शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

जवानांची चिठ्ठी ना कोई संदेश...२५ दिवसांपासून संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 10:50 IST

काश्मीरमध्ये आज कैक जवान देशाच्या रक्षणासाठी तैनात आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव तेथील संपर्क सेवा बंद केल्याने गेल्या २५ दिवसांपासून जवान व कुटुंबीयांचा संपर्क होऊ शकला नाही.

ठळक मुद्देजवानांची चिठ्ठी ना कोई संदेश...२५ दिवसांपासून संपर्क तुटलाकाश्मीर स्थितीमुळे जिल्ह्यातील कुटुंबीय व्याकूळ

स्वप्नील शिंदेसातारा : ना मातृछत्र हरपल्याचे दु:ख, ना पुत्र प्राप्तीचा आनंद याची कोणतीही फिकीर न करता काश्मीरमध्ये आज कैक जवान देशाच्या रक्षणासाठी तैनात आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव तेथील संपर्क सेवा बंद केल्याने गेल्या २५ दिवसांपासून जवान व कुटुंबीयांचा संपर्क होऊ शकला नाही. सातारा जिल्ह्यातील अशा हजारो जवानांच्या संदेशाची आस कुटुंबीयांना लागून राहिली असून, त्यांच्या मनामध्ये चिंतेचे काहूर माजले आहे.सातारा जिल्ह्याला अनेक वर्षांपासून सैनिकी परंपरा लाभली आहे. या जिल्ह्यातील प्रत्येक गावातील एकतरी तरुण सैन्यात कार्यरत आहे. प्रत्येक गावाच्या वेशीवर असलेल्या कमानी आणि शहिदांची स्मारके ही त्या जवानांच्या शौर्याची आठवण करून देतात. आजही भारतीय सैन्य, नौदल आणि वायूदलासह विविध फोर्समध्ये जिल्ह्यातील सुमारे ४० हजारांपेक्षा जास्त सैनिक कार्यरत आहेत.

केंद्र सरकारने राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याने जम्मू-काश्मीरमध्ये तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली. तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्यातील फोन, इंटरनेटसह सर्व संपर्क माध्यमे बंद केली आहेत. त्यामुळे तेथील लोकांचा संपर्क एकमेकांशी होत नाही. या निर्णयाच्या विरोधात स्थानिकांनी दगडफेक, निदर्शने केल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीमध्ये साताऱ्यातील सुमारे पाच हजार जवान जम्मू-काश्मीरमध्ये आपली सेवा बजावत आहेत. त्यापैकीच एक असलेल्या प्रदीप यादव याच्या आईचे मागील आठवड्यामध्ये निधन झाले. तर सीआरपीएफमधील अमोल निकम यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

दु:खद आणि आनंददायी अशा दोन्ही घटनांची माहिती सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांपर्यंत पोहोचली नाही. मात्र, ते कोणतीही फिकीर न करता देशसेवा बजावत आहेत. त्यांच्यासारखे हजारो जवान गेल्या २५ दिवसांपासून आपल्या कुटुंबीयांशी बोलू शकले नाहीत. त्यांची खुशाली न कळल्याने गावाकडे त्यांच्या संदेशाची वाट पाहत बसलेली कुटुंबे कासावीस झाली आहेत. कधी मोबाईल, फोन अन् इंटरनेटची सेवा चालू होतेय, याची ते प्रतीक्षा करीत आहेत.

ते सध्या सीआरपीएफमध्ये आहेत. आमचा मुलगा अर्णवला रोज मोबाईलवर वडिलांशी व्हिडीओ कॉलिंग करण्याची सवय आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्याशी संपर्कच होऊ शकला नाही. त्यामुळे अर्णव शाळेत जाईना. पप्पांशी बोलल्याशिवाय शाळेत जाणार नाही, असे म्हणतोय.-सुष्मिता पवार जवानाची पत्नी, सातारा

पोराशी चार तारखीला बोलले होते, तवापासन त्याची खबरबात नाय. टीव्हीवर बघतो काश्मीरमध्ये रोज दंगा व्हतोय. काळजी लागून राहिली हाय. पोरगं कस हाय, त्याची चिंता लागलीय.- उषा जाधव,जवानाची माता, कऱ्हाड 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरSatara areaसातारा परिसर