शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या हजाराजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:19 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून टंचाईची स्थिती वाढली असून, सध्या २३१ गावं ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून टंचाईची स्थिती वाढली असून, सध्या २३१ गावं आणि ९५९ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालाय. तर तब्बल ४ लाख नागरिक आणि २ लाख पशुधन टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. मान्सूनचा पाऊस लांबल्यास जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता आणखी वाढणार आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पश्चिम भागात पाऊस झाला असला तरी पूर्व भाग मात्र, कोरडाच राहिला. सुरुवातीच्या काळात मान्सूनचा पाऊस झाला. पण, आॅगस्टनंतर पूर्व दुष्काळी भागात अपवादानेच पाऊस झाला. तसेच परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच माण तालुक्यातील अनेक गावांत टंचाईची स्थिती निर्माण झाली होती.माण तालुक्यातील सध्या ७८ गावे आणि ६१५ वाड्यांना ११३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर १ लाख ४४ हजार ९८९ नागरिक आणि ६४ हजार ७०० पशुधन अवलंबून आहे. या तालुक्यासाठी टँकर खेपा २३५ मंजूर असल्या तरी शुक्रवारी फक्त १९२ झाल्या. खटाव तालुक्यातही टंचाईची तीव्रता वाढली असून ४८ गावं आणि १६६ वाड्यांसाठी ४३ टँकर सुरू आहेत. तालुक्यातील ९१ हजार ८८० नागरिक आणि ४२ हजार ७३९ पशुधन टँकरवर अवलंबून आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत तालुक्यात १ टँकर वाढला आहे. कोरेगाव तालुक्यातही टंचाईची स्थिती असून, ३३ गावांना ३६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. ४९ हजार ५० नागरिक व २२ हजार ५१२ पशुधन टँकरवर तहान भागवत आहे.फलटण तालुक्यातही टंचाई गावांच्या संख्येत वाढ झालीय. तालुक्यातील ३४ गावं व १५० वाड्यांतील ७८ हजार ६२३ ग्रामस्थ आणि ४८ हजार २५२ पशुधनाला टँकरचा आधार आहे. तालुक्यात ३७ टँकरची चाकं दुष्काळग्रस्तांसाठी धावत आहेत. वाई तालुक्यात ८ गावं व ४ वाड्यांसाठी ७ टँकर सुरू आहेत. ६ हजार ३८३ ग्रामस्थ आणि ७ हजार ५८८ पशुधनाला टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. खंडाळा तालुक्यात २ टँकर सुरू असून त्या माध्यमातून ३ गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. महाबळेश्वर तालुक्यात सध्या ७ गावं आणि ३ वाड्यांसाठी ४ टँकर मंजूर आहेत. सातारा तालुक्यातही एक गाव आणि ५ वाड्यांना २ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालाय. कºहाड तालुक्यातील ६ गावांत टंचाईची स्थिती आहे.पावसाचा तालुका अशी ओळख असणाऱ्या पाटण तालुक्यातील २ गावं अन् ७ वाड्यांना टंचाईची झळ बसलीय. तेथील ४ हजार ३८४ ग्रामस्थ आणि १ हजार ४२७ जनावरांसाठी ६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तर जावळी तालुक्यातही १३ टँकरची चाकं फिरत आहेत. या टँकरवर ११ गावं आणि ९ वाड्यांतील ११ हजार २६० ग्रामस्थ अवलंबून आहेत.