शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पाटाचं पाणी नाही आलं; पोटपाणी मात्र अवघड केलं !

By admin | Updated: June 1, 2015 00:51 IST

महू-हातगेघर कालवा : रखडलेल्या कामामुळे शेतकऱ्यांच्या काळजात ‘कालवाकालव’

नीलेश भोसले - सायगाव  जावळी तालुक्यातील सायगाव पश्चिम विभाग हा पूर्वीपासून कोरडवाहू म्हणून ओळखला जातो. येथील पाणीप्रश्न हा प्रत्येक निवडणुकीत कळीचा मुद्दा बनला आहे. अनेक पंचवार्षिक निवडणुका आल्या आणि गेल्या. ना पाट झाला ना पाणी आलं. पोटपाणी मात्र अवघड झालं, अशी स्थिती येथील ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांची झाली असल्याचे दिसून येत आहे. निसर्ग कधीच पक्षपात करीत नाही. निसर्ग कधीच अनुशेष ठेवत नाही. निधी अडकला म्हणून पाऊस वर्षानुवर्षे रखडत नाही. बीलं अडकली म्हणून पाऊस पडायचा थांबत नाही. पण, येथील पाणीप्रश्न वर्षानुवर्षे तसाच आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात वळिवाचा पाऊस पडला. या पावसाने काही ठिकाणी नुकसानही केले. तसेच जावळी तालुक्यातील सायगाव विभागालाही या वळिवाच्या पावसाने झोडपून काढले. पाऊस, एवढा मोठा होता की रखडलेले कालवे चक्क पाण्याने वाहू लागले होते. निसर्गाच्या औदार्याचीच प्रचिती यानिमित्ताने येथील जनतेला व शेतकऱ्यांना अनुभवायास मिळाली. जावळी तालुक्यातील सायगाव पश्चिम विभाग हा पूर्वीपासून कोरडवाहू म्हणून ओळखला जातो. येथील पाणीप्रश्न हा प्रत्येक निवडणुकीत कळीचा मुद्दा बनला आहे. प्रत्येक निवडणुकीत पाणीप्रश्न समोर आला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पाणीप्रश्नावर आश्वासनेही देण्यात आली होती. पण, येथे ना पाट झाला ना पाणी आलं. अशी स्थिती येथील झाली आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता या सायगाव विभागावर राहिली आहे. दोन वर्षांपूर्वी महू-हातगेघर धरणांतर्गत कालव्याची खोदकामे करण्यात आली. दोन वर्षे पूर्ण होऊनही ना पाट पूर्ण झाले ना पाणी आले.येथील संपादित झालेली जमीन मात्र, कालव्याखाली गेल्याने ‘तेलही गेले अन तूपही गेले’ अशी स्थिती येथील अनेक शेतकऱ्यांची झाली आहे. याचा विचार होण्याची गरज आहे. प्रश्न आहे तरी काय ? या कालव्यासाठी खूप मोठं क्षेत्र संपादित झालं आहे. काही शेतकऱ्यांच्या संपूर्ण जमिनी या कालव्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा उपजीविकेचा प्रश्न बिकट झाला आहे. खोदकामाच्या दोन्ही बाजूस अंदाजे तीस फूट जमिनी पडिक राहिल्याने त्याक्षेत्रावर आता कुसळही उगवत नाही. खोदकामामधून आता झाडे उगवून आली आहेत. तर काही ठिकाणी चक्क बैलगाड्या जाऊन चाकोऱ्या तयार झालेल्या आहेत. त्यामुळे हा कालवा आहे की दुसरे काय ? असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांत साशंकताच...शशिकांत शिंदे हे जलसंपदामंत्री झाले. येथील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या. परंतु कालव्याचे काम पुढे न सरकल्याने व जमिनीही कसता येत नसल्याने दोन्ही बाजुंनी शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. याप्रश्नावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ठोस पावले उचलणार की पंचवार्षिकची वाट पाहवी लागणार याबाबत शेतकऱ्यांत साशंकताच आहे.