शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

उसाच्या फडात आता राजकीय आखाडा !

By admin | Updated: October 21, 2014 23:43 IST

गाळप हंगाम : एक नोव्हेंबरपासून गाळपाला सुरुवात

वाठार स्टेशन : विधानसभेच्या राजकीय रणधुमाळीनंतर आता ऊस गाळप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. चालू गाळप हंगामासाठी गतवर्षीएवढेच ६३ लाख मे टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील कारखान्यापुढे राहणार आहे.१ नोव्हेंबर पासून बहुतांशी सर्वच कारखान्यांनी आपआपल्या हंगामाचा शुभारंभ निश्चित केला आहे. हंगामपूर्व तयारीमध्ये कृष्णा, अजिंक्य, किसन वीर, प्रतापगड, बाळासाहेब देसाई, न्यू फलटण साखरवाडी यांनी बॉयलर अग्निप्रदीपन करीत तोडणी यंत्रणेसाठी आपली यंत्रणा मार्गस्थ केली आहे.विधानसभेच्या निवडणुका तसेच निवडणुकानंतर लगेचच दिवाळीचा सण आल्याने हा सण करूनच आता तोडणी यंत्रणा जिल्ह्यातील तोडणी कामासाठी हजर राहील, अशी परिस्थिती आहे.एका बाजूने कारखाने गाळप हंगामासाठी आक्रमक असले तरी अद्याप गतवर्षीच्या जाहीर दरापैकी दुसरा हप्ताच न मिळाल्याने शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीत शिमगा करण्याचीच वेळ आली आहे. चालू हंगामातील दराबाबत भूमिकाच निश्चित नसल्याने ऊस दरासाठी पुन्हा हा हंगाम विस्कळीत होणार, हे निश्चित मानले जाते. गतवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्यातच ऊस आंदोलनाचे केंद्रस्थान बनवले असले तरी साताऱ्यातील हे ऊस आंदोलन फोल ठरल्याने चालू हंगामात शेतकरी संघटना कोणते पाऊल उचलणार, आंदोलन कोणत्या पध्दतीने होणार हे स्वाभिमानीच्या राज्यस्तरीय ऊस परिषदेतच जाहीर होणार असल्याने या परिषदेने शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.केंद्राने चालू हंगामासाठी एफ. आर. पी. निश्चित केली असून गतवर्षीपेक्षा शंभर रुपयांनी एफ. आर. पी. वाढविण्यात आली आहे. गतवर्षी ९.५० साखर उताऱ्यासाठी २१०० रुपये एफ. आर. पी. होती. मात्र, आता ९.५० साखर उताऱ्याला २२०० रुपये जाहीर केले आहेत. जिल्ह्यात ११.५० ते १२ साखर उतारा ग्राह्य धरल्यास २,६६४ ते २,७०० रुपयांपर्यंत एफ. आर. पी. निश्चित होणार आहे. यातून तोडणी वाहतूक वजा केल्यास २४०० ते २५०० हाच दर निश्चित होईल, अशी परिस्थिती आहे.कारखानदारांतील इतर उपप्रकल्पांची गोळा बेरीज केल्यास चालू हंगामात २७०० ते २८०० ऊस दर जाहीर होण्याबाबत अडचण राहणार नाही. (वार्ताहर)ऊस दराबाबत मार्ग निघणार का ?प्रतिवर्षी केवळ अडवणू करीत चिघळणाऱ्या ऊस दर अंदोलनापूर्वीच आता कारखानदार शेतकरी संघटना, प्रतिनिधींनी एकत्रितपणे मार्ग काढून चालू हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. गतवर्षीही गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासूनच कार्यरत झाला असल्यामुळे यावर्षीही याच दरम्यान जिल्ह्यातील कारखाने यशस्वी गाळप सुरू करतील, अशी शक्यता आहे.