शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

ना फिजिकल डिस्टन्स, ना मास्क; विद्यार्थ्यांना सांभाळणं अवघड टास्क!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी थोडी धास्ती घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठवलं. मात्र, पाचवी, सहावीच्या विद्यार्थ्यांना सांभाळणं ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी थोडी धास्ती घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठवलं. मात्र, पाचवी, सहावीच्या विद्यार्थ्यांना सांभाळणं हा शिक्षकांसाठी अवघड टास्क बनला आहे. शासनस्तरावर शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्याने विद्यार्थी उत्साहात शाळेत आले खरे; पण मास्क आणि सोशल डिस्टन्स याचा त्यांना विसर पडला आहे.

कोविडचा वाढता प्रसार लक्षात घेता, मार्च २०२० मध्ये शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुमारे दहा महिन्यांनंतर नववी ते बारावी आणि आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने अनलॉक प्रक्रियेत घेतला. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यापूर्वी कोविडची चाचणी यासह पालकांचे संमतीपत्रही शाळेला देणं बंधनकारक करण्यात आले.

विद्यार्थ्यांना पाठवताना पालकांनी घरी आणि शिक्षकांनी शाळेत आल्यानंतर घ्यावयाच्या उपाययोजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली, पण दहा महिन्यानंतर मित्रमंडळी भेटल्याने विद्यार्थ्यांना याचा विसर पडला. त्यातही वर्गामध्ये शिक्षकांकडून याची दक्षता घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसते.

कोट :

विद्यार्थ्यांचे वर्तन वर्गात कसे असावे, याची माहिती आम्ही त्यांना दिली आहे. मात्र, वर्गात येताना किंवा बाहेर जाताना त्यांच्याकडून काहीवेळा मास्क खाली घेणे किंवा सोशल डिस्टन्स न पाळण्याचे प्रकार होतात.

- श्रध्दा पाटील, शिक्षिका

सोशल डिस्टन्सिंगबाबतचे नियम आम्ही वारंवार विद्यार्थ्यांना सांगतोय; पण शाळेत येतानाच एकमेकांच्या खांद्यावर हात टाकलेल्या विद्यार्थ्यांना सांभाळणे कठीण जातेय. यासाठी पालकही सहकार्य करत आहेत.

- राजेश बोराटे, शिक्षक

खूप दिवसांनी शाळेत आलेले विद्यार्थी अद्यापही उत्साहित आहेत. कोविडविषयी त्यांना गरजेएवढी माहिती आहे. उत्साहात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाकडे दुर्लक्ष होते; पण मास्क सगळेच वापरतात.

- हसिना मुलाणी, शिक्षिका

एकूण शाळा : १०६९

विद्यार्थी उपस्थिती : ४६६६

शिक्षक उपस्थिती : ४९४१