शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

न्यायालयाच्या निकालाची काळजी वाटत नाही, मंत्री शंभुराज देसाईंचा विश्वास

By दीपक शिंदे | Updated: May 10, 2023 14:00 IST

अपात्रतेबाबत आम्हाला कोणत्याच प्रकारची भीती नाही

कऱ्हाड : आमची बाजू भक्कम आहे. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच कार्य केले असल्याने अपात्रतेबाबत आम्हाला कोणत्याच प्रकारची भीती नाही. तसेच नियमाने शिवसेना व धनुष्यबाणाची मान्यता आमच्याकडेच आहे; त्यामुळे शिवसेना आमचीच असल्याचे मत राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले.येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या हजारो फाइल पेंडिंग असूनही शिंदे सरकार त्याबाबत निर्णय घेत नाही. या प्रश्नावर बोलताना त्यांनी आमच्या सरकारचा वेग चांगलाच असल्याचे म्हटले.देसाई म्हणाले, राज्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सिंचनावर तब्बल ७० हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, त्या निधीचा किती उपयोग झाला, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः करत याबाबतची श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली होती. असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या खासगी कार्यक्रमासाठी गावी आले असतानाही त्यांनी ६२ फाइल निकाली काढल्या. त्यामुळे आमच्या कामाचा वेग चांगलाच असून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत, सरकारी तिजोरीचा विचार करून निर्णय घेतले जात आहेत.कर्नाटक निवडणुकीत शिवसेना जागा का लढवत नाही? यावर बोलताना ते म्हणाले, शिवसेनेचे महाराष्ट्रात प्राबल्य असून, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात शिवसेनेच्या शंभर जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तसेच जागावाटपाच्या प्रश्नावर ते म्हणाले, राज्यात जागावाटप कसे असेल; याबाबतचा निर्णय शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे घेतील.

माजी उपमुख्यमंत्र्यांनाच कर्नाटकात मागणी नसेलतसेच कर्नाटकमधील निवडणुकीदरम्यान अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत छेडले असता ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी मंत्री म्हणून या आधी दहा वर्षे काम केले असून त्यांना मोठा अनुभव आहे. शिवसेना हा भाजपसोबतच्या युतीतला मित्रपक्ष असून कर्नाटकमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते; परंतु, माजी उपमुख्यमंत्र्यांनाच कर्नाटकात मागणी नसेल. त्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले असावे, अशी खोचक टीका त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली.

शासन आपल्या दारी उपक्रम मरळीमधून सुरूराज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. त्याचा प्रारंभ शनिवार, दि. १३ मे रोजी सकाळी १० वाजता मरळी येथे होणार आहे. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री उपस्थित राहणार असून, या ठिकाणी २५ हजारांवर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष योजनांचा लाभ होणार असल्याची माहिती पालकमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाईCourtन्यायालय