शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ठोस कार्यक्रम हवा, नुसत्या बाता नको! : विजय शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:03 IST

‘दरवर्षीप्रमाणे तेच ते टंचाई आराखडे सादर न करता प्रत्यक्ष टंचाईवर कशी मात करता येईल, याच्या उपाययोजना करा. प्रत्यक्ष गाव पातळीवर जाऊन टंचाई निवारण्याचा ठोस कार्यक्रम हाती घ्या.

ठळक मुद्देफलटण येथील टंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना कानपिचक्यातलाव कोरडे असतील तर त्याचे खोलीकरण करावे, रुंदीकरण करावे.

फलटण : ‘दरवर्षीप्रमाणे तेच ते टंचाई आराखडे सादर न करता प्रत्यक्ष टंचाईवर कशी मात करता येईल, याच्या उपाययोजना करा. प्रत्यक्ष गाव पातळीवर जाऊन टंचाई निवारण्याचा ठोस कार्यक्रम हाती घ्या. नुसत्या हवेत बाता नको,’ अशा कानपिचक्या पालकमंत्री विजय शिवतारे यांनी घेतल्या.

येथील पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी आयोजित टंचाई आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, आमदार दीपक चव्हाण, प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील, पंचायत समिती सभापती प्रतिभा धुमाळ उपस्थित होते.

शिवतारे म्हणाले, ‘महाराष्ट्र शासन दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना राबवित आहे. फलटण तालुक्यात सध्या काही गावांत टंचाई जाणवू लागली असली तरी शासकीय यंत्रणेने याबाबत ठोस उपाययोजना करावी. मागेल त्या गावाला टँकर द्यावे; पण टँकरशिवाय तेथे पाणी कसे पोहोचेल, याचा विचार करावा. फलटण तालुक्यातून नीरा उजवा कालवा आणि धोम बलकवडीचा कालवा वाहत आहे. कालव्यातील पाण्यावर लगतची तलाव, विहिरी भरून घ्याव्यात.

तलाव कोरडे असतील तर त्याचे खोलीकरण करावे, रुंदीकरण करावे. हे पाणी त्या गावातील तहान भागवण्यासाठी वापरावे, तालुक्यातील तिन्ही प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना बंद असल्याने त्या पुन्हा सुरू कराव्यात. त्यासाठी आवश्यक ती मदत आणि सहकार्य मदत आणि पुनर्वसन मंत्रालयातर्फे करण्यास तयार आहोत.फलटण तालुक्यात जनावरांची संख्या व चाºयाची उपलब्धता याची माहिती पालकमंत्री शिवतारे यांनी विचारली असता चारा आणखी दहा महिने पुरेल इतका उपलब्ध असल्याचे संबंधित अधिकाºयाने यावेळी स्पष्ट केले.संतप्त आमदारांनी धरले धारेवरआमदार दीपक चव्हाण हे शांत आणि संयमी स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. मात्र सोमवारी नीरा उजवा कालव्यामध्ये गरज असताना पाणी अधिकारी सोडत नसल्याने ते चांगलेच संतापले. लोकांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पिके जळू लागली आहेत. तुम्ही का वेळेवर पाणी सोडत नाही?’ असे त्यांनी संबंधित अधिकाºयाला खडसावले. यावर ‘कालवा दुरुस्तीचे किरकोळ कामे सुरू असल्याने पाणी सोडले नाही,’ असे अधिकाºयांनी सांगताच आमदार चव्हाण यांचा पारा आणखी चढला. यावेळी शिवतारे यांनी हस्तक्षेप करीत ‘तातडीने पाणी सोडा. कामे वेळेवर उरकत जावा. प्रलंबित कामांची टेंडर काढण्यात अडचण असेल तर सांगा,’ असे सुनावले.वीज कनेक्शन तोड़ू नकामहावितरणने टंचाई काळात कोणाचेही वीज कनेक्शन तोड़ू नये. शासकीय योजनांची थकबाकी असेल तर संबंधित मंत्रालयांशी बोलून मार्ग काढू. कोणत्याही शेतकºयांचे, शाळांचे कनेक्शन तोड़ू नका, असे आदेश महावितरणला दिले.

नीरा देवघरच्या पाण्यावर चुप्पीनीरा देवघरच्या प्रलंबित कामाबाबत तसेच याचे पाणी बारामतीला पळविले जात असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर पालकमंत्री यांनी फारसे काही न बोलता. वेळ निभावून नेली. यावर ‘तुम्हीही नीरा देवघरचे खातेदार आहात. तुमची जमीन या भागात असल्याने मार्ग काढा,’ असे त्यांना पत्रकारांनी सांगताच त्यांनी स्मितहास्य करून आवरते घेतले.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकार