शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांची संख्या शेकड्यात !

By admin | Updated: December 1, 2014 00:22 IST

बावधन : काविळीबाबत उपाययोजना नसल्याने ग्रामस्थांत नाराजी

बावधन : दूषित पाण्यामुळे बावधन परिसरात पंधरा दिवसांत काविळी झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांची संख्या तीनशेवर पोहोचली आहे. यामुळे नागरिकामध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून म्हणाव्या त्याप्रमाणात उपाययोजना करण्यात न आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य विभागानेही याकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.सुमारे पंधरा हजार लोकवस्ती असलेल्या वाई तालुक्याला बावधन गावाला नागेवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु शुध्दीकरण प्रक्रिया करणारा प्रकल्प सध्या बंद अवस्थेत आहे. पाण्यामध्ये टी.सी.एल. पावडर टाकून ते पिण्यासाठी वापरले जाते. परंतु ते सुध्दा योग्य प्रमाणात टाकले गेले नसल्याने अनेकवेळा तपासणीत निष्पन्न झाले आहे. ग्रामसभेत दूषित पाण्यासंबंधी अनेकवेळा वादळी चर्चा झाली आहे. मात्र, प्रत्यक्ष त्याबाबत कसलीही कार्यवाही झाली नसल्याचे काविळ झालेल्या रुग्णांच्या संख्येवरून उघड झाले आहे.महिला, पुरुष, युवक, वृद्ध नागरिकांना दूषित पाणी पिल्याने काविळीची लागण झाली. सध्या बावधन आरोग्य केंद्र व वाईतील विविध खासगी रुग्णालयात ग्रामस्थ उपचार घेत आहेत. रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णांची संख्या वाढत असतानाच ग्रामपंचायत उपाययोजना करत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. आरोग्य विभागाकडे संपर्क साधला असता काविळीचे रुग्ण आढळून आल्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार करून स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबाबत सूचना केल्या होत्या. यापूर्वीही अतिसार, उलट्या, जुलाब व पोटाचे विकार आढळून आल्यानंतर पाण्याच्या स्वच्छतेबाबत सावधगिरी बाळगण्याचे लेखीपत्राद्वारे कळविले होते, असे सांगण्यात आले. (वार्ताहर) आरोग्य विभाग जागा होणार का ?बावधन येथे दूषित पाण्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही याकडे संबंधितांनी म्हणावे तसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळण्याचाच हा प्रकार आहे. यामुळे आरोग्य विभाग जागा होणार का, असा प्रश्न आहे.