शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

Satara: रस्त्याची ‘वाट’; सार्वजनिक बांधकामची तिघा ठेकेदारांना नोटीस 

By नितीन काळेल | Updated: August 6, 2024 19:18 IST

रस्ते दुरुस्तीबाबत फतवा : पालकमंत्रीही आक्रमक

सातारा : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक रस्त्यांची वाट लागलेली आहे. पावसाळ्यापूर्वी झालेल्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघात घडत आहेत. त्यातच रस्त्यांबाबत पालकमंत्रीही आक्रमक झाले आहेत. यामुळे संबंधित यंत्रणाही कामाला लागली आहे. तसेच आता सार्वजनिक बांधकाम विभागानेही तिघां ठेकेदारांना नोटीस काढून रस्ते दुरुस्तीबाबत फतवा काढला आहे. त्यामुळे आतातरी रस्ता कामाचा दर्जा सुधारावा, अशी मागणी नागिरकांतून होत आहे.जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून पाऊस पडत आहे. पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी होते. पण, पश्चिमेकडे धो-धो पाऊस झाला. यामुळे अनेक रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. खड्ड्यांचे रस्ते झालेले आहेत. तसेच काही मार्गावर तर खोल आणि रुंद मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यावरुनच वाहने जात असल्याने अपघात घडू लागले आहेत. यामुळे बांधकाम विभागाबद्दल सर्वस्तरातून नाराजी व्यक्त होत होती. यामध्येच विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वी अनेक रस्त्यांची कामे उरकण्यात आली. हे रस्तेही पावसात वाहून गेले आहेत. रस्त्याच्या मधोमध चरी पडल्यात. त्यामुळे दुचाकीसारखी वाहने नेताना तारेवरची कसरत करावी लागते.

तर सातारा शहरातील समर्थ मंदिर-सज्जनगड रस्त्याचीही वाट लागलेली आहे. यासाठी उध्दवसेनेने सोमवारी आंदाेलन केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग जागा झाला. या रस्त्याची पूर्ण दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आलेले आहे. पण, हे एका रस्त्याचे झाले. इतर रस्त्यांबद्दलही बांधकाम विभागाने दखल घेण्याची गरज आहे. तरच वाहतुकीस चांगले रस्ते तयार होतील.

सातारा तालुक्यात २, महाबळेश्वरला एकाला नोटीस..सार्वजनिक बांधकाम विभागाचे दोन विभाग आहेत. पश्चिम विभागात कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर, जावळी आणि वाई हे तालुके येतात. तर पूर्व विभागात माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव, सातारा असे सहा तालुके समाविष्ट आहेत. पावसाळ्यात रस्त्याची वाट लागल्यानंतर बांधकाम विभागाने महाबळेश्वर तालुक्यातील एका ठेकेदाराला नोटीस काढली आहे. संबंधिताला तत्परतेने काम केलेल्या रस्त्यावरील खड्डे भरण्यास सांगितले आहे. तर सातारा तालुक्यातीलही दोन ठेकेदारांना रस्त्याबद्दल नोटीस काढण्यात आलेली आहे. तरीही जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची वाट लागली असल्याने जे-जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारक तसेच जिल्ह्यातील नागरिकांतून होत आहे.

पालकमंत्र्यांकडे नागरिकांची मागणी..पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी जिल्हाधकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग चारवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने १५ ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे बुजवावेत, अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला केली आहे. तसेच खड्डे बुजविले नाहीत तर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिलेला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आता जिल्ह्यातील इतर रस्त्यांबाबतही आक्रमक भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad transportरस्ते वाहतूकguardian ministerपालक मंत्री