शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

तासगाव कारखान्याच्या अवसायकांना नोटीस!

By admin | Updated: November 5, 2014 00:48 IST

मंडळाकडून दुर्लक्ष : फंडाची रक्कम न भरल्याप्रकरणी कारवाई

सांगली : तासगाव साखर कारखान्याकडील १ एप्रिल २००४ ते जुलै २००५ या कालावधीतील ७५० कर्मचाऱ्यांची फंडाची सुमारे अडीच कोटीची रक्कम भविष्य निर्वाह निधी विभागाकडे भरलेली नाही. याप्रकरणी कोल्हापूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने तासगाव कारखान्याकडील अवसायक मंडळाला तीन नोटिसा बजावल्या आहेत. तरीही अवसायक मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही उत्तर मिळाले नसल्यामुळे अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवसायक मंडळाकडील अधिकारी अडचणीत सापडल्याची चर्चा आहे.तत्कालीन कारभाऱ्यांनी नेत्यांच्या इशाऱ्याने कारखान्यासाठी खरेदी केलेल्या यंत्रसामग्रीची किंमत दहापटीने दाखवली. मग कारखाना डबघाईला येण्यास वेळ लागला नाही. २००० मध्ये आर्थिक अडचणीमुळे शासनाने प्रशासक नियुक्त केला़ २००३-०४ मध्ये प्रशासक आणि कामगारांनी पुढाकार घेऊन गळीत हंगाम यशस्वी केला़ त्याबाबत कामगार सांगतात, ‘राज्य बँकेने वेळेवर कर्जपुरवठा केला नसतानाही १४ कोटींचे उत्पन्न मिळाले़ हजार-दोन हजाराच्या तुटपुंज्या पगारावर कामगार राबले़ उसाला अन्य कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला़ मात्र कुठे तरी माशी शिंकली आणि दुसऱ्या हंगामाला राज्य बँकेने अर्थसहाय्यच दिले नाही़ त्यामुळे २००४-०५ च्या हंगामात पुन्हा कारखान्याचे धुराडे बंद राहिले़’ या कालावधित कामगार नियमीत कारखान्यावर येत होते. या कामगारांना पगार मिळावा, अशी याचिका साखर कामगार संघटनेचे सदाशिव देवर्षी आणि हिंमत पाटील यांनी दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने कारखान्याकडे सध्या असलेल्या अवसायक मंडळाच्या अधिकाऱ्यांना कामगारांचा थकित पगार देण्याची सूचना केली होती. त्यानुसार निर्वाह भत्ता (रिटेन्शन अलाऊन्स) अवसायक मंडळाने दिला आहे. परंतु, कामगारांच्या फंडाची रक्कम अवसायक मंडळाने भविष्य निर्वाह निधी विभागाकडे भरली नाही. अवसायक मंडळाच्या या कारभाराविरोधात कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा सांगलीच्या औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करून फंडाची रक्कम भरण्याची मागणी केली होती. याचा निर्णयही कामगारांच्या बाजूने झाला आहे. त्यानुसार कोल्हापूर येथील भविष्य निर्वाह कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त पी. बी. खुने यांनी अवसायक मंडळाचे अध्यक्ष व्ही. वाय. सुर्वे यांना तीन नोटिसा बजावल्या आहेत. तरीही त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही, असे खुने यांनी सांगितले. सुर्वे यांना अंतिम नोटीस बजावून संबंधित कामगारांची फंडाची सर्व कागदपत्रे आणि थकित रक्कम भरण्याची सूचना दिली आहे. पैसे वाटपाचीही होणार चौकशीतासगाव साखर कारखान्याकडील कामगारांच्या पगाराची थकित रक्कम १३ कोटी ७८ लाख रूपये अवसायक मंडळाकडून वाटप केली आहे. कामगारांना पैसे वाटप करताना काही नेतेमंडळींनी कामगारांकडून सक्तीने ६ टक्के रक्कम कपात करून घेतली होती. पैसे मागतानाची चित्रफीत कामगारांनी एका नेत्याकडे दिली असून त्याच्याआधारे फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. तसेच अवसायक मंडळाच्या कारभाराची चौकशीही लावण्यासाठी कारखान्यातील एक गट सक्रिय झाला आहे, असे खात्रीशीर सूत्राने सांगितले.