शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
4
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
5
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
6
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
7
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
9
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
10
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
11
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
12
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
13
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
14
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
15
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
16
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
17
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
18
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
19
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
20
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक

तळ्यात नकोय ‘राजकीय प्रदूषण’!

By admin | Updated: June 25, 2014 00:30 IST

नागरिकांचा उद्वेग: विसर्जनप्रश्नी सहा महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार करूनही जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी

सातारा : मंगळवार तळ्यातलं पाणी अनायसे उपसलंच आहे. पाऊसही लांबला आहे. त्यामुळं मोठ्या मूर्ती आजमितीस विसर्जन करायच्या झाल्यास शक्यच नाही. तळ्याची हीच पाणीपातळी गणेशोत्सवापर्यंत कायम ठेवावी. तसेच ‘दुर्गंधीमुक्तीच्या मोहिमेत राजकीय प्रदूषण नको’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. विसर्जन आणि त्यामुळं होणाऱ्या प्रदूषणाबद्दल सहा महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार करूनही प्रशासनानं वेळीच हालचाली केल्या नाहीत, याचा संताप नागरिकांच्या बोलण्यातून जाणवतो. मोती तळ्यात विसर्जनबंदी केल्यानंतर मंगळवार तळ्यावर अतिरिक्त भार पडून प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. तळ्याची धारणक्षमताही विचारात न घेता विसर्जित केलेल्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींचे भग्नावशेष उघड्या डोळ्यांनी पाहणं आणि नाक मुठीत धरून जगणं नागरिकांच्या वाट्याला आलंय. ‘लोकमत’ने हा विषय हाती घेताच परिसरातील नागरिकांनी मुक्तपणे मते मांडण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी एका इमारतीच्या ‘पार्किंग’मध्ये नागरिकांनी मनातली खदखद ‘लोकमत’ टीमसमोर मोकळी केली. असं एका सुरात लोक म्हणू लागलेत. वेगवेगळे जनसमूह एकत्रित येऊन याप्रश्नी मार्ग काढण्यास पुढं येऊ लागलेत. यावर्षी मासे मृत्युमुखी पडू लागल्यावर यांत्रिक मार्गानं पाणी उपसलं गेलं. या प्रक्रियेत परिसरात झालेल्या प्रदूषणामुळं नागरिक आजारी पडलेच; शिवाय घरातली तांब्या-पितळेची भांडी, चांदीचे अलंकार, इतकंच काय देवघरातले देवही काळे पडले. पावसामुळं हळूहळू पाणी वाढू लागलं असलं, तरी नागरिकांना तळं भरूच नये, असं मनापासून वाटतंय. मोठ्या गणेशमूर्ती आणि दुर्गामूर्तींच्या विसर्जनास सावत्रिक विरोध असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. गेल्या चार महिन्यात या प्रश्नाचे चटके जवळजवळ प्रत्येकाने सोसले असल्यामुळे प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी श्रमदानापासून काहीही करण्याची तयारी नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दाखविली. (लोकमत टीम)