शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
3
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
4
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
5
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
6
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
7
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
8
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
9
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
10
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
11
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
12
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
13
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
14
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
15
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
16
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
17
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
18
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
19
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
20
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला

न्यायालयाच्या निकालाची काळजी वाटत नाही, मंत्री शंभुराज देसाईंचा विश्वास

By दीपक शिंदे | Updated: May 10, 2023 14:00 IST

अपात्रतेबाबत आम्हाला कोणत्याच प्रकारची भीती नाही

कऱ्हाड : आमची बाजू भक्कम आहे. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच कार्य केले असल्याने अपात्रतेबाबत आम्हाला कोणत्याच प्रकारची भीती नाही. तसेच नियमाने शिवसेना व धनुष्यबाणाची मान्यता आमच्याकडेच आहे; त्यामुळे शिवसेना आमचीच असल्याचे मत राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले.येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या हजारो फाइल पेंडिंग असूनही शिंदे सरकार त्याबाबत निर्णय घेत नाही. या प्रश्नावर बोलताना त्यांनी आमच्या सरकारचा वेग चांगलाच असल्याचे म्हटले.देसाई म्हणाले, राज्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सिंचनावर तब्बल ७० हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, त्या निधीचा किती उपयोग झाला, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः करत याबाबतची श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली होती. असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या खासगी कार्यक्रमासाठी गावी आले असतानाही त्यांनी ६२ फाइल निकाली काढल्या. त्यामुळे आमच्या कामाचा वेग चांगलाच असून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत, सरकारी तिजोरीचा विचार करून निर्णय घेतले जात आहेत.कर्नाटक निवडणुकीत शिवसेना जागा का लढवत नाही? यावर बोलताना ते म्हणाले, शिवसेनेचे महाराष्ट्रात प्राबल्य असून, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात शिवसेनेच्या शंभर जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तसेच जागावाटपाच्या प्रश्नावर ते म्हणाले, राज्यात जागावाटप कसे असेल; याबाबतचा निर्णय शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे घेतील.

माजी उपमुख्यमंत्र्यांनाच कर्नाटकात मागणी नसेलतसेच कर्नाटकमधील निवडणुकीदरम्यान अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत छेडले असता ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी मंत्री म्हणून या आधी दहा वर्षे काम केले असून त्यांना मोठा अनुभव आहे. शिवसेना हा भाजपसोबतच्या युतीतला मित्रपक्ष असून कर्नाटकमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते; परंतु, माजी उपमुख्यमंत्र्यांनाच कर्नाटकात मागणी नसेल. त्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले असावे, अशी खोचक टीका त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली.

शासन आपल्या दारी उपक्रम मरळीमधून सुरूराज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. त्याचा प्रारंभ शनिवार, दि. १३ मे रोजी सकाळी १० वाजता मरळी येथे होणार आहे. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री उपस्थित राहणार असून, या ठिकाणी २५ हजारांवर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष योजनांचा लाभ होणार असल्याची माहिती पालकमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाईCourtन्यायालय