शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-सातारा सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:43 IST

सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाहतूक गतीने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सहापदरीकरणाचा निर्णय झाला. ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाहतूक गतीने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सहापदरीकरणाचा निर्णय झाला. सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील नीरा नदी ते शेंद्रे या अंतरात सहापदरीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याने या मार्गावर वाहतूक सुसाट होताना दिसते, तर शेंद्रेपासून कºहाडपर्यंत अनेक अडथळे पार करत हळूहळू वाहतूक पुढे सरकताना पाहायला मिळते.देहू रोड ते शेंद्रे या अंतरातील महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले. नीरा ते शेंद्रे या ७२.५०० किलोमीटर अंतरातील काम वेगाने पूर्ण झाले. या मार्गावर मोठ्या गावांच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. हे उड्डाणपूल बांधण्याआधी अनेकांचे जीव वाहनांच्या वेगामुळे गेले. आता मात्र ज्या ठिकाणी वर्दळ जास्त आहे, त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधले गेल्याने रस्ता ओलांडून जाण्याचे प्रकार थांबले. त्यामुळे अपघातही कमी झाले आहेत. खंबाटकी घाटात रस्त्याचे रुंदीकरण केल्याने वाहतूक कोंडी तसेच गंभीर अपघात टळताना दिसतात. या घाटात एका मंदिराच्या ठिकाणी रुंदीकरण तेवढे रखडलेले आहे. तर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर बोगद्याच्या पुढे एस वळण असल्याने मोठे अपघात होतात. त्याला पर्याय म्हणून वेळे येथील बोगद्याला समांतर दोन बोगदे तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. पावसाळ्यामुळे हे काम रखडले असले तरी भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याने या बोगद्याची कामेही मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.दरम्यान, सहापदरीकरणाचे काम शेंद्रेपर्यंत झाले आहे. तिथून कºहाडकडे चारपदरी रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. या रस्त्यावर अनेक अडथळे पार करत वाहने जात आहेत. अनेक मोठ्या गावांच्या ठिकाणी उड्डाणपूल नसल्याने अपघात होत आहेत.बोगद्याच्या कामाचा मार्ग मोकळावेळे येथील बोगद्याच्या कामात वाई व खंडाळा तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. भूसंपादनाची नोटीस या शेतकºयांना दिली होती. त्यांना जमिनीचा मोबदला दिला जात आहे. त्यामुळे ही भूसंपादनाची प्रक्रियाही लवकरच पूर्ण होऊन या बोगद्यांचे काम मार्गी लागणार आहे.या ठिकाणी हवेत उड्डाणपूलशेंद्रे ते कºहाड रस्त्यावर नागठाणे, माजगाव, अतीत, इंदोली या गावांच्या ठिकाणी उड्डाणपुलांची गरज आहे. या परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊनच महामार्गावर येतात. तसेच महामार्गावरून जाणाºया वाहनधारकांना तर अतिशय जपून वाहने चालवावी लागतात.वेळेत उड्डाणपुलाची मागणीया महामार्गावर वेळे, ता. वाई येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. वेळेतून कोरेगाव तालुक्यातील गावे तसेच वाई तालुक्याच्या पश्चिमेकडच्या गावांना जाण्यासाठी जोड रस्ते आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसायही असल्याने याठिकाणी उड्डाणपूल तयार करण्याची गरज आहे.टॉयलेट्सची गैरसोयमहामार्गावर टॉयलेटच नसल्याने प्रवाशांची गेल्या अनेक वर्षांपासून गैरसोय सुरू आहे. कायमस्वरुपी शौचालय उभारणे शक्य नसले तरी फिरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.