शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

आता उंडाळकरांना ‘नारळ’ द्या भाई जगतापांचा कऱ्हाडात टोला

By admin | Updated: October 7, 2014 23:41 IST

काँग्रेसमुळेच काका ३५ वर्षे आमदार; तरीही शेवटच्या क्षणी गद्दारी

कऱ्हाड : आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांना काँग्रेसच्या तिरंग्यामुळेच ३५ वर्षे आमदार होण्याचा सन्मान मिळाला़ पक्षाने त्यांना भरभरून दिले; पण त्यांनी या निवडणुकीत गद्दारी केली़ त्यामुळे त्यांना आता कायमचा ‘नारळ’ द्या, त्यांना घरीच बसवा,’ असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार भाई जगताप यांनी लगावला़ कऱ्हाड येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते़ अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, अरुण जाधव, फारुक पटवेकर, नगरसेविका स्मिता हुलवान, सुरेखा पालकर, अरुणा शिंदे, श्रीकांत मुळे, बाळासाहेब यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती़ भाई जगताप म्हणाले, ‘अच्छे दिन’च्या नावाखाली भाजपने लोकसभा निवडणुकीत लोकांना फसवलं; पण आता विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता त्यांच्या फसव्या जाहिरातींना भुलणार नाही़ आज काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याच्या वल्गना काहीजण करीत आहेत़ पण, त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना भारत काँग्रेसमुक्त करता आला नाही़ मग तुम्ही काय महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करणार, उलट महाराष्ट्र कमळाबाई मुक्त झाल्याचेच निवडणुकीनंतर पाहायला मिळेल़,’ असा टोला जगतापांनी लगावला़ जगताप म्हणाले, ‘गुजरातमध्ये त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने शहांना तडीपार करण्यात आले होते़ ते शहा आता महाराष्ट्र घडविणार आहेत, असे म्हणतात; पण साधू संतांच्या अन् सुसंस्कृत महाराष्ट्र अशा संधिसाधूला दाद देणार नाही़ महाराष्ट्र घडविण्यासाठी इथली जनता समर्थ आहे़’ ‘सध्या कऱ्हाड दक्षिणेत अनेक पक्षांच्या अनेक नेत्यांचा सुळसुळाट वाढलाय, तर कऱ्हाडचा नेता महाराष्ट्रभर प्रचारासाठी फिरत आहे़ बाहेरून येऊन कऱ्हाडच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्या या नेत्यांना तुम्ही मतदानाद्वारे त्यांची जागा दाखवून द्या़’ (प्रतिनिधी) कोण हा ‘सडक’मंत्री नितीन गडकरींचा समाचार घेताना जगताप म्हणाले, ‘ते केंद्रात ‘सडक’मंत्री आहेत; पण लोकांवर छाप पडावी म्हणून काहीही बोलतोय़ १९९० मध्ये वाड्यात राहणारे गडकरी अन् सध्याचे गडकरी यांची चौकशी होणे गरजेचे आहे़ स्वत:च्या मुलाच्या लग्नाला १०० विमाने येतात अन् आम्हाला उपदेशाचे डोस पाजतात़ त्यांनी स्वत:ची नैतिकता तपासावी, अन् मगच बोलावे़’