शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ना निवडणूक ना आचारसंहिता.. तरी बाजार बंद

By admin | Updated: August 4, 2015 23:21 IST

शेतकऱ्यांकडून निषेध : पोलिसांनी शेतीमाल रस्त्यावर फेकल्याचा आरोप

पाचवड : ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत आचारसंहितेचे कारण पुढे करून पाचवड, ता. वाई येथील आठवडे मंगळवारी बाजार बंद पाडण्यात आला. कोणतीही पूर्व सूचना न दिल्याने मंगळवारचा आठवडा बाजार व जनावरांचा बाजार बंद पाडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी कृषिमाल रस्त्यावर फेकून दिला आहे, असा आरोप करत शेतकऱ्यांना या प्रकाराचा निषेध केला आहे.जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होत आहे. ज्या गावामध्ये निवडणूक आहे, त्या गावातच कोणताही कार्यक्रम अथवा आठवडे बाजार घेऊ नयेत, असा आदेश आहेत. पाचवडची कोणतीही निवडणूक नसताना महसूल खात्याने आठवडा बाजार बंद पाडल्याने शेतकरी व व्यापारी वर्गात नाराजी पसरली आहे. वाई तालुक्यामध्ये पाचवडच्या आठवडा बाजाराला महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी-विक्रीचे हमखास ठिकाण म्हणून पाचवडचा आठवडा बाजार प्रसिध्द आहे. त्यामुळे येथे प्रत्येक बाजारात लाखोंची उलाढाल होत असते. पाचवडच्या आजूबाजूच्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीचे मतदान मंगळवारी होत असून पाचवडमध्ये मात्र या निवडणुकीचा कोणताही संबंध नाही. शेतकऱ्यांना भाजीपाला मंगळवारी पाचवडमध्ये घेऊन न येण्याची कोणतीही पूर्वसूचना नसताना अचानक आचारसंहितेच्या नावाखाली मंगळवारी सकाळपासूनच भाजीबाजार व फळबाजार बंद पाडण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातून आलेले सर्व व्यावसायिक व शेतकरी यांच्या शेतमालाचे व फळांचे अतोनात नुकसान झाले. काही शेतकरी बाजारात बसून माल विक्री करीत असताना अचानक आलेल्या पोलिसांनी भाजीपाला इतरत्र फेकून दिला. याचा जाब विचारला असता निवडणूक आचारसंहितेचे आदेश व कारण पुढे करण्यात आले. या प्रकारानंतर शेतकऱ्यांनी एकत्र येवून शासनाचा निषेध करण्यात आला. दरम्यान, शेतकऱ्यांनी महागाई व दुष्काळाचे सावट याचा सामना करून आणलेला शेतीचा माल हा कवडीमोलाने कुठे विक्रीस न्यायचा या विचाराने शेतकरी गर्भगळीत झाले. या सर्व घडलेल्या प्रकाराची योग्य ती दखल घऊन प्रशासनाने संबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी शेतकरी, व्यापारी करू लागले आहेत. (वार्ताहर)पोलिसांनी भाजीपाला फेकलाशेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी शेतीमाल विक्रीसाठी बाजारपेठेत ठेवला असता त्याठिकाणी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी येऊन शेतकऱ्यांचा माल अस्ताव्यस्त करून दमदाटी केली. आचारसंहितेच्या नावाखाली पोलिसांनी केलेल्या या कृत्याचा पाचवड बाजारपेठेतील शेतकरी व व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त केला.