शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
6
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
7
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
8
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
9
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
10
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
11
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
12
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
13
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
14
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
15
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
16
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
17
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
18
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
20
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

पाटाचं पाणी नाही आलं; पोटपाणी मात्र अवघड केलं !

By admin | Updated: June 1, 2015 00:51 IST

महू-हातगेघर कालवा : रखडलेल्या कामामुळे शेतकऱ्यांच्या काळजात ‘कालवाकालव’

नीलेश भोसले - सायगाव  जावळी तालुक्यातील सायगाव पश्चिम विभाग हा पूर्वीपासून कोरडवाहू म्हणून ओळखला जातो. येथील पाणीप्रश्न हा प्रत्येक निवडणुकीत कळीचा मुद्दा बनला आहे. अनेक पंचवार्षिक निवडणुका आल्या आणि गेल्या. ना पाट झाला ना पाणी आलं. पोटपाणी मात्र अवघड झालं, अशी स्थिती येथील ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांची झाली असल्याचे दिसून येत आहे. निसर्ग कधीच पक्षपात करीत नाही. निसर्ग कधीच अनुशेष ठेवत नाही. निधी अडकला म्हणून पाऊस वर्षानुवर्षे रखडत नाही. बीलं अडकली म्हणून पाऊस पडायचा थांबत नाही. पण, येथील पाणीप्रश्न वर्षानुवर्षे तसाच आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात वळिवाचा पाऊस पडला. या पावसाने काही ठिकाणी नुकसानही केले. तसेच जावळी तालुक्यातील सायगाव विभागालाही या वळिवाच्या पावसाने झोडपून काढले. पाऊस, एवढा मोठा होता की रखडलेले कालवे चक्क पाण्याने वाहू लागले होते. निसर्गाच्या औदार्याचीच प्रचिती यानिमित्ताने येथील जनतेला व शेतकऱ्यांना अनुभवायास मिळाली. जावळी तालुक्यातील सायगाव पश्चिम विभाग हा पूर्वीपासून कोरडवाहू म्हणून ओळखला जातो. येथील पाणीप्रश्न हा प्रत्येक निवडणुकीत कळीचा मुद्दा बनला आहे. प्रत्येक निवडणुकीत पाणीप्रश्न समोर आला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पाणीप्रश्नावर आश्वासनेही देण्यात आली होती. पण, येथे ना पाट झाला ना पाणी आलं. अशी स्थिती येथील झाली आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता या सायगाव विभागावर राहिली आहे. दोन वर्षांपूर्वी महू-हातगेघर धरणांतर्गत कालव्याची खोदकामे करण्यात आली. दोन वर्षे पूर्ण होऊनही ना पाट पूर्ण झाले ना पाणी आले.येथील संपादित झालेली जमीन मात्र, कालव्याखाली गेल्याने ‘तेलही गेले अन तूपही गेले’ अशी स्थिती येथील अनेक शेतकऱ्यांची झाली आहे. याचा विचार होण्याची गरज आहे. प्रश्न आहे तरी काय ? या कालव्यासाठी खूप मोठं क्षेत्र संपादित झालं आहे. काही शेतकऱ्यांच्या संपूर्ण जमिनी या कालव्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा उपजीविकेचा प्रश्न बिकट झाला आहे. खोदकामाच्या दोन्ही बाजूस अंदाजे तीस फूट जमिनी पडिक राहिल्याने त्याक्षेत्रावर आता कुसळही उगवत नाही. खोदकामामधून आता झाडे उगवून आली आहेत. तर काही ठिकाणी चक्क बैलगाड्या जाऊन चाकोऱ्या तयार झालेल्या आहेत. त्यामुळे हा कालवा आहे की दुसरे काय ? असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांत साशंकताच...शशिकांत शिंदे हे जलसंपदामंत्री झाले. येथील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या. परंतु कालव्याचे काम पुढे न सरकल्याने व जमिनीही कसता येत नसल्याने दोन्ही बाजुंनी शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. याप्रश्नावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ठोस पावले उचलणार की पंचवार्षिकची वाट पाहवी लागणार याबाबत शेतकऱ्यांत साशंकताच आहे.