शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

नाही गाव, पण विहिरीमुळं मिळालं नाव!

By admin | Updated: March 11, 2015 00:06 IST

पेशवेकालीन जोशी विहीर : महसूल खात्याच्या दफ्तरी नोंद नसलेलं एक आगळंवेगळं ठिकाण

राहुल तांबोळी - भुर्इंज पुणे बंगळूर महामार्गावर भुर्इंज आणि कवठ्याच्या मध्ये एक थांबा आहे. जोशीविहीर या नावाने प्रसिद्ध असलेले हे ठिकाण सध्या अनेकांना एका गावाप्रमाणे भासते. मात्र अश्चर्य वाटेल, की जोशीविहिर या नावाचे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर आणि महसूली विभागाच्या खात्यावर नोंद नसले तरी एका विहिरीमुळे या ठिकाणाला एका गावाप्रमाणे नाव मिळाले आहे. तरीही एका गावाप्रमाणे रुपडे प्राप्त केलेल्या या ठिकाणाचा इतिहास फारच रंजक आहे. इतिहासकाळात शिवाजी महाराजांनी खंडाळा अथवा वाठार या दुष्काळी भागातून आलेल्या सैन्याला पिण्याच्या पाण्यासाठी जागा असावी म्हणून ३५ फूट खोल अशी शिवपिंडीच्या आकाराची विहिर येथे खोदली. त्यावेळी या ठिकाणाला टप्पा म्हणून ओळखले जायचे. टप्प्यावर थांबा असाच निरोप त्या काळी जायचा. पेशवेकाळात मूळच्या बदेवाडी(भुर्इंज) येथील जोशी समाजातील एकाने छत्रपतींना साताऱ्यात जाऊन त्यांचे भविष्य सांगितले. ते खरे ठरल्याने त्यांना हे ठिकाण इनाम दिले. त्यामुळे जोशी कुुटुंब येथे वास्तव्यास आले. पूर्वीच्या काळी या ठिकाणी अवघे एकच जोशींचे घर होते. त्यांच्या मालकीची ही विहीर झाली. भुर्इंज किंवा सुरुर पासून कोणीही वाई, फलटण , बारामतीकडे निघाले की जोशींच्या घरापाशी येऊन तेथून आपला पुढचा प्रवास सुरू करे. त्यावेळी एकमेकाला निरोप देताना जोश्याच्या विहीरीवर भेटू, असे सांगितले जायचे. आणि त्यातूनच या ठिकाणचे नाव जोशीविहीर झाले. सध्या या ठिकाणी जोशी कुटुंबाची पाचवी पिढी राहत आहे. आणि त्यांची ही विहीरही १२ महिने तुडुंब भरलेली असते. जोशीविहीरच्या बहुतेक साऱ्या उद्योगांना पिण्यासाठी आजही या विहिरीचे पाणी दिले जाते. तसेच शेतीसाठीही या विहिरीचे पाणी वापरले जाते. या विहिरीचे पाणी पिण्यासाठी आजही वापरले जात असल्याने त्याच्यावर आच्छादन केले आहे. त्यामुळे ही विहीर बाहेरून दिसत नाही. जोशीविहीर नावाचे हे ठिकाण अनेकांना गाव भासत असले तरी प्रत्यक्षात या विहीराचा भाग आनेवाडी व भुर्इंजच्या हद्दीत येतो. मात्र जोशीविहीर या नावाने व्यापारी पेठेचा परिसर विकसित झाला असला तरी या नावाचे गाव महसुली दप्तरी अस्तित्वात नाही. त्यामुळेच जोशीविहीरचे आगळेवेगळेपण उठून दिसते. पानपट्टीपासून कापड दुकानांपर्यंत सर्वकाही.. पुणे बंगळूर महामार्गावर वाठार वाई रस्ता जेथे छेदतो त्या ठिकाणी असलेले जोशीविहीर सध्या मोठी बाजारपेठ झाले आहे. या ठिकाणी अगदी पानपट्टीपासून सर्व प्रकारच्या दुकानांपर्यंत आणि विविध बंगले ते थेट मंगल कार्यालयापर्यंत येथे काही नाही असे नाही. पांथस्थांचा पाणवठा... या विहिरीवर पाणी पिण्यासाठी पांथस्थ थांबत. अगदी वाठारला रेल्वेतून आलेले ब्रिटिश महाबळश्वरकडे जाताना या ठिकाणीच पाणी पिण्यासाठी थांबत. पेशवेकाळात आमच्या पूर्वजांना ही जागा छत्रपतींकडून इनाम मिळाली. पण ज्या विहिरीमुळे आमच्या कुटुंबाचे नाव अजरामर झाले ती विहीर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली आहे. - बाळासाहेब जोशी, वारस ही विहीर सध्याच्या काळात दुर्लक्षित असली तरी त्याचे महत्त्व नावाच्या रूपाने कायम राहिले आहे. ज्या नावाचे गावच नाही त्या ठिकाणाला एका विहिरीमुळे गावाप्रमाणे लौकिक प्राप्त व्हावा, ही दुर्मिळ गोष्ट असावी. - प्रशांत भोसले-पाटील नावामागची कहाणी-तीन