शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानवा महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
3
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
4
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
5
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
6
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
7
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
8
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
9
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
10
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
11
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
12
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
13
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
14
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
15
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
16
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
17
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
18
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
19
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
20
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात नऊ वर्षे दिसणार नऊ रूपं!

By admin | Updated: September 30, 2014 00:06 IST

नवदुर्गा : कामाठीपुरा येथील संघर्ष मित्र समूहानं साकारला ‘शैलपुत्री’ दुर्गावतार

सातारा : आपल्याला दुर्गादेवीची नऊ नावे माहीत असली तरी तिची नऊ रूपे पाहायला मिळत नाहीत. म्हणूनच कामाठीपुरा येथील संघर्ष मित्र समूहाने यंदापासून दुर्गादेवीची नऊ रूपे लोकांसमोर घेऊन येण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या नऊ रूपांपैकी पहिल्या ‘शैलपुत्री’ रूपातील मूर्तीची मंडळाने प्रतिष्ठापना केली आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे बंगाल, गुजरात, महाराष्ट्र या राज्यातील मूर्तीचा अभ्यास करून ही मूर्ती बनविण्यात आली आहे. नऊ फूट उंचीच्या या मूर्तीच्या भाळी मळवट दिसतो, हे वेगळेपण आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राहुल महिपाल यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शैलपुत्री देवीची मूर्ती जिवंतपणाचा आभास निर्माण करते. मूर्तीत बारकावे यावेत, यासाठी दोन महिने काम चालले होते. डोळ्यातला सात्विक भाव दिसावा, यासाठी खास डोळ्यांसाठी कोल्हापूरहून कलाकार बोलावला होता. ही मूर्ती साताऱ्यातील संतोष कुंभार या कारागीराने बनविली आहे. गुजराती आणि बंगाली पद्धतीने देवीला साडी नेसविण्याचे अवघड धनुष्य अमृता वरगंडे यांनी लीलया पेलले आहे. दुर्गादेवीच्या नऊ पूजा बांधल्या जातात; पण नऊ रूपांतील मूर्ती पाहणे हा दुर्मिळ योग मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी येणार आहे. संघर्ष मित्र समूहाने तपपूर्ती साजरी करत असताना नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच हा एक भाग आहे. यासाठी अध्यक्ष माधव शेलार, उपाध्यक्ष मिलिंद साळुंखे, सहखजिनदार जितू साळुंखे, दिनेश साळुंखे व सभासद परिश्रम घेत आहेत. तसेच संघर्ष महिला मंचच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतले जातात. मंडळाने हिंदू-मुस्लिम ऐक्यही जपले आहे. मंडळाच्या स्थापनेपासून फरिद खान हे खजिनदार आहेत. मूर्तीची पहिली पूजा त्यांच्याच हस्ते बांधली जाते. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री’ असे नाव पडले. पार्वती, हेमवती ही तिचीच नावे आहेत, अशी आख्यायिका आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. (प्रतिनिधी)दुर्गादेवीची नऊ रूपेशैलपुत्री, ब्रम्हचारिणी, चंद्रघंटा, कुश्मांदा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, चामुंडा, सिद्धीदात्री ही दुर्गादेवीची नऊ रूपे आहेत. या आदिशक्तीच्या एक एक रूपाची ओळख दरवर्षी करून देण्याचा प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून केला जाणार आहे.आजकाल दुर्गोत्सव दांडिया आणि गरबा एवढ्यापुरताच मर्यादित होत चालला आहे. केवळ मनोरंजन म्हणून या उत्सवाकडे न पाहता या माध्यमातून विविध दुर्गावतारांची माहिती देऊन लोकांमध्ये प्रबोधन करण्याचे व्रत आम्ही हाती घेतले आहे.- राहुल महिपाल, संस्थापक अध्यक्ष, संघर्ष मित्र समूह