शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

ऑक्टोबर महिन्यात १० वर्षांमध्ये कोयनेतून सोडले सहावेळा पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 13:04 IST

Koyana Dam, sataranews, rain, सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने धरणे भरतात. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रणासाठी विसर्ग सुरू करावा लागतो.

ठळक मुद्देऑक्टोबर महिन्यात १० वर्षांमध्ये कोयनेतून सोडले सहावेळा पाणी अतिवृष्टीचा परिणाम : दरवाजातून करण्यात आला विसर्ग; यंदाही पाणी सोडले

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने धरणे भरतात. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रणासाठी विसर्ग सुरू करावा लागतो. पावसाळ्यात अधिक प्रमाणात पाणी सोडले जाते. पण, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी होत असेल तर ही बाब वेगळी ठरते. अशाचप्रकारे मागील १० वर्षांत ऑक्टोबरमधील अतिवृष्टीमुळे कोयनेच्या दरवाजातून सहावेळा पाणी सोडावे लागले आहे.जिल्ह्याचा पश्चिम भाग हा पावसाचा. कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली, कास या भागात पावसाळ्यात धुवाँधार असते. या भागातील पावसावरच कोयना धरणा धरण भरणार का नाही हे अवलंबून राहते. तसेच प्रमुख धरणे ही जिल्ह्याच्या पश्चिम भागातच आहेत. अपवाद वगळता दरवर्षी ही धरणे भरतात.

बहुतांशीवेळा ऑगस्ट अखेरपर्यंत धरणे भरुन पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग करावा लागतो. तर सप्टेंबर महिन्यापासून पश्चिमेकडे पाऊस कमी होतो. मात्र, मागील काही वर्षांत ऑक्टोबरमध्येही जिल्ह्यात अतिवृष्टी होऊ लागली. हा पाऊस पश्चिम भागातही होत असतो. त्यामुळे ऑक्टोबरमध्येही पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांतून विसर्ग करावा लागला आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे अनेक धरणांतून विसर्ग सुरू करावा लागलेला. तर यंदाही ऑक्टोबर महिन्यात सतत पाच दिवस चांगलाच पाऊस झाला. तर १३ आणि १४ ऑक्टोबरला अतिवृष्टी झाली. यामुळे कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडावे लागले. पायथा वीजगृह तसेच सहा दरवाजे वर उचलून कोयना नदीपात्रात पाणी सोडावे लागले.कोयना धरणाचा विचार करता २०१० पासून आतापर्यंत सहावेळा अतिवृष्टीमुळे दरवाजातून पाणी सोडावे लागले आहे. यापूर्वी २०१० च्या ऑक्टोबरमध्ये तीनवेळेला दरवाजातून विसर्ग करावा लागलेला. तर २०१३ लाही तीनवेळा, २०१६ ला सहावेळा, २०१७ ला दोन आणि २०१९ मध्ये तब्बल सातवेळा ऑक्टोबरमध्ये कोयनेच्या दरवाजाातून पाणी सोडावे लागलेले. यावर्षीही अतिवृष्टीमुळे विसर्ग करावा लागला आहे.कोयनेला आतापर्यंत ४४६७ मिलिमीटर पाऊस...जिल्ह्याच्या पश्चिम भागात यंदा गतवर्षीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. मागीवर्षी कोयनेला आतापर्यंत ७३६६ मिलिमीटर पाऊस झालेला. तर यावर्षी १८ ऑक्टोबरपर्यंत फक्त ४४६७ मिलिमीटर पाऊस झाला. तसेच नवजा येथेही पावसाचे प्रमाण यंदा कमी आहे.

गतवर्षी ८३९३ तर यंदा ५१७६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर महाबळेश्वरला आतापर्यंत ५१९२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी ७३११ मिलिमीटर पाऊस महाबळेश्वरमध्ये पडला होता. यावर्षी पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.

 

 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर