शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सातारा पोलिसांची नॉनस्टॉप ड्युटी १०० तास,जिल्ह्याची शांतता अबाधित : धार्मिक यात्रा, नववर्ष आणि कडकडीत बंद यशस्वी हाताळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:17 IST

सातारा : सातारा जिल्ह्यात पाल, औंध, मांढरदेवी यात्रा आणि ३१ डिसेंबरला नववर्षांचे स्वागत आदी उत्सवांचे कार्यक्रम सुरू होते. त्यातच पुणे जिल्ह्यात कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेमुळे

सातारा : सातारा जिल्ह्यात पाल, औंध, मांढरदेवी यात्रा आणि ३१ डिसेंबरला नववर्षांचे स्वागत आदी उत्सवांचे कार्यक्रम सुरू होते. त्यातच पुणे जिल्ह्यात कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेमुळे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यात संपूर्ण राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत होत्या. मात्र, सातारा जिल्हा पोलिसांनी सलग १०० तास ड्युटी बजावून कडक पहारा देत जिल्ह्यात अपवादात्मक घटना सोडता बंद शांततेत हाताळला गेला.

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस महाबळेश्वर, पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असतात. त्यात गेल्या आठवड्यापासून पालचा खंडोबा, मांढरगडावरील काळूबाई, औंधची यमाईदेवी येथील यात्रा सुरू असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील पोलिसांवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताचा ताण असतो. त्यामुळे जिल्ह्यातील १५० पोलिस अधिकारी, २५०० कर्मचाºयांच्या साप्ताहिक सुटी व रजा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यात ३१ डिसेंबर रोजी कोणत्याही अनुचित प्रकार घडून नये, यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.

महाबळेश्वर व पाचगणीमध्ये वाहतूक कोंडी आणि पर्यटकांना मोकळे वातावरण निर्माण करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे असते. त्याचबरोबर यात्रा काळात लाखो भाविकांची गर्दी होत असताना पोलिसांवर वाहतूक व गर्दीचे नियंत्रण करण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी कोरेगाव-भीमा येथे हिंसाचाराची घटना घडली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जाळपोळ, दगडफेक आदी घटना घडण्यास सुरुवात झाली. राज्यात घडणाºया घटनेचे जिल्ह्यात लगेच पडसाद उमटू लागले. फलटण आणि कºहाड येथे काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. सातारा पोलिसांनी सतर्कता दाखवून तत्काळ घटनास्थळी कारवाई करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्याच दिवशी प्रत्येक पोलिस ठाणेनिहाय विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि जाती-धर्माच्या लोकांची शांतता बैठक घेतली. त्यांना अफवांवर विश्वास ठेवू नका, शांततेत बंद पाळा, असे आवाहन केले.

दुसºया दिवशी सकाळपासून सर्वत्र बंद पुकारल्याने कोणत्याही हिंसाचाराच्या घटना होऊ नयेत, जी काही दुकाने उघडी होती त्यांना बंद करण्याचे आवाहन केले. तसेच संशयित कार्यकर्त्यांच्या हलचालींवर लक्ष ठेवून प्रत्येक चौकात आणि संवेदनशील ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

काही ठिकाणी दगडफेक व हिंसक कारवाई होत असल्याचे निदर्शनास येतच पोलिसांनी तत्काळ संशयितांना ताब्यात घेऊन जमाव पांगवला. दरम्यान, त्यांना सोडवण्यासाठी जमावाने पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्या संशयितांना समज देऊन सोडले.