकमेकां साह्य करु, अवघे धरु सुपंथ’ या उक्तीप्रमाणे सहकार्याची भूमिकाउध्द्वस्त झालेल्या रस्त्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे बंदसाधारणपणे आठ ते दहा माणसे खांब नेण्यासाठी लागतात

सातारा : कोयना धरणाच्या निर्मितीमुळे विस्थापित झालेल्या जावळी तालुक्यातील कांदाटी खोºयात आजही स्थानिक भूमिपूत्रांना आदिवासींसारखे जीवन जगावे लागत आहे. अतिवृष्टी व वादळवाºयांमुळे डोंगरपठारावरील तीन विद्युत खांब पडल्याने १५ दिवस त्या भागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. सध्या लोकांचे हाल सुरू झाले आहेत.         दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सहकार्याने भर पावसात, चिखलात याठिकाणी नवीन विद्युत पोल बसविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.जावळी तालुक्यातील कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामुळे वाघावळे, उचाट, कांदाट, सालोशी, मोरणी, महाळुंगे, शिंदी वलवल, चकदेव, आकल्पे, निवळी, लामज या ६ हजार लोकवस्ती असलेल्या भागात गेले पंधरा दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे जिवनावश्यक असणारी पिठाची गिरण व मोबाईल चार्जिंग पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे सध्या अनेक घरात भात-आमटी व्यतिरिक्त कोणतेही खाद्य बनवता येत नाही.  

        नैसर्गिकरित्या डोंगरपठारावरुन पाणी येत असल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. हे खांब घेवून जाण्यासाठी कोणत्याही यंत्रणेचा वापर न करता कर्मचारी व ग्रामस्थ निसरड्या वाटेने हे लोखंडी खांब खांद्यावरुन झोळी करुन घेवून जात आहेत.सध्या पावसाळ्यामुळे या भागातील प्राथमिक शाळेला सुट्टी आहे. १५ आॅगस्टला नियमितपणे शाळा सुरु होणार आहे. तत्पूर्वी विद्युत पुरवठा व शिंदी ते लामज, लामज ते आकल्पे हा वाहून गेलेला व उध्द्वस्त झालेल्या रस्त्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

जिल्हा परिषद सदस्या प्रणिता जंगम, राजाराम मोरे, सीताराम जंगम, काशिनाथ पाटील, आर. आर. चव्हाण, वाघावळे सरपंच सदाशिव जंगम, सुभाष मोरे, काशिनाथ कदम, यशवंत सावंत हे ग्रामस्थ वीज कर्मचाºयांना सहकार्य करीत आहेत.या भागातील व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचे मूळगाव दरे तर्फ खांब आहे. तेसुद्धा येथील विकासकामांबाबत सातत्याने संपर्क ठेवून आहेत.विजेच्या पोलचे वजन ७०० किलो...जावळी तालुक्यातील कांदाटी खोरे हा दुर्गम भाग आहे. या भागात पाऊस आणि वारे अधिक असते. त्यामुळे अशा भागात लोखंडी खांबच उपयुक्त ठरतात. कारण, सिमेंटच्या खांबापेक्षा याचे वन कमी असते. साधारणपणे खांब दोन प्रकारच्या वाहिन्यांसाठी वापरण्यात येतात. कमी दाबाच्या वाहिनीसाठी ७०० किलो आणि ८ मिटरचा तर उच्च दाबाच्या वाहिनीसाठी ९०० किलो वजन आणि ९ मिटरचा खांब वापरला जातो. हे पोल नेणे सहज शक्य होते. साधारणपणे आठ ते दहा माणसे खांब नेण्यासाठी लागतात. सध्या डोंगर पठारावर खांब घेऊन जाण्यासाठी ‘एकमेकां साह्य करु, अवघे धरु सुपंथ’ या उक्तीप्रमाणे सहकार्याची भूमिका घेतली जात आहे.