शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या फडात आता राजकीय आखाडा !

By admin | Updated: October 21, 2014 23:43 IST

गाळप हंगाम : एक नोव्हेंबरपासून गाळपाला सुरुवात

वाठार स्टेशन : विधानसभेच्या राजकीय रणधुमाळीनंतर आता ऊस गाळप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. चालू गाळप हंगामासाठी गतवर्षीएवढेच ६३ लाख मे टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील कारखान्यापुढे राहणार आहे.१ नोव्हेंबर पासून बहुतांशी सर्वच कारखान्यांनी आपआपल्या हंगामाचा शुभारंभ निश्चित केला आहे. हंगामपूर्व तयारीमध्ये कृष्णा, अजिंक्य, किसन वीर, प्रतापगड, बाळासाहेब देसाई, न्यू फलटण साखरवाडी यांनी बॉयलर अग्निप्रदीपन करीत तोडणी यंत्रणेसाठी आपली यंत्रणा मार्गस्थ केली आहे.विधानसभेच्या निवडणुका तसेच निवडणुकानंतर लगेचच दिवाळीचा सण आल्याने हा सण करूनच आता तोडणी यंत्रणा जिल्ह्यातील तोडणी कामासाठी हजर राहील, अशी परिस्थिती आहे.एका बाजूने कारखाने गाळप हंगामासाठी आक्रमक असले तरी अद्याप गतवर्षीच्या जाहीर दरापैकी दुसरा हप्ताच न मिळाल्याने शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीत शिमगा करण्याचीच वेळ आली आहे. चालू हंगामातील दराबाबत भूमिकाच निश्चित नसल्याने ऊस दरासाठी पुन्हा हा हंगाम विस्कळीत होणार, हे निश्चित मानले जाते. गतवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्यातच ऊस आंदोलनाचे केंद्रस्थान बनवले असले तरी साताऱ्यातील हे ऊस आंदोलन फोल ठरल्याने चालू हंगामात शेतकरी संघटना कोणते पाऊल उचलणार, आंदोलन कोणत्या पध्दतीने होणार हे स्वाभिमानीच्या राज्यस्तरीय ऊस परिषदेतच जाहीर होणार असल्याने या परिषदेने शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.केंद्राने चालू हंगामासाठी एफ. आर. पी. निश्चित केली असून गतवर्षीपेक्षा शंभर रुपयांनी एफ. आर. पी. वाढविण्यात आली आहे. गतवर्षी ९.५० साखर उताऱ्यासाठी २१०० रुपये एफ. आर. पी. होती. मात्र, आता ९.५० साखर उताऱ्याला २२०० रुपये जाहीर केले आहेत. जिल्ह्यात ११.५० ते १२ साखर उतारा ग्राह्य धरल्यास २,६६४ ते २,७०० रुपयांपर्यंत एफ. आर. पी. निश्चित होणार आहे. यातून तोडणी वाहतूक वजा केल्यास २४०० ते २५०० हाच दर निश्चित होईल, अशी परिस्थिती आहे.कारखानदारांतील इतर उपप्रकल्पांची गोळा बेरीज केल्यास चालू हंगामात २७०० ते २८०० ऊस दर जाहीर होण्याबाबत अडचण राहणार नाही. (वार्ताहर)ऊस दराबाबत मार्ग निघणार का ?प्रतिवर्षी केवळ अडवणू करीत चिघळणाऱ्या ऊस दर अंदोलनापूर्वीच आता कारखानदार शेतकरी संघटना, प्रतिनिधींनी एकत्रितपणे मार्ग काढून चालू हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. गतवर्षीही गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासूनच कार्यरत झाला असल्यामुळे यावर्षीही याच दरम्यान जिल्ह्यातील कारखाने यशस्वी गाळप सुरू करतील, अशी शक्यता आहे.