शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

ऑक्टोबर महिन्यात १० वर्षांमध्ये कोयनेतून सोडले सहावेळा पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 13:04 IST

Koyana Dam, sataranews, rain, सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने धरणे भरतात. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रणासाठी विसर्ग सुरू करावा लागतो.

ठळक मुद्देऑक्टोबर महिन्यात १० वर्षांमध्ये कोयनेतून सोडले सहावेळा पाणी अतिवृष्टीचा परिणाम : दरवाजातून करण्यात आला विसर्ग; यंदाही पाणी सोडले

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने धरणे भरतात. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रणासाठी विसर्ग सुरू करावा लागतो. पावसाळ्यात अधिक प्रमाणात पाणी सोडले जाते. पण, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी होत असेल तर ही बाब वेगळी ठरते. अशाचप्रकारे मागील १० वर्षांत ऑक्टोबरमधील अतिवृष्टीमुळे कोयनेच्या दरवाजातून सहावेळा पाणी सोडावे लागले आहे.जिल्ह्याचा पश्चिम भाग हा पावसाचा. कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली, कास या भागात पावसाळ्यात धुवाँधार असते. या भागातील पावसावरच कोयना धरणा धरण भरणार का नाही हे अवलंबून राहते. तसेच प्रमुख धरणे ही जिल्ह्याच्या पश्चिम भागातच आहेत. अपवाद वगळता दरवर्षी ही धरणे भरतात.

बहुतांशीवेळा ऑगस्ट अखेरपर्यंत धरणे भरुन पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग करावा लागतो. तर सप्टेंबर महिन्यापासून पश्चिमेकडे पाऊस कमी होतो. मात्र, मागील काही वर्षांत ऑक्टोबरमध्येही जिल्ह्यात अतिवृष्टी होऊ लागली. हा पाऊस पश्चिम भागातही होत असतो. त्यामुळे ऑक्टोबरमध्येही पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांतून विसर्ग करावा लागला आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे अनेक धरणांतून विसर्ग सुरू करावा लागलेला. तर यंदाही ऑक्टोबर महिन्यात सतत पाच दिवस चांगलाच पाऊस झाला. तर १३ आणि १४ ऑक्टोबरला अतिवृष्टी झाली. यामुळे कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडावे लागले. पायथा वीजगृह तसेच सहा दरवाजे वर उचलून कोयना नदीपात्रात पाणी सोडावे लागले.कोयना धरणाचा विचार करता २०१० पासून आतापर्यंत सहावेळा अतिवृष्टीमुळे दरवाजातून पाणी सोडावे लागले आहे. यापूर्वी २०१० च्या ऑक्टोबरमध्ये तीनवेळेला दरवाजातून विसर्ग करावा लागलेला. तर २०१३ लाही तीनवेळा, २०१६ ला सहावेळा, २०१७ ला दोन आणि २०१९ मध्ये तब्बल सातवेळा ऑक्टोबरमध्ये कोयनेच्या दरवाजाातून पाणी सोडावे लागलेले. यावर्षीही अतिवृष्टीमुळे विसर्ग करावा लागला आहे.कोयनेला आतापर्यंत ४४६७ मिलिमीटर पाऊस...जिल्ह्याच्या पश्चिम भागात यंदा गतवर्षीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. मागीवर्षी कोयनेला आतापर्यंत ७३६६ मिलिमीटर पाऊस झालेला. तर यावर्षी १८ ऑक्टोबरपर्यंत फक्त ४४६७ मिलिमीटर पाऊस झाला. तसेच नवजा येथेही पावसाचे प्रमाण यंदा कमी आहे.

गतवर्षी ८३९३ तर यंदा ५१७६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर महाबळेश्वरला आतापर्यंत ५१९२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी ७३११ मिलिमीटर पाऊस महाबळेश्वरमध्ये पडला होता. यावर्षी पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.

 

 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर