शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

या प्रवृत्ती साताऱ्यात नकोत!

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

वेळीच आवर घाला : खंडणीबहाद्दरांच्या वाढत्या उच्छादाविरुद्ध बांधकाम व्यावसायिक एकत्र-बांधकाम क्षेत्राची

सातारा : मंदीसह विविध कारणांनी आधीच अडचणीत आलेल्या बांधकाम व्यवसायावर खंडणीखोरीचे संकट नव्यानेच भिरभिरू लागले आहे. सध्या शहराच्या विशिष्ट भागांमध्येच असलेले हे लोण शहरात पसरायला वेळ लागणार नाही, अशी रास्त भीती या क्षेत्रातील व्यावसायिकांना सतावते आहे. त्यामुळे वेळीच याबाबत विविध समाजघटकांना एकत्र आणण्यासाठी शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी कंबर कसली आहे.शहराच्या हद्दवाढीपासून अनेक समस्या बांधकाम व्यावसायिकांचा रस्ता रोखून उभ्या आहेत. नगरपालिका हद्दीत नव्याने जमिनी उपलब्ध नसल्याने शहराच्या परिघावर आणि उपनगरांतच सर्वाधिक बांधकामे सध्या सुरू आहेत. प्रामुख्याने पूर्वेकडील उपनगरांमधून खंडणीखोरीचा उपद्रव सुरू झाला आहे. या प्रवृत्तींना वेळीच आवर घातला नाही, तर साथीच्या आजाराप्रमाणे हे लोण शहरभर पसरण्यास वेळ लागणार नाही, असे बांधकाम व्यावसायिकांना वाटते. ‘लोकमत’ने याविषयी घेतलेल्या परखड भूमिकेबद्दल बांधकाम व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. या विषयावर मंथन करण्यासाठी ‘क्रिडाई’ आणि ‘बिल्डर्स असोसिएशन’ अशा व्यासपीठांवरून व्यावसायिक एकत्र आले. खंडणीखोर केवळ बांधकाम व्यावसायिकांचीच नव्हे तर अनेकांची डोकेदुखी ठरत असल्याने हॉटेल व्यावसायिक, डॉक्टर्स आणि अन्य क्षेत्रांतील बाधितांना संघटित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. खंडणीसाठी धमकावण्याच्या सुमारे पंधरा ते वीस घटना साताऱ्यात आजवर घडल्या असल्या, तरी भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास केवळ तीन ते चार जणच पुढे आले, अशी माहिती व्यावसायिक देतात. याच कारणावरून विजय शिंदे या व्यावसायिकाला मारहाण करण्यात आली होती. सैदापूरला पोलीस अधिकाऱ्याच्याच कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना तर अगदी ताजी आहे. मात्र, सुरुवातीला पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. सातत्याने घडत असलेल्या या घडामोडी साताऱ्यासारख्या शांतताप्रिय शहराला नवीनच आहेत; मात्र खंडणीखोरांचे मनसुबे यशस्वी होऊ लागले, तर हे लोण शहरात इतरत्र पसरायला वेळ लागणार नाही, अशी बिल्डरांना धास्ती वाटते. मंदीच्या काळात बांधकाम व्यावसायिकांची प्राप्ती बऱ्याच प्रमाणात घटली आहे. रेडी रेकनरइतका दरही बांधकामाला मिळत नाही. सरकारी कार्यालयांमध्ये चिरीमिरीसाठी खर्च करावा लागत असून, हद्दवाढीचा निर्णय खोळंबल्याने जमिनी बिगरशेती करून घेतानाही मोठा खर्च येतो. अशा वेळी खंडणीचे संकट उभे राहिले, तर व्यवसायच अडचणीत येईल; किंबहुना तो तोट्यात जाऊन स्थलांतर करावे लागेल, अशी मानसिकता तयार झाली आहे. त्यामुळेच खंडणीच्या संकटाचा मुकाबला ज्यांना-ज्यांना करावा लागतो आहे, अशा सर्व घटकांना आवाहन करून ताकद उभी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. (प्रतिनिधी)आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनखंडणीसाठी धमक्या, मारहाण, तोडफोड अशा घटना वाढत असल्याने या प्रवृत्ती वेळीच रोखाव्यात, असे निवेदन बांधकाम व्यावसायिक सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत. याच वेळी याप्रश्नी पुढे काय पावले उचलायची, याविषयी दिशा ठरविण्यात येणार आहे. तसेच, या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन विविध समाजघटकांना करण्यात येणार आहे. .साताऱ्यातील बांधकाम व्यावसायिकांना खंडणीखोरांचा वाढता उपद्रव सहन करावा लागत आहे, ही बाब नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, याप्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. - रवींद्र पवार, बांधकाम व्यावसायिकव्यावसायिकांचे खंडणीखोरांपासून संरक्षण करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. साताऱ्यात ही प्रवृत्ती नव्यानेच दिसू लागली आहे. आधीच अनेक अडचणींनी त्रासलेल्या व्यावसायिकांना आता खंडणीच्या प्रश्नालाही तोंड द्यावे लागणार असेल, तर आम्हाला रस्त्यावर उतरावेच लागेल. - सलीम कच्छी, बांधकाम व्यावसायिक