शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
5
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
6
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
7
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
8
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
9
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
10
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
11
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
12
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
13
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
14
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
15
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
16
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
17
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
18
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
19
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
20
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा

नाही गाव, पण विहिरीमुळं मिळालं नाव!

By admin | Updated: March 11, 2015 00:06 IST

पेशवेकालीन जोशी विहीर : महसूल खात्याच्या दफ्तरी नोंद नसलेलं एक आगळंवेगळं ठिकाण

राहुल तांबोळी - भुर्इंज पुणे बंगळूर महामार्गावर भुर्इंज आणि कवठ्याच्या मध्ये एक थांबा आहे. जोशीविहीर या नावाने प्रसिद्ध असलेले हे ठिकाण सध्या अनेकांना एका गावाप्रमाणे भासते. मात्र अश्चर्य वाटेल, की जोशीविहिर या नावाचे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर आणि महसूली विभागाच्या खात्यावर नोंद नसले तरी एका विहिरीमुळे या ठिकाणाला एका गावाप्रमाणे नाव मिळाले आहे. तरीही एका गावाप्रमाणे रुपडे प्राप्त केलेल्या या ठिकाणाचा इतिहास फारच रंजक आहे. इतिहासकाळात शिवाजी महाराजांनी खंडाळा अथवा वाठार या दुष्काळी भागातून आलेल्या सैन्याला पिण्याच्या पाण्यासाठी जागा असावी म्हणून ३५ फूट खोल अशी शिवपिंडीच्या आकाराची विहिर येथे खोदली. त्यावेळी या ठिकाणाला टप्पा म्हणून ओळखले जायचे. टप्प्यावर थांबा असाच निरोप त्या काळी जायचा. पेशवेकाळात मूळच्या बदेवाडी(भुर्इंज) येथील जोशी समाजातील एकाने छत्रपतींना साताऱ्यात जाऊन त्यांचे भविष्य सांगितले. ते खरे ठरल्याने त्यांना हे ठिकाण इनाम दिले. त्यामुळे जोशी कुुटुंब येथे वास्तव्यास आले. पूर्वीच्या काळी या ठिकाणी अवघे एकच जोशींचे घर होते. त्यांच्या मालकीची ही विहीर झाली. भुर्इंज किंवा सुरुर पासून कोणीही वाई, फलटण , बारामतीकडे निघाले की जोशींच्या घरापाशी येऊन तेथून आपला पुढचा प्रवास सुरू करे. त्यावेळी एकमेकाला निरोप देताना जोश्याच्या विहीरीवर भेटू, असे सांगितले जायचे. आणि त्यातूनच या ठिकाणचे नाव जोशीविहीर झाले. सध्या या ठिकाणी जोशी कुटुंबाची पाचवी पिढी राहत आहे. आणि त्यांची ही विहीरही १२ महिने तुडुंब भरलेली असते. जोशीविहीरच्या बहुतेक साऱ्या उद्योगांना पिण्यासाठी आजही या विहिरीचे पाणी दिले जाते. तसेच शेतीसाठीही या विहिरीचे पाणी वापरले जाते. या विहिरीचे पाणी पिण्यासाठी आजही वापरले जात असल्याने त्याच्यावर आच्छादन केले आहे. त्यामुळे ही विहीर बाहेरून दिसत नाही. जोशीविहीर नावाचे हे ठिकाण अनेकांना गाव भासत असले तरी प्रत्यक्षात या विहीराचा भाग आनेवाडी व भुर्इंजच्या हद्दीत येतो. मात्र जोशीविहीर या नावाने व्यापारी पेठेचा परिसर विकसित झाला असला तरी या नावाचे गाव महसुली दप्तरी अस्तित्वात नाही. त्यामुळेच जोशीविहीरचे आगळेवेगळेपण उठून दिसते. पानपट्टीपासून कापड दुकानांपर्यंत सर्वकाही.. पुणे बंगळूर महामार्गावर वाठार वाई रस्ता जेथे छेदतो त्या ठिकाणी असलेले जोशीविहीर सध्या मोठी बाजारपेठ झाले आहे. या ठिकाणी अगदी पानपट्टीपासून सर्व प्रकारच्या दुकानांपर्यंत आणि विविध बंगले ते थेट मंगल कार्यालयापर्यंत येथे काही नाही असे नाही. पांथस्थांचा पाणवठा... या विहिरीवर पाणी पिण्यासाठी पांथस्थ थांबत. अगदी वाठारला रेल्वेतून आलेले ब्रिटिश महाबळश्वरकडे जाताना या ठिकाणीच पाणी पिण्यासाठी थांबत. पेशवेकाळात आमच्या पूर्वजांना ही जागा छत्रपतींकडून इनाम मिळाली. पण ज्या विहिरीमुळे आमच्या कुटुंबाचे नाव अजरामर झाले ती विहीर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली आहे. - बाळासाहेब जोशी, वारस ही विहीर सध्याच्या काळात दुर्लक्षित असली तरी त्याचे महत्त्व नावाच्या रूपाने कायम राहिले आहे. ज्या नावाचे गावच नाही त्या ठिकाणाला एका विहिरीमुळे गावाप्रमाणे लौकिक प्राप्त व्हावा, ही दुर्मिळ गोष्ट असावी. - प्रशांत भोसले-पाटील नावामागची कहाणी-तीन