शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

जवानांची चिठ्ठी ना कोई संदेश...२५ दिवसांपासून संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 10:50 IST

काश्मीरमध्ये आज कैक जवान देशाच्या रक्षणासाठी तैनात आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव तेथील संपर्क सेवा बंद केल्याने गेल्या २५ दिवसांपासून जवान व कुटुंबीयांचा संपर्क होऊ शकला नाही.

ठळक मुद्देजवानांची चिठ्ठी ना कोई संदेश...२५ दिवसांपासून संपर्क तुटलाकाश्मीर स्थितीमुळे जिल्ह्यातील कुटुंबीय व्याकूळ

स्वप्नील शिंदेसातारा : ना मातृछत्र हरपल्याचे दु:ख, ना पुत्र प्राप्तीचा आनंद याची कोणतीही फिकीर न करता काश्मीरमध्ये आज कैक जवान देशाच्या रक्षणासाठी तैनात आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव तेथील संपर्क सेवा बंद केल्याने गेल्या २५ दिवसांपासून जवान व कुटुंबीयांचा संपर्क होऊ शकला नाही. सातारा जिल्ह्यातील अशा हजारो जवानांच्या संदेशाची आस कुटुंबीयांना लागून राहिली असून, त्यांच्या मनामध्ये चिंतेचे काहूर माजले आहे.सातारा जिल्ह्याला अनेक वर्षांपासून सैनिकी परंपरा लाभली आहे. या जिल्ह्यातील प्रत्येक गावातील एकतरी तरुण सैन्यात कार्यरत आहे. प्रत्येक गावाच्या वेशीवर असलेल्या कमानी आणि शहिदांची स्मारके ही त्या जवानांच्या शौर्याची आठवण करून देतात. आजही भारतीय सैन्य, नौदल आणि वायूदलासह विविध फोर्समध्ये जिल्ह्यातील सुमारे ४० हजारांपेक्षा जास्त सैनिक कार्यरत आहेत.

केंद्र सरकारने राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याने जम्मू-काश्मीरमध्ये तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली. तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्यातील फोन, इंटरनेटसह सर्व संपर्क माध्यमे बंद केली आहेत. त्यामुळे तेथील लोकांचा संपर्क एकमेकांशी होत नाही. या निर्णयाच्या विरोधात स्थानिकांनी दगडफेक, निदर्शने केल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीमध्ये साताऱ्यातील सुमारे पाच हजार जवान जम्मू-काश्मीरमध्ये आपली सेवा बजावत आहेत. त्यापैकीच एक असलेल्या प्रदीप यादव याच्या आईचे मागील आठवड्यामध्ये निधन झाले. तर सीआरपीएफमधील अमोल निकम यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

दु:खद आणि आनंददायी अशा दोन्ही घटनांची माहिती सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांपर्यंत पोहोचली नाही. मात्र, ते कोणतीही फिकीर न करता देशसेवा बजावत आहेत. त्यांच्यासारखे हजारो जवान गेल्या २५ दिवसांपासून आपल्या कुटुंबीयांशी बोलू शकले नाहीत. त्यांची खुशाली न कळल्याने गावाकडे त्यांच्या संदेशाची वाट पाहत बसलेली कुटुंबे कासावीस झाली आहेत. कधी मोबाईल, फोन अन् इंटरनेटची सेवा चालू होतेय, याची ते प्रतीक्षा करीत आहेत.

ते सध्या सीआरपीएफमध्ये आहेत. आमचा मुलगा अर्णवला रोज मोबाईलवर वडिलांशी व्हिडीओ कॉलिंग करण्याची सवय आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्याशी संपर्कच होऊ शकला नाही. त्यामुळे अर्णव शाळेत जाईना. पप्पांशी बोलल्याशिवाय शाळेत जाणार नाही, असे म्हणतोय.-सुष्मिता पवार जवानाची पत्नी, सातारा

पोराशी चार तारखीला बोलले होते, तवापासन त्याची खबरबात नाय. टीव्हीवर बघतो काश्मीरमध्ये रोज दंगा व्हतोय. काळजी लागून राहिली हाय. पोरगं कस हाय, त्याची चिंता लागलीय.- उषा जाधव,जवानाची माता, कऱ्हाड 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरSatara areaसातारा परिसर