शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या निकालाची काळजी वाटत नाही, मंत्री शंभुराज देसाईंचा विश्वास

By दीपक शिंदे | Updated: May 10, 2023 14:00 IST

अपात्रतेबाबत आम्हाला कोणत्याच प्रकारची भीती नाही

कऱ्हाड : आमची बाजू भक्कम आहे. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच कार्य केले असल्याने अपात्रतेबाबत आम्हाला कोणत्याच प्रकारची भीती नाही. तसेच नियमाने शिवसेना व धनुष्यबाणाची मान्यता आमच्याकडेच आहे; त्यामुळे शिवसेना आमचीच असल्याचे मत राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले.येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या हजारो फाइल पेंडिंग असूनही शिंदे सरकार त्याबाबत निर्णय घेत नाही. या प्रश्नावर बोलताना त्यांनी आमच्या सरकारचा वेग चांगलाच असल्याचे म्हटले.देसाई म्हणाले, राज्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सिंचनावर तब्बल ७० हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, त्या निधीचा किती उपयोग झाला, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः करत याबाबतची श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली होती. असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या खासगी कार्यक्रमासाठी गावी आले असतानाही त्यांनी ६२ फाइल निकाली काढल्या. त्यामुळे आमच्या कामाचा वेग चांगलाच असून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत, सरकारी तिजोरीचा विचार करून निर्णय घेतले जात आहेत.कर्नाटक निवडणुकीत शिवसेना जागा का लढवत नाही? यावर बोलताना ते म्हणाले, शिवसेनेचे महाराष्ट्रात प्राबल्य असून, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात शिवसेनेच्या शंभर जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तसेच जागावाटपाच्या प्रश्नावर ते म्हणाले, राज्यात जागावाटप कसे असेल; याबाबतचा निर्णय शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे घेतील.

माजी उपमुख्यमंत्र्यांनाच कर्नाटकात मागणी नसेलतसेच कर्नाटकमधील निवडणुकीदरम्यान अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत छेडले असता ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी मंत्री म्हणून या आधी दहा वर्षे काम केले असून त्यांना मोठा अनुभव आहे. शिवसेना हा भाजपसोबतच्या युतीतला मित्रपक्ष असून कर्नाटकमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते; परंतु, माजी उपमुख्यमंत्र्यांनाच कर्नाटकात मागणी नसेल. त्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले असावे, अशी खोचक टीका त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली.

शासन आपल्या दारी उपक्रम मरळीमधून सुरूराज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. त्याचा प्रारंभ शनिवार, दि. १३ मे रोजी सकाळी १० वाजता मरळी येथे होणार आहे. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री उपस्थित राहणार असून, या ठिकाणी २५ हजारांवर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष योजनांचा लाभ होणार असल्याची माहिती पालकमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाईCourtन्यायालय