शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

Satara: रस्त्याची ‘वाट’; सार्वजनिक बांधकामची तिघा ठेकेदारांना नोटीस 

By नितीन काळेल | Updated: August 6, 2024 19:18 IST

रस्ते दुरुस्तीबाबत फतवा : पालकमंत्रीही आक्रमक

सातारा : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक रस्त्यांची वाट लागलेली आहे. पावसाळ्यापूर्वी झालेल्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघात घडत आहेत. त्यातच रस्त्यांबाबत पालकमंत्रीही आक्रमक झाले आहेत. यामुळे संबंधित यंत्रणाही कामाला लागली आहे. तसेच आता सार्वजनिक बांधकाम विभागानेही तिघां ठेकेदारांना नोटीस काढून रस्ते दुरुस्तीबाबत फतवा काढला आहे. त्यामुळे आतातरी रस्ता कामाचा दर्जा सुधारावा, अशी मागणी नागिरकांतून होत आहे.जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून पाऊस पडत आहे. पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी होते. पण, पश्चिमेकडे धो-धो पाऊस झाला. यामुळे अनेक रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. खड्ड्यांचे रस्ते झालेले आहेत. तसेच काही मार्गावर तर खोल आणि रुंद मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यावरुनच वाहने जात असल्याने अपघात घडू लागले आहेत. यामुळे बांधकाम विभागाबद्दल सर्वस्तरातून नाराजी व्यक्त होत होती. यामध्येच विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वी अनेक रस्त्यांची कामे उरकण्यात आली. हे रस्तेही पावसात वाहून गेले आहेत. रस्त्याच्या मधोमध चरी पडल्यात. त्यामुळे दुचाकीसारखी वाहने नेताना तारेवरची कसरत करावी लागते.

तर सातारा शहरातील समर्थ मंदिर-सज्जनगड रस्त्याचीही वाट लागलेली आहे. यासाठी उध्दवसेनेने सोमवारी आंदाेलन केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग जागा झाला. या रस्त्याची पूर्ण दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आलेले आहे. पण, हे एका रस्त्याचे झाले. इतर रस्त्यांबद्दलही बांधकाम विभागाने दखल घेण्याची गरज आहे. तरच वाहतुकीस चांगले रस्ते तयार होतील.

सातारा तालुक्यात २, महाबळेश्वरला एकाला नोटीस..सार्वजनिक बांधकाम विभागाचे दोन विभाग आहेत. पश्चिम विभागात कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर, जावळी आणि वाई हे तालुके येतात. तर पूर्व विभागात माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव, सातारा असे सहा तालुके समाविष्ट आहेत. पावसाळ्यात रस्त्याची वाट लागल्यानंतर बांधकाम विभागाने महाबळेश्वर तालुक्यातील एका ठेकेदाराला नोटीस काढली आहे. संबंधिताला तत्परतेने काम केलेल्या रस्त्यावरील खड्डे भरण्यास सांगितले आहे. तर सातारा तालुक्यातीलही दोन ठेकेदारांना रस्त्याबद्दल नोटीस काढण्यात आलेली आहे. तरीही जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची वाट लागली असल्याने जे-जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारक तसेच जिल्ह्यातील नागरिकांतून होत आहे.

पालकमंत्र्यांकडे नागरिकांची मागणी..पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी जिल्हाधकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग चारवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने १५ ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे बुजवावेत, अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला केली आहे. तसेच खड्डे बुजविले नाहीत तर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिलेला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आता जिल्ह्यातील इतर रस्त्यांबाबतही आक्रमक भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad transportरस्ते वाहतूकguardian ministerपालक मंत्री