शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

तळ्यात नकोय ‘राजकीय प्रदूषण’!

By admin | Updated: June 25, 2014 00:30 IST

नागरिकांचा उद्वेग: विसर्जनप्रश्नी सहा महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार करूनही जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी

सातारा : मंगळवार तळ्यातलं पाणी अनायसे उपसलंच आहे. पाऊसही लांबला आहे. त्यामुळं मोठ्या मूर्ती आजमितीस विसर्जन करायच्या झाल्यास शक्यच नाही. तळ्याची हीच पाणीपातळी गणेशोत्सवापर्यंत कायम ठेवावी. तसेच ‘दुर्गंधीमुक्तीच्या मोहिमेत राजकीय प्रदूषण नको’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. विसर्जन आणि त्यामुळं होणाऱ्या प्रदूषणाबद्दल सहा महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार करूनही प्रशासनानं वेळीच हालचाली केल्या नाहीत, याचा संताप नागरिकांच्या बोलण्यातून जाणवतो. मोती तळ्यात विसर्जनबंदी केल्यानंतर मंगळवार तळ्यावर अतिरिक्त भार पडून प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. तळ्याची धारणक्षमताही विचारात न घेता विसर्जित केलेल्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींचे भग्नावशेष उघड्या डोळ्यांनी पाहणं आणि नाक मुठीत धरून जगणं नागरिकांच्या वाट्याला आलंय. ‘लोकमत’ने हा विषय हाती घेताच परिसरातील नागरिकांनी मुक्तपणे मते मांडण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी एका इमारतीच्या ‘पार्किंग’मध्ये नागरिकांनी मनातली खदखद ‘लोकमत’ टीमसमोर मोकळी केली. असं एका सुरात लोक म्हणू लागलेत. वेगवेगळे जनसमूह एकत्रित येऊन याप्रश्नी मार्ग काढण्यास पुढं येऊ लागलेत. यावर्षी मासे मृत्युमुखी पडू लागल्यावर यांत्रिक मार्गानं पाणी उपसलं गेलं. या प्रक्रियेत परिसरात झालेल्या प्रदूषणामुळं नागरिक आजारी पडलेच; शिवाय घरातली तांब्या-पितळेची भांडी, चांदीचे अलंकार, इतकंच काय देवघरातले देवही काळे पडले. पावसामुळं हळूहळू पाणी वाढू लागलं असलं, तरी नागरिकांना तळं भरूच नये, असं मनापासून वाटतंय. मोठ्या गणेशमूर्ती आणि दुर्गामूर्तींच्या विसर्जनास सावत्रिक विरोध असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. गेल्या चार महिन्यात या प्रश्नाचे चटके जवळजवळ प्रत्येकाने सोसले असल्यामुळे प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी श्रमदानापासून काहीही करण्याची तयारी नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दाखविली. (लोकमत टीम)