शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

नाही करत मनुवादाचं गुणगाण; वाढविणार आंबेडकरांची शान --रामदास आठवले;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 22:14 IST

कºहाड : ‘पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमध्ये असलो तरी मी मनुवादींचा समर्थन करत नाही.

ठळक मुद्देआरक्षणास धक्का लावला तर सरकार पाडू

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमध्ये असलो तरी मी मनुवादींचा समर्थन करत नाही. मी अजिबात करीत नाही मनुवादींचं गुणगान, मला वाढवायची आहे आंबेडकर, अण्णाभाऊंची शान.. ज्या दिवशी दलितांच्या आरक्षणाला धक्का लावला जाईल, त्या दिवशी आम्ही हे सरकार खाली खेचू,’ अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये दलित महासंघाच्या वतीने आयोजित मैत्री परिषदेत ते बोलत होते. यावेळी दलित महासंघाचे संस्थापक प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, ज्येष्ठ नेते किशोर तपासे, पुष्पलता सकटे, विजय यादव, ‘एमआयएम’चे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार, नगरसेविका माया भोसले, अमर गायकवाड, सादिकभाई शेख, रामभाऊ दाभाडे, भीमराव सावदकर, शरद गायकवाड उपस्थित होते.

आठवले म्हणाले, ‘भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे. त्याला भाजपने बदलण्याची भूमिका मांडल्यास आम्ही सत्तेत राहणार नाही, त्यातून बाहेर पडू.’ रा. डॉ. सकटे म्हणाले, ‘दलित महासंघाची ५ जुलै १९९२ मध्ये कोल्हापुरातील बिंदू चौकात स्थापना झाली. या संघाच्या माध्यमातून काम करताना खूप अनुभव आले. आज खºया अर्थाने चळवळ करायची असेल तर बाबासाहेबांच्या सुटाकडे, बुटाकडे न बघता त्यांच्या बोटाकडे बघून चळवळ करावी लागेल.’प्रकाश वायदंडे यांनी प्रास्ताविक केले. जावेद नायकवडी यांनी आभार मानले. कार्यक्रमास दलित महासंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आठवलेंच्या हाती दिली सकटेंनी कुºहाडआजच्या या मैत्री परिषदेत मंत्री रामदास आठवले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत तर करण्यात आलेच. परंतु दलित महासंघाचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी त्यांना कुºहाड भेट दिली. याची उपस्थितांमध्ये चर्चा होती.पंतप्रधानांचा नकोय ‘सूट’.. हवाय बाबासाहेबांचा ‘बूट’‘आम्हाला नकोय पंतप्रधान मोदी यांचा पंधरा लाखांचा सूट, हवाय डॉ. बाबासाहेबांचा बूट, हे प्रस्थापित करतायेत फाटाफूट, त्यासाठी हवी आहे आपल्यात एकजूट, उघडण्या मनोवाद्यांची मूठ, मैत्रीची हवी आहे एकत्र वज्रमूठ’ अशी कविता प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी मैत्री परिषदेत सादर केली. त्याला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.बहुजन शिक्षक परिवाराचे निवेदनदुर्गम भागांत काम करणाºया शिक्षकांना विशेष भत्ता करावा, प्रशासकीय टक्केवारीनुसार शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात, ४५ वयापुढील शिक्षकांना दुर्गम भागात पाठवू नये, दुर्गम भागात शाळांची संख्या वाढवावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन बहुजन शिक्षक परिवाराच्या वतीने प्रवीण लादे यांनी मंत्री आठवले यांना यावेळी दिले.