शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या हजाराजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:19 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून टंचाईची स्थिती वाढली असून, सध्या २३१ गावं ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून टंचाईची स्थिती वाढली असून, सध्या २३१ गावं आणि ९५९ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालाय. तर तब्बल ४ लाख नागरिक आणि २ लाख पशुधन टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. मान्सूनचा पाऊस लांबल्यास जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता आणखी वाढणार आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पश्चिम भागात पाऊस झाला असला तरी पूर्व भाग मात्र, कोरडाच राहिला. सुरुवातीच्या काळात मान्सूनचा पाऊस झाला. पण, आॅगस्टनंतर पूर्व दुष्काळी भागात अपवादानेच पाऊस झाला. तसेच परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच माण तालुक्यातील अनेक गावांत टंचाईची स्थिती निर्माण झाली होती.माण तालुक्यातील सध्या ७८ गावे आणि ६१५ वाड्यांना ११३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर १ लाख ४४ हजार ९८९ नागरिक आणि ६४ हजार ७०० पशुधन अवलंबून आहे. या तालुक्यासाठी टँकर खेपा २३५ मंजूर असल्या तरी शुक्रवारी फक्त १९२ झाल्या. खटाव तालुक्यातही टंचाईची तीव्रता वाढली असून ४८ गावं आणि १६६ वाड्यांसाठी ४३ टँकर सुरू आहेत. तालुक्यातील ९१ हजार ८८० नागरिक आणि ४२ हजार ७३९ पशुधन टँकरवर अवलंबून आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत तालुक्यात १ टँकर वाढला आहे. कोरेगाव तालुक्यातही टंचाईची स्थिती असून, ३३ गावांना ३६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. ४९ हजार ५० नागरिक व २२ हजार ५१२ पशुधन टँकरवर तहान भागवत आहे.फलटण तालुक्यातही टंचाई गावांच्या संख्येत वाढ झालीय. तालुक्यातील ३४ गावं व १५० वाड्यांतील ७८ हजार ६२३ ग्रामस्थ आणि ४८ हजार २५२ पशुधनाला टँकरचा आधार आहे. तालुक्यात ३७ टँकरची चाकं दुष्काळग्रस्तांसाठी धावत आहेत. वाई तालुक्यात ८ गावं व ४ वाड्यांसाठी ७ टँकर सुरू आहेत. ६ हजार ३८३ ग्रामस्थ आणि ७ हजार ५८८ पशुधनाला टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. खंडाळा तालुक्यात २ टँकर सुरू असून त्या माध्यमातून ३ गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. महाबळेश्वर तालुक्यात सध्या ७ गावं आणि ३ वाड्यांसाठी ४ टँकर मंजूर आहेत. सातारा तालुक्यातही एक गाव आणि ५ वाड्यांना २ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालाय. कºहाड तालुक्यातील ६ गावांत टंचाईची स्थिती आहे.पावसाचा तालुका अशी ओळख असणाऱ्या पाटण तालुक्यातील २ गावं अन् ७ वाड्यांना टंचाईची झळ बसलीय. तेथील ४ हजार ३८४ ग्रामस्थ आणि १ हजार ४२७ जनावरांसाठी ६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तर जावळी तालुक्यातही १३ टँकरची चाकं फिरत आहेत. या टँकरवर ११ गावं आणि ९ वाड्यांतील ११ हजार २६० ग्रामस्थ अवलंबून आहेत.