शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ठोस कार्यक्रम हवा, नुसत्या बाता नको! : विजय शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:03 IST

‘दरवर्षीप्रमाणे तेच ते टंचाई आराखडे सादर न करता प्रत्यक्ष टंचाईवर कशी मात करता येईल, याच्या उपाययोजना करा. प्रत्यक्ष गाव पातळीवर जाऊन टंचाई निवारण्याचा ठोस कार्यक्रम हाती घ्या.

ठळक मुद्देफलटण येथील टंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना कानपिचक्यातलाव कोरडे असतील तर त्याचे खोलीकरण करावे, रुंदीकरण करावे.

फलटण : ‘दरवर्षीप्रमाणे तेच ते टंचाई आराखडे सादर न करता प्रत्यक्ष टंचाईवर कशी मात करता येईल, याच्या उपाययोजना करा. प्रत्यक्ष गाव पातळीवर जाऊन टंचाई निवारण्याचा ठोस कार्यक्रम हाती घ्या. नुसत्या हवेत बाता नको,’ अशा कानपिचक्या पालकमंत्री विजय शिवतारे यांनी घेतल्या.

येथील पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी आयोजित टंचाई आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, आमदार दीपक चव्हाण, प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील, पंचायत समिती सभापती प्रतिभा धुमाळ उपस्थित होते.

शिवतारे म्हणाले, ‘महाराष्ट्र शासन दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना राबवित आहे. फलटण तालुक्यात सध्या काही गावांत टंचाई जाणवू लागली असली तरी शासकीय यंत्रणेने याबाबत ठोस उपाययोजना करावी. मागेल त्या गावाला टँकर द्यावे; पण टँकरशिवाय तेथे पाणी कसे पोहोचेल, याचा विचार करावा. फलटण तालुक्यातून नीरा उजवा कालवा आणि धोम बलकवडीचा कालवा वाहत आहे. कालव्यातील पाण्यावर लगतची तलाव, विहिरी भरून घ्याव्यात.

तलाव कोरडे असतील तर त्याचे खोलीकरण करावे, रुंदीकरण करावे. हे पाणी त्या गावातील तहान भागवण्यासाठी वापरावे, तालुक्यातील तिन्ही प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना बंद असल्याने त्या पुन्हा सुरू कराव्यात. त्यासाठी आवश्यक ती मदत आणि सहकार्य मदत आणि पुनर्वसन मंत्रालयातर्फे करण्यास तयार आहोत.फलटण तालुक्यात जनावरांची संख्या व चाºयाची उपलब्धता याची माहिती पालकमंत्री शिवतारे यांनी विचारली असता चारा आणखी दहा महिने पुरेल इतका उपलब्ध असल्याचे संबंधित अधिकाºयाने यावेळी स्पष्ट केले.संतप्त आमदारांनी धरले धारेवरआमदार दीपक चव्हाण हे शांत आणि संयमी स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. मात्र सोमवारी नीरा उजवा कालव्यामध्ये गरज असताना पाणी अधिकारी सोडत नसल्याने ते चांगलेच संतापले. लोकांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पिके जळू लागली आहेत. तुम्ही का वेळेवर पाणी सोडत नाही?’ असे त्यांनी संबंधित अधिकाºयाला खडसावले. यावर ‘कालवा दुरुस्तीचे किरकोळ कामे सुरू असल्याने पाणी सोडले नाही,’ असे अधिकाºयांनी सांगताच आमदार चव्हाण यांचा पारा आणखी चढला. यावेळी शिवतारे यांनी हस्तक्षेप करीत ‘तातडीने पाणी सोडा. कामे वेळेवर उरकत जावा. प्रलंबित कामांची टेंडर काढण्यात अडचण असेल तर सांगा,’ असे सुनावले.वीज कनेक्शन तोड़ू नकामहावितरणने टंचाई काळात कोणाचेही वीज कनेक्शन तोड़ू नये. शासकीय योजनांची थकबाकी असेल तर संबंधित मंत्रालयांशी बोलून मार्ग काढू. कोणत्याही शेतकºयांचे, शाळांचे कनेक्शन तोड़ू नका, असे आदेश महावितरणला दिले.

नीरा देवघरच्या पाण्यावर चुप्पीनीरा देवघरच्या प्रलंबित कामाबाबत तसेच याचे पाणी बारामतीला पळविले जात असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर पालकमंत्री यांनी फारसे काही न बोलता. वेळ निभावून नेली. यावर ‘तुम्हीही नीरा देवघरचे खातेदार आहात. तुमची जमीन या भागात असल्याने मार्ग काढा,’ असे त्यांना पत्रकारांनी सांगताच त्यांनी स्मितहास्य करून आवरते घेतले.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकार