शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

तळ्यात नकोय ‘राजकीय प्रदूषण’!

By admin | Updated: June 25, 2014 00:30 IST

नागरिकांचा उद्वेग: विसर्जनप्रश्नी सहा महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार करूनही जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी

सातारा : मंगळवार तळ्यातलं पाणी अनायसे उपसलंच आहे. पाऊसही लांबला आहे. त्यामुळं मोठ्या मूर्ती आजमितीस विसर्जन करायच्या झाल्यास शक्यच नाही. तळ्याची हीच पाणीपातळी गणेशोत्सवापर्यंत कायम ठेवावी. तसेच ‘दुर्गंधीमुक्तीच्या मोहिमेत राजकीय प्रदूषण नको’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. विसर्जन आणि त्यामुळं होणाऱ्या प्रदूषणाबद्दल सहा महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार करूनही प्रशासनानं वेळीच हालचाली केल्या नाहीत, याचा संताप नागरिकांच्या बोलण्यातून जाणवतो. मोती तळ्यात विसर्जनबंदी केल्यानंतर मंगळवार तळ्यावर अतिरिक्त भार पडून प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. तळ्याची धारणक्षमताही विचारात न घेता विसर्जित केलेल्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींचे भग्नावशेष उघड्या डोळ्यांनी पाहणं आणि नाक मुठीत धरून जगणं नागरिकांच्या वाट्याला आलंय. ‘लोकमत’ने हा विषय हाती घेताच परिसरातील नागरिकांनी मुक्तपणे मते मांडण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी एका इमारतीच्या ‘पार्किंग’मध्ये नागरिकांनी मनातली खदखद ‘लोकमत’ टीमसमोर मोकळी केली. असं एका सुरात लोक म्हणू लागलेत. वेगवेगळे जनसमूह एकत्रित येऊन याप्रश्नी मार्ग काढण्यास पुढं येऊ लागलेत. यावर्षी मासे मृत्युमुखी पडू लागल्यावर यांत्रिक मार्गानं पाणी उपसलं गेलं. या प्रक्रियेत परिसरात झालेल्या प्रदूषणामुळं नागरिक आजारी पडलेच; शिवाय घरातली तांब्या-पितळेची भांडी, चांदीचे अलंकार, इतकंच काय देवघरातले देवही काळे पडले. पावसामुळं हळूहळू पाणी वाढू लागलं असलं, तरी नागरिकांना तळं भरूच नये, असं मनापासून वाटतंय. मोठ्या गणेशमूर्ती आणि दुर्गामूर्तींच्या विसर्जनास सावत्रिक विरोध असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. गेल्या चार महिन्यात या प्रश्नाचे चटके जवळजवळ प्रत्येकाने सोसले असल्यामुळे प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी श्रमदानापासून काहीही करण्याची तयारी नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दाखविली. (लोकमत टीम)