शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

पडक्षेत्रात जनावरे चारण्यास मनाई !

By admin | Updated: September 8, 2015 22:04 IST

कोळेवाडीतील प्रश्न : चाऱ्याअभावी जनावरांचे हाल; शेतकरी हतबल

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळेवाडी-शिंदेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील खाजगी मात्र पूर्वीपासून पाळीव जनावरांसाठी खुल्या असलेल्या डोंगरातील पड क्षेत्रात काही लोकांनी कुळ कायद्याने मालकी हक्क दाखवून पाळीव जनावरांसाठी या क्षेत्रात बंदी घातली आहे. परिणामी मेंढपाळांसह शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने चाऱ्याअभावी जनावरे विकण्याची वेळ आली आहे. कोळेवाडीसह शिंदेवाडी येथे शेतकरऱ्यांसह मेंढपाळांचाही मोठा समावेश आहे. येथील कोरडवाहू शेतजमिनींचे क्षेत्र जास्त आहे. डोंगर पायथ्यालगत वसलेल्या या गावातील पाळीव जनावरेही पूर्वीपासूनच डोंगरातील पड क्षेत्रात चरण्यासाठी सोडली जातात. या क्षेत्रावर शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैशी अवलंबून आहेत. येथील शेतकऱ्यांसह मेढपाळांचा उदरनिर्वाह या जनावरांच्या दुग्ध व्यवसायावर पूर्णत: अवलंबून आहे. पावसाने ओढ दिल्याने चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एक आस्मानी संकट उभे राहिले असताना आता दुसरे सुलतानी संकट उभे राहिले आहे. पूर्वीपासून खुल्या असलेल्या या पड क्षेत्रात काही लोकांनी कुळ कायद्याने आपली नावे लावून मालकी हक्क दाखवत या क्षेत्रात पाळीव जनावरांना बंदी घातली आहे. यातील एका मालकाने जनावरांपाठीमागे पैसे आकारून जनावरे हिंडविण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र दुसऱ्या मालकांकडून विरोध केला जात असल्याने शेतकरी पूरता संकटात सापडला आहे. याचा सर्वात मोठा फटका मेंढपाळांना बसला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने शिवारात पिके असल्याने शेळ्या-मेंढ्या सोडता येत नाहीत. झाडांचा पाला उपलब्ध होत नाही. चारा समस्या निर्माण झाल्याने शेळ्या-मेंढ्यांसह गायी-म्हैशी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यातील एक मालक या पडक्षेत्रात जनावरे चारण्यासाठी ४० ते ५० शेळ्या-मेंढ्यांच्या खंडास एक हजार रूपये तर गाय, म्हैशींसाठी प्रत्येकी १०० रूपये आकारत आहे. (वार्ताहर)पडक्षेत्र खुले होणार का ?डोंगरातील पड क्षेत्र ज्या मुळ मालकाच्या नावे आहे. त्याच मालकांची अन्य चालू जमीन शिंदेवाडी येथील काही शेतकरी कुळ कायद्याने कसत आहेत. त्यापैकी काही जमीन शेतकऱ्यांनी कुळ कायद्याने आपल्या नावे केली आहे. तर काही जमिन अजून मुळ मालकाच्याच नावे असल्याने पडक्षेत्राबाबत आवाज उठविण्यासाठी शेतकरी पुढे येत नाहीत. मूळ मालक पुण्यातकोळेवाडी शिंदेवाडी गावांना लागून असलेले २२५ एकर पडक्षेत्र नावे असलेले मूळ मालक पुणे येथे वास्तव्यास आहेत. मात्र काही स्थानिक लोकांनी कुळ कायद्याचा आधार घेवून हे क्षेत्र स्वत:च्या नावावर करून आपला मालकी हक्क दाखविला आहे. परिणामी मूळ मालकाऐवजी काही कुळ मालकांनी संपूर्ण गावातील जनावरांना या क्षेत्रात चरावयास बंदी घातली आहे. दहा महिन्यांचा चारापूर्वीपासून या पडक्षेत्रात जनावरे सोडली जातात. उपलब्ध चाऱ्यामुळे किमान ८ ते १० महिने जनावरांची भूक भागविली जाते. त्यामुळे कापीव गवत या क्षेत्रामध्ये येत नाही; तर उरलेले गवत काही समाजकंटकांकडून प्रतिवर्षी जाळले जात असल्यामुळे यापासून मूळ मालकांना कसलाच फायदा होत नाही. तरीही जनावरांना बंदी केली आहे.