शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

एफआरपी रक्कम न देणाऱ्या तीन कारखान्यांना नोटीस

By admin | Updated: April 23, 2016 00:40 IST

साखर आयुक्त : जरंडेश्वर, श्रीराम व न्यू फलटण शुगर वर्कचे गाळप परवाना रद्द करणाऱ्याचा इशारा

वाठार स्टेशन : राज्यातील ऊस गाळप हंगाम २०१५-१६ मध्ये एफआरपीनुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी रक्कम न देणाऱ्या जिल्ह्यातील जरंडेश्वर, श्रीराम व न्यू फलटण शुगर वर्क या तीन कारखान्यांना राज्याचे साखर आयुक्तांनी आदेश १९८४ नुसार नोटीस बजावली आहे. राज्यातील ३२ कारखान्यांना ही नोटीस दिली आहे.या कारखान्यांनी आदेश १९८४ चे खंड ५ नुसार २९ एप्रिल रोजी साखर संकुल पुणे येथे हजर राहून आपली बाजू न मांडल्यास साखर आयुक्त एकतर्फी निर्णय घेऊन या कारखान्याचा गाळप परवाना रद्द करून दंडात्मक कारवाई करणार असल्याचे या नोटिसीत म्हटले आहे. महाराष्ट्र साखर कारखाने आदेश १९८४ नुसार राज्यातील सर्व सहकारी व खासगी कारखान्यांना काही नियम व अटीनुसार गाळप परवाना देण्यात आलेला होता. यामध्ये अट क्र ११ नुसार व ऊस नियंत्रण आदेश १९६६ चे खंड ३ (अ) नुसार कारखान्याला ऊसपुरवठा झाल्यानंतर १४ दिवसांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर दराप्रमाणे ऊसदर देयक जमा करणे बंधनकारक आहे.हंगाम २०१५-१६ मध्ये राज्यातील जवळपास ३२ कारखान्यांनी आपल्या कारखान्याने गाळप केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे १४ दिवसांत हप्ता अदा केला नसल्याची बाब १५ एप्रिल २०१६ च्या सहसंचालक (साखर) यांच्या अहवालानुसार निदर्शनास आली आहे. कारखान्यांनी ऊस नियंत्रण आदेश १९६६ चे खंड ३ (अ) व गाळप परवाना अट क्र. ११ चा भंग केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र साखर कारखाने आदेश १९८४ चे खंड ४ व शासनाच्या १४ आॅक्टोबर २०१५ चे अधिसूचनेतील तरतुदीनुसार संबंधित कारखान्यांवर दंडात्मक कारवाई करणे प्रस्तावित आहे. (वार्ताहर)पुण्यात शुक्रवारी सुनावणी...कारखान्यावर कार्यवाही करण्यापूर्वी कारखान्यास बाजू मांडण्यासाठी दि. २९ एप्रिल २०१६ रोजी सकाळी अकरा वाजता पुणे साखर आयुक्त यांच्यासमोर सुनावणी ठेवण्यात आली आहे. यावेळी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी उपस्थित राहावे, अन्यथा एकतर्फी कारवाई करत आपल्या कारखान्याचा गाळप परवाना रद्द करून दंडात्मक कारवाई करण्यात येइल, अशा सूचना या नोटीसमध्ये बजावण्यात आल्या आहेत.