शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

कोयना धरणातील पाणीसाठ्यावर आताच विचार करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:44 IST

पाटण : पाटण तालुक्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात प्रचंड अतिवृष्टी आणि ढगफुटी झाली. त्यामुळे ...

पाटण : पाटण तालुक्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात प्रचंड अतिवृष्टी आणि ढगफुटी झाली. त्यामुळे झालेले भयानक भूस्खलन याची झळ जनतेने सोसली आहे. यात अनेकांचे जीव गेले. आता याची पुनरावृत्ती होऊ नये असे सर्वांना वाटते. म्हणून कोयना धरणातील पाणीसाठ्याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक बनले आहे.

कोयना धरणात १९ ऑगस्टच्या सायंकाळी पाचच्या सुमारास ९२.५९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. म्हणजेच कोयना धरण ९८.९७ टक्के भरले आहे. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. त्यापैकी पाच टीएमसी पाणी धरणातील गाळमिश्रित असते. ते उणे जाता कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता शंभर टीएमसी आहे.

त्यापैकी आता ९२.५९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. म्हणजेच कोयना धरणातील पाणीसाठ्याचे तातडीने नियोजन करणे आवश्यक आहे.

कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरावे म्हणजेच वर्षभराची चिंता मिटली असे सर्वांनाच वाटते, परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर अजूनही पावसाचे दिवस शिल्लक आहेत. तसेच हवामान खात्याचा मोठी अतिवृष्टी होणार, असा अंदाज व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे कोयना धरणात झालेला ९२ टीएमसी पाणीसाठा पुन्हा संकट ओढवेल, अशीच भीती व्यक्त करण्यात येत आहे. अतिवृष्टी पुन्हा झाली तर धरण व्यवस्थापनाला नाइलाजाने कोयना धरणाचे दरवाजे उघडून आपत्कालीन परिस्थितीत पाणी सोडावे लागते आणि मग सांगलीपर्यंतच्या गावात पूर परिस्थिती निर्माण होते. तेव्हा आताच पावसाची उघडीप आहे तरच कोयना धरणातील पाणी काही प्रमाणात रिकामे करणे यावर विचार होणे आवश्यक आहे.

सध्याच्या परिस्थितीत कोयना धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या पायथा वीजग्रहातून केवळ २१०० क्यूसेक पाणी सोडले जाते. धरणाची जबाबदारी असणारे अभियंते कोयना धरणात जेवढे पाणी येते तेवढेच पायथा वीजगृहातून सोडत आहेत. त्यामुळे धरणातील पाणीसाठा स्थिर राहत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ ८ टीएमसी पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. ही गरज पाऊस थांबला तरी कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक यावर सहज पूर्ण होईल.

चौकट

पाच हजार मिलिमीटरचा आकडा गाठला नाही

कोयना, नवजा आणि महाबळेश्वर येथील पर्जन्यमापकावर पाच हजार मिलिमीटर पावसाची नोंद दरवर्षी होत असते. या वर्षी मोठ्या प्रमाणात ढगफुटी, अतिवृष्टी होऊनही तिन्ही ठिकाणी पाच हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा गाठलेला दिसत नाही.

कोट

हवामान अंदाजानुसार जिल्ह्याला सध्या तरी ग्रीन अलर्ट आहे. कोयना धरणात सध्या ९२ टीएमसी पाणीसाठा असला तरी धरणाच्या दरवाजातून पाणी सोडण्याचा सध्या तरी विचार नाही. पायथा वीजगृहातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले. कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य ते नियोजन केले आहे.

- नितेश पोतदार,

कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन मंडळ