शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या हजाराजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:19 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून टंचाईची स्थिती वाढली असून, सध्या २३१ गावं ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून टंचाईची स्थिती वाढली असून, सध्या २३१ गावं आणि ९५९ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालाय. तर तब्बल ४ लाख नागरिक आणि २ लाख पशुधन टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. मान्सूनचा पाऊस लांबल्यास जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता आणखी वाढणार आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पश्चिम भागात पाऊस झाला असला तरी पूर्व भाग मात्र, कोरडाच राहिला. सुरुवातीच्या काळात मान्सूनचा पाऊस झाला. पण, आॅगस्टनंतर पूर्व दुष्काळी भागात अपवादानेच पाऊस झाला. तसेच परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच माण तालुक्यातील अनेक गावांत टंचाईची स्थिती निर्माण झाली होती.माण तालुक्यातील सध्या ७८ गावे आणि ६१५ वाड्यांना ११३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर १ लाख ४४ हजार ९८९ नागरिक आणि ६४ हजार ७०० पशुधन अवलंबून आहे. या तालुक्यासाठी टँकर खेपा २३५ मंजूर असल्या तरी शुक्रवारी फक्त १९२ झाल्या. खटाव तालुक्यातही टंचाईची तीव्रता वाढली असून ४८ गावं आणि १६६ वाड्यांसाठी ४३ टँकर सुरू आहेत. तालुक्यातील ९१ हजार ८८० नागरिक आणि ४२ हजार ७३९ पशुधन टँकरवर अवलंबून आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत तालुक्यात १ टँकर वाढला आहे. कोरेगाव तालुक्यातही टंचाईची स्थिती असून, ३३ गावांना ३६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. ४९ हजार ५० नागरिक व २२ हजार ५१२ पशुधन टँकरवर तहान भागवत आहे.फलटण तालुक्यातही टंचाई गावांच्या संख्येत वाढ झालीय. तालुक्यातील ३४ गावं व १५० वाड्यांतील ७८ हजार ६२३ ग्रामस्थ आणि ४८ हजार २५२ पशुधनाला टँकरचा आधार आहे. तालुक्यात ३७ टँकरची चाकं दुष्काळग्रस्तांसाठी धावत आहेत. वाई तालुक्यात ८ गावं व ४ वाड्यांसाठी ७ टँकर सुरू आहेत. ६ हजार ३८३ ग्रामस्थ आणि ७ हजार ५८८ पशुधनाला टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. खंडाळा तालुक्यात २ टँकर सुरू असून त्या माध्यमातून ३ गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. महाबळेश्वर तालुक्यात सध्या ७ गावं आणि ३ वाड्यांसाठी ४ टँकर मंजूर आहेत. सातारा तालुक्यातही एक गाव आणि ५ वाड्यांना २ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालाय. कºहाड तालुक्यातील ६ गावांत टंचाईची स्थिती आहे.पावसाचा तालुका अशी ओळख असणाऱ्या पाटण तालुक्यातील २ गावं अन् ७ वाड्यांना टंचाईची झळ बसलीय. तेथील ४ हजार ३८४ ग्रामस्थ आणि १ हजार ४२७ जनावरांसाठी ६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तर जावळी तालुक्यातही १३ टँकरची चाकं फिरत आहेत. या टँकरवर ११ गावं आणि ९ वाड्यांतील ११ हजार २६० ग्रामस्थ अवलंबून आहेत.