शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
4
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
5
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
6
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
7
Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती
8
भविष्यातील भारतात अदानी ग्रुपचं काय योगदान असेल?; प्रणव अदानींनी सांगितला संपूर्ण 'प्लॅन'
9
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
10
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
11
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
12
मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना आता हक्काचे घर; ‘मदत माश’ जमिनीवरील घरे नियमित होणार
13
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
14
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
15
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
16
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
17
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
18
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
19
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
20
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सातारा पोलिसांची नॉनस्टॉप ड्युटी १०० तास,जिल्ह्याची शांतता अबाधित : धार्मिक यात्रा, नववर्ष आणि कडकडीत बंद यशस्वी हाताळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:17 IST

सातारा : सातारा जिल्ह्यात पाल, औंध, मांढरदेवी यात्रा आणि ३१ डिसेंबरला नववर्षांचे स्वागत आदी उत्सवांचे कार्यक्रम सुरू होते. त्यातच पुणे जिल्ह्यात कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेमुळे

सातारा : सातारा जिल्ह्यात पाल, औंध, मांढरदेवी यात्रा आणि ३१ डिसेंबरला नववर्षांचे स्वागत आदी उत्सवांचे कार्यक्रम सुरू होते. त्यातच पुणे जिल्ह्यात कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेमुळे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यात संपूर्ण राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत होत्या. मात्र, सातारा जिल्हा पोलिसांनी सलग १०० तास ड्युटी बजावून कडक पहारा देत जिल्ह्यात अपवादात्मक घटना सोडता बंद शांततेत हाताळला गेला.

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस महाबळेश्वर, पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असतात. त्यात गेल्या आठवड्यापासून पालचा खंडोबा, मांढरगडावरील काळूबाई, औंधची यमाईदेवी येथील यात्रा सुरू असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील पोलिसांवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताचा ताण असतो. त्यामुळे जिल्ह्यातील १५० पोलिस अधिकारी, २५०० कर्मचाºयांच्या साप्ताहिक सुटी व रजा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यात ३१ डिसेंबर रोजी कोणत्याही अनुचित प्रकार घडून नये, यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.

महाबळेश्वर व पाचगणीमध्ये वाहतूक कोंडी आणि पर्यटकांना मोकळे वातावरण निर्माण करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे असते. त्याचबरोबर यात्रा काळात लाखो भाविकांची गर्दी होत असताना पोलिसांवर वाहतूक व गर्दीचे नियंत्रण करण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी कोरेगाव-भीमा येथे हिंसाचाराची घटना घडली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जाळपोळ, दगडफेक आदी घटना घडण्यास सुरुवात झाली. राज्यात घडणाºया घटनेचे जिल्ह्यात लगेच पडसाद उमटू लागले. फलटण आणि कºहाड येथे काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. सातारा पोलिसांनी सतर्कता दाखवून तत्काळ घटनास्थळी कारवाई करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्याच दिवशी प्रत्येक पोलिस ठाणेनिहाय विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि जाती-धर्माच्या लोकांची शांतता बैठक घेतली. त्यांना अफवांवर विश्वास ठेवू नका, शांततेत बंद पाळा, असे आवाहन केले.

दुसºया दिवशी सकाळपासून सर्वत्र बंद पुकारल्याने कोणत्याही हिंसाचाराच्या घटना होऊ नयेत, जी काही दुकाने उघडी होती त्यांना बंद करण्याचे आवाहन केले. तसेच संशयित कार्यकर्त्यांच्या हलचालींवर लक्ष ठेवून प्रत्येक चौकात आणि संवेदनशील ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

काही ठिकाणी दगडफेक व हिंसक कारवाई होत असल्याचे निदर्शनास येतच पोलिसांनी तत्काळ संशयितांना ताब्यात घेऊन जमाव पांगवला. दरम्यान, त्यांना सोडवण्यासाठी जमावाने पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्या संशयितांना समज देऊन सोडले.