शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

उसाच्या फडात आता राजकीय आखाडा !

By admin | Updated: October 21, 2014 23:43 IST

गाळप हंगाम : एक नोव्हेंबरपासून गाळपाला सुरुवात

वाठार स्टेशन : विधानसभेच्या राजकीय रणधुमाळीनंतर आता ऊस गाळप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. चालू गाळप हंगामासाठी गतवर्षीएवढेच ६३ लाख मे टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील कारखान्यापुढे राहणार आहे.१ नोव्हेंबर पासून बहुतांशी सर्वच कारखान्यांनी आपआपल्या हंगामाचा शुभारंभ निश्चित केला आहे. हंगामपूर्व तयारीमध्ये कृष्णा, अजिंक्य, किसन वीर, प्रतापगड, बाळासाहेब देसाई, न्यू फलटण साखरवाडी यांनी बॉयलर अग्निप्रदीपन करीत तोडणी यंत्रणेसाठी आपली यंत्रणा मार्गस्थ केली आहे.विधानसभेच्या निवडणुका तसेच निवडणुकानंतर लगेचच दिवाळीचा सण आल्याने हा सण करूनच आता तोडणी यंत्रणा जिल्ह्यातील तोडणी कामासाठी हजर राहील, अशी परिस्थिती आहे.एका बाजूने कारखाने गाळप हंगामासाठी आक्रमक असले तरी अद्याप गतवर्षीच्या जाहीर दरापैकी दुसरा हप्ताच न मिळाल्याने शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीत शिमगा करण्याचीच वेळ आली आहे. चालू हंगामातील दराबाबत भूमिकाच निश्चित नसल्याने ऊस दरासाठी पुन्हा हा हंगाम विस्कळीत होणार, हे निश्चित मानले जाते. गतवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्यातच ऊस आंदोलनाचे केंद्रस्थान बनवले असले तरी साताऱ्यातील हे ऊस आंदोलन फोल ठरल्याने चालू हंगामात शेतकरी संघटना कोणते पाऊल उचलणार, आंदोलन कोणत्या पध्दतीने होणार हे स्वाभिमानीच्या राज्यस्तरीय ऊस परिषदेतच जाहीर होणार असल्याने या परिषदेने शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.केंद्राने चालू हंगामासाठी एफ. आर. पी. निश्चित केली असून गतवर्षीपेक्षा शंभर रुपयांनी एफ. आर. पी. वाढविण्यात आली आहे. गतवर्षी ९.५० साखर उताऱ्यासाठी २१०० रुपये एफ. आर. पी. होती. मात्र, आता ९.५० साखर उताऱ्याला २२०० रुपये जाहीर केले आहेत. जिल्ह्यात ११.५० ते १२ साखर उतारा ग्राह्य धरल्यास २,६६४ ते २,७०० रुपयांपर्यंत एफ. आर. पी. निश्चित होणार आहे. यातून तोडणी वाहतूक वजा केल्यास २४०० ते २५०० हाच दर निश्चित होईल, अशी परिस्थिती आहे.कारखानदारांतील इतर उपप्रकल्पांची गोळा बेरीज केल्यास चालू हंगामात २७०० ते २८०० ऊस दर जाहीर होण्याबाबत अडचण राहणार नाही. (वार्ताहर)ऊस दराबाबत मार्ग निघणार का ?प्रतिवर्षी केवळ अडवणू करीत चिघळणाऱ्या ऊस दर अंदोलनापूर्वीच आता कारखानदार शेतकरी संघटना, प्रतिनिधींनी एकत्रितपणे मार्ग काढून चालू हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. गतवर्षीही गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासूनच कार्यरत झाला असल्यामुळे यावर्षीही याच दरम्यान जिल्ह्यातील कारखाने यशस्वी गाळप सुरू करतील, अशी शक्यता आहे.