शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

नाही करत मनुवादाचं गुणगाण; वाढविणार आंबेडकरांची शान --रामदास आठवले;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 22:14 IST

कºहाड : ‘पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमध्ये असलो तरी मी मनुवादींचा समर्थन करत नाही.

ठळक मुद्देआरक्षणास धक्का लावला तर सरकार पाडू

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमध्ये असलो तरी मी मनुवादींचा समर्थन करत नाही. मी अजिबात करीत नाही मनुवादींचं गुणगान, मला वाढवायची आहे आंबेडकर, अण्णाभाऊंची शान.. ज्या दिवशी दलितांच्या आरक्षणाला धक्का लावला जाईल, त्या दिवशी आम्ही हे सरकार खाली खेचू,’ अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये दलित महासंघाच्या वतीने आयोजित मैत्री परिषदेत ते बोलत होते. यावेळी दलित महासंघाचे संस्थापक प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, ज्येष्ठ नेते किशोर तपासे, पुष्पलता सकटे, विजय यादव, ‘एमआयएम’चे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार, नगरसेविका माया भोसले, अमर गायकवाड, सादिकभाई शेख, रामभाऊ दाभाडे, भीमराव सावदकर, शरद गायकवाड उपस्थित होते.

आठवले म्हणाले, ‘भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे. त्याला भाजपने बदलण्याची भूमिका मांडल्यास आम्ही सत्तेत राहणार नाही, त्यातून बाहेर पडू.’ रा. डॉ. सकटे म्हणाले, ‘दलित महासंघाची ५ जुलै १९९२ मध्ये कोल्हापुरातील बिंदू चौकात स्थापना झाली. या संघाच्या माध्यमातून काम करताना खूप अनुभव आले. आज खºया अर्थाने चळवळ करायची असेल तर बाबासाहेबांच्या सुटाकडे, बुटाकडे न बघता त्यांच्या बोटाकडे बघून चळवळ करावी लागेल.’प्रकाश वायदंडे यांनी प्रास्ताविक केले. जावेद नायकवडी यांनी आभार मानले. कार्यक्रमास दलित महासंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आठवलेंच्या हाती दिली सकटेंनी कुºहाडआजच्या या मैत्री परिषदेत मंत्री रामदास आठवले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत तर करण्यात आलेच. परंतु दलित महासंघाचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी त्यांना कुºहाड भेट दिली. याची उपस्थितांमध्ये चर्चा होती.पंतप्रधानांचा नकोय ‘सूट’.. हवाय बाबासाहेबांचा ‘बूट’‘आम्हाला नकोय पंतप्रधान मोदी यांचा पंधरा लाखांचा सूट, हवाय डॉ. बाबासाहेबांचा बूट, हे प्रस्थापित करतायेत फाटाफूट, त्यासाठी हवी आहे आपल्यात एकजूट, उघडण्या मनोवाद्यांची मूठ, मैत्रीची हवी आहे एकत्र वज्रमूठ’ अशी कविता प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी मैत्री परिषदेत सादर केली. त्याला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.बहुजन शिक्षक परिवाराचे निवेदनदुर्गम भागांत काम करणाºया शिक्षकांना विशेष भत्ता करावा, प्रशासकीय टक्केवारीनुसार शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात, ४५ वयापुढील शिक्षकांना दुर्गम भागात पाठवू नये, दुर्गम भागात शाळांची संख्या वाढवावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन बहुजन शिक्षक परिवाराच्या वतीने प्रवीण लादे यांनी मंत्री आठवले यांना यावेळी दिले.