शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी रक्कम न देणाऱ्या तीन कारखान्यांना नोटीस

By admin | Updated: April 23, 2016 00:40 IST

साखर आयुक्त : जरंडेश्वर, श्रीराम व न्यू फलटण शुगर वर्कचे गाळप परवाना रद्द करणाऱ्याचा इशारा

वाठार स्टेशन : राज्यातील ऊस गाळप हंगाम २०१५-१६ मध्ये एफआरपीनुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी रक्कम न देणाऱ्या जिल्ह्यातील जरंडेश्वर, श्रीराम व न्यू फलटण शुगर वर्क या तीन कारखान्यांना राज्याचे साखर आयुक्तांनी आदेश १९८४ नुसार नोटीस बजावली आहे. राज्यातील ३२ कारखान्यांना ही नोटीस दिली आहे.या कारखान्यांनी आदेश १९८४ चे खंड ५ नुसार २९ एप्रिल रोजी साखर संकुल पुणे येथे हजर राहून आपली बाजू न मांडल्यास साखर आयुक्त एकतर्फी निर्णय घेऊन या कारखान्याचा गाळप परवाना रद्द करून दंडात्मक कारवाई करणार असल्याचे या नोटिसीत म्हटले आहे. महाराष्ट्र साखर कारखाने आदेश १९८४ नुसार राज्यातील सर्व सहकारी व खासगी कारखान्यांना काही नियम व अटीनुसार गाळप परवाना देण्यात आलेला होता. यामध्ये अट क्र ११ नुसार व ऊस नियंत्रण आदेश १९६६ चे खंड ३ (अ) नुसार कारखान्याला ऊसपुरवठा झाल्यानंतर १४ दिवसांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर दराप्रमाणे ऊसदर देयक जमा करणे बंधनकारक आहे.हंगाम २०१५-१६ मध्ये राज्यातील जवळपास ३२ कारखान्यांनी आपल्या कारखान्याने गाळप केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे १४ दिवसांत हप्ता अदा केला नसल्याची बाब १५ एप्रिल २०१६ च्या सहसंचालक (साखर) यांच्या अहवालानुसार निदर्शनास आली आहे. कारखान्यांनी ऊस नियंत्रण आदेश १९६६ चे खंड ३ (अ) व गाळप परवाना अट क्र. ११ चा भंग केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र साखर कारखाने आदेश १९८४ चे खंड ४ व शासनाच्या १४ आॅक्टोबर २०१५ चे अधिसूचनेतील तरतुदीनुसार संबंधित कारखान्यांवर दंडात्मक कारवाई करणे प्रस्तावित आहे. (वार्ताहर)पुण्यात शुक्रवारी सुनावणी...कारखान्यावर कार्यवाही करण्यापूर्वी कारखान्यास बाजू मांडण्यासाठी दि. २९ एप्रिल २०१६ रोजी सकाळी अकरा वाजता पुणे साखर आयुक्त यांच्यासमोर सुनावणी ठेवण्यात आली आहे. यावेळी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी उपस्थित राहावे, अन्यथा एकतर्फी कारवाई करत आपल्या कारखान्याचा गाळप परवाना रद्द करून दंडात्मक कारवाई करण्यात येइल, अशा सूचना या नोटीसमध्ये बजावण्यात आल्या आहेत.