शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ना निवडणूक ना आचारसंहिता.. तरी बाजार बंद

By admin | Updated: August 4, 2015 23:21 IST

शेतकऱ्यांकडून निषेध : पोलिसांनी शेतीमाल रस्त्यावर फेकल्याचा आरोप

पाचवड : ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत आचारसंहितेचे कारण पुढे करून पाचवड, ता. वाई येथील आठवडे मंगळवारी बाजार बंद पाडण्यात आला. कोणतीही पूर्व सूचना न दिल्याने मंगळवारचा आठवडा बाजार व जनावरांचा बाजार बंद पाडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी कृषिमाल रस्त्यावर फेकून दिला आहे, असा आरोप करत शेतकऱ्यांना या प्रकाराचा निषेध केला आहे.जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होत आहे. ज्या गावामध्ये निवडणूक आहे, त्या गावातच कोणताही कार्यक्रम अथवा आठवडे बाजार घेऊ नयेत, असा आदेश आहेत. पाचवडची कोणतीही निवडणूक नसताना महसूल खात्याने आठवडा बाजार बंद पाडल्याने शेतकरी व व्यापारी वर्गात नाराजी पसरली आहे. वाई तालुक्यामध्ये पाचवडच्या आठवडा बाजाराला महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी-विक्रीचे हमखास ठिकाण म्हणून पाचवडचा आठवडा बाजार प्रसिध्द आहे. त्यामुळे येथे प्रत्येक बाजारात लाखोंची उलाढाल होत असते. पाचवडच्या आजूबाजूच्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीचे मतदान मंगळवारी होत असून पाचवडमध्ये मात्र या निवडणुकीचा कोणताही संबंध नाही. शेतकऱ्यांना भाजीपाला मंगळवारी पाचवडमध्ये घेऊन न येण्याची कोणतीही पूर्वसूचना नसताना अचानक आचारसंहितेच्या नावाखाली मंगळवारी सकाळपासूनच भाजीबाजार व फळबाजार बंद पाडण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातून आलेले सर्व व्यावसायिक व शेतकरी यांच्या शेतमालाचे व फळांचे अतोनात नुकसान झाले. काही शेतकरी बाजारात बसून माल विक्री करीत असताना अचानक आलेल्या पोलिसांनी भाजीपाला इतरत्र फेकून दिला. याचा जाब विचारला असता निवडणूक आचारसंहितेचे आदेश व कारण पुढे करण्यात आले. या प्रकारानंतर शेतकऱ्यांनी एकत्र येवून शासनाचा निषेध करण्यात आला. दरम्यान, शेतकऱ्यांनी महागाई व दुष्काळाचे सावट याचा सामना करून आणलेला शेतीचा माल हा कवडीमोलाने कुठे विक्रीस न्यायचा या विचाराने शेतकरी गर्भगळीत झाले. या सर्व घडलेल्या प्रकाराची योग्य ती दखल घऊन प्रशासनाने संबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी शेतकरी, व्यापारी करू लागले आहेत. (वार्ताहर)पोलिसांनी भाजीपाला फेकलाशेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी शेतीमाल विक्रीसाठी बाजारपेठेत ठेवला असता त्याठिकाणी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी येऊन शेतकऱ्यांचा माल अस्ताव्यस्त करून दमदाटी केली. आचारसंहितेच्या नावाखाली पोलिसांनी केलेल्या या कृत्याचा पाचवड बाजारपेठेतील शेतकरी व व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त केला.