शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीच्या भागात यंदा जळवांचे प्रमाण दुप्पट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:46 IST

पेट्री : जून महिन्यापासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे कास पठार परिसर, सह्याद्रीनगर-गाळदेवपर्यंतचा डोंगरमाथ्यावरील पट्टा, दुर्गम कांदाटी खोऱ्यातील डोंगरमाथ्याच्या संपूर्ण भागात ...

पेट्री : जून महिन्यापासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे कास पठार परिसर, सह्याद्रीनगर-गाळदेवपर्यंतचा डोंगरमाथ्यावरील पट्टा, दुर्गम कांदाटी खोऱ्यातील डोंगरमाथ्याच्या संपूर्ण भागात रक्तशोषक जळवांचा सुळसुळाट झाला आहे. पाळीव जनावरे, माणसे यांना त्रास सहन करावा लागत आहे.

दरवर्षी जूनचा पाऊस सुरू झाल्यावर दलदलीच्या ठिकाणी जळवा आढळतात. ज्या ठिकाणी पालापाचोळा, गवत कुजलेले असते अशा ठिकाणी यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. मानवी वस्तीपासून दूर असणारी ही जळू मोठ्या प्रमाणात मानवीवस्तीत आढळत आहे. रानामध्ये चरावयास गेलेल्या जनावरांच्या माध्यमातून ही घरापर्यंत पोहोचत आहेत. अनेक पर्यटकांना जळू लागून रक्तस्रावाला सामोरे जावे लागत आहे.

एक अपृष्ठवंशी बाह्यपरजीवी प्राणी जळूचा समावेश ॲनेलिडा (वलयांकित) संघाच्या हिरुडिनिया वर्गात करण्यात येतो. जगभर यांच्या सुमारे तीनशे जाती आहेत. शरीराची लांबी १ ते २० सेंमी असते आणि ताणल्यावर लांबी वाढते. शरीराच्या पुढच्या टोकाला एक लहान चूषक असून, यात तोंड असते. मागील टोकाला मोठे चूषक असते. काही जळवा मासे, बेडूक, गायी-म्हशी किंवा कवचधारी प्राण्यांच्या शरीरावर जगतात. काही कुजलेल्या पदार्थांवर जगतात, तर काही परजीवी असतात.

चूषकांचा वापर हालचाल करण्यासाठी आणि ज्याचे रक्त प्यायचे आहे त्याला पकडून ठेवण्यासाठी होतो. जळू त्वचेवर वाय आकाराची चीर करते. जळूच्या अन्ननलिकेत असणाऱ्या ग्रसनीभोवती असंख्य एकपेशीय लालोत्पादक ग्रंथी असतात. या ग्रंथी हिरुडिन स्रवतात. स्रावामुळे जखम झालेली जागा बधिर होते. तेथील रक्तप्रवाह वाढतो आणि रक्त गोठण्याची क्रिया थांबते. जळू एकावेळी तिच्या वजनाच्या तीनपट रक्त शोषून घेते.

चौकट

घ्यावयाची काळजी

कास परिसरात फिरताना जळवा लागण्याचा धोका असून, शक्यतो पायावर जास्त चढतात. ज्या ठिकाणी रक्त पिते त्या ठिकाणी खाज सुटते. खाज होत असल्यास त्या ठिकाणी लगेच पाहा, दुर्लक्ष करू नका. गवतातून फिरून आल्यावर पाय नीट पाहा.

नीट लक्ष दिल्यास जळू चिकटलेली लक्षात येते. पायावर चढल्यास घाबरू नका.

कागद वगैरे घेऊन पकडून काढून टाका.

रक्त येत असलेल्या ठिकाणी हळद मिळाल्यास लावा. कोरोनामुळे प्रत्येकाच्या जवळ सॅनिटायजर असते. जळूवर सॅनिटायजर मारल्यास तत्काळ चिकटलेली जागा सोडून मरण पावते.

पाऊस जाऊन ऊन कडक पडल्याशिवाय जळवांचा धोका कमी होणार नाही. पावसाला वैतागलेल्या लोकांना या नवीन त्रासाने चांगलेच जेरीस आणले आहे.