शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी कसलीही हयगय नको , प्रशासनाला सूचना: चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 21:27 IST

‘संभाव्य काळात पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक उपाययोजना प्राधान्यक्रमाने कराव्यात. पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यामध्ये कसलीही हायगय होणार नाही, याची काळजी घ्यावी,’

ठळक मुद्देमाण तालुक्यातील गावांना भेटी; पिकांची केली पाहणीपाण्याचे नवनवे स्त्रोत शोधून काढून त्याच्या बळकटीकरणावर भर दिला जाईल.

दहिवडी : ‘संभाव्य काळात पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक उपाययोजना प्राधान्यक्रमाने कराव्यात. पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यामध्ये कसलीही हायगय होणार नाही, याची काळजी घ्यावी,’ अशा सूचना देत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

माण मालुक्यातील वडगाव, बिजवडी, अनभुलेवाडी, थदाळे या चार गावांना शनिवारी महसूलमंत्र्यांनी शनिवारी भेट देऊन पिकाची पाहणी केली आणि शेतकºयांबरोबर पीक, पाण्याबद्दल चर्चा केली. यावेळी आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अनिल देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार बी. एस. माने, संबंधित विभागाचे जिल्हास्तरावरील आणि तालुकास्तरावरील अधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्र्यांनी वडगाव येथील शेतकरी दादासाहेब ओंबासे यांच्या शेतात जाऊन पिकाची पाहणी केली तर बिजवडी येथील शेतकरी हनुमंत भोसले यांच्या डाळिंबाच्या शेताची पाहणी केली. अनभुलेवाडी येथील चंद्र्रकांत कदम यांच्या ज्वारीच्या पिकाची पाहणी केली तर थदाळे येथील कृष्णा खंदारे यांच्या मक्याच्या शेतीची पाहणी केली. यावेळी शासन शेतकºयांच्या पाठीशी असून, दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या सर्व शेतकºयांना सर्व प्रकाराची मदत मिळेल, अशी ग्वाही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिली.

ते म्हणाले, ‘पिकांच्या उत्पादनातील घटीची शासनस्तरावर निश्चित दखल घेतली जाईल. त्यानुसार आवश्यक उपाययोजना केल्या जातील. मात्र मार्चनंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता गृहित धरून पाणी पुरवठा योजनांची गावनिहाय वस्तुस्थिती जाणून घेऊन पाण्याचे नवनवे स्त्रोत शोधून काढून त्याच्या बळकटीकरणावर भर दिला जाईल.’

गावातील पाणीपुरवठा योजनांचा दर महिन्याला यंत्रणांनी आढावा घ्यावा. पिण्याच्या पाणीपुरवठ्याची तात्पुरत्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याबरोबरच दीर्घकालीन उपाययोजनांचेही नियोजन करा, अशी सूचनाही त्यांनी केली. टंचाईग्रस्त गावातील पिकांची महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाºयांनी शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून सर्व्हे करावा, अशी सूचना त्यांनी केली.टंचाईचा अहवाल तयार करणारपावसाअभावी टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या गावात आवश्यक उपाययोजना करण्यास शासनाने प्राधान्य दिले असून, या दुष्काळाच्या झळा बसलेल्या तालुक्यातील प्रत्येकी पाच गावांमध्ये मंत्रिमंडळातील सदस्यामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून शासनास वस्तुनिष्ठ अहवाल देण्यात येणार आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील चार गावांना आज भेट देऊन तेथील टंचाई परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. चारही गावांत पावसाने दडी मारल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. या सर्व परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासकीय यंत्रणामार्फत घेतला जाईल, असेही मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.पाण्याचे स्त्रोत बळकट करणारगावकºयांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी पाणीपुरवठा योजनांचे अधिकार जिल्हाधिकाºयांना दिले आहेत.संभाव्य काळात पाण्याचा तुटवडा पडणार नाही, याची यंत्रणांनी काळजी घ्यावी.पाणी पुरवठा योजनांचा सूक्ष्म आराखडा तयार करून त्यानुसार अंमलबजावणी करावी.दरमहा पाणीपुरवठा योजनांचा तसेच पिण्याच्या पाणीपुरवठ्याचा आढावा घ्यावा.पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.

 

टॅग्स :water transportजलवाहतूकchandrakant patilचंद्रकांत पाटील